शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

पुढारीपणावरून मोहनशेठ-संजयकाकांमध्ये जुंपली

By admin | Updated: April 17, 2015 00:03 IST

शाब्दिक टोलेबाजी : काँग्रेस-भाजपमधील खेचाखेची कायम, सांगलीतील कार्यक्रमात संघर्षाचे दर्शन

सांगली : सहकारातील दुरवस्थेवरून जिल्ह्यातील काँग्रेस-भाजपमधील टोलेबाजी गुरुवारीही सुरूच राहिली. मोहनराव कदम, पतंगराव कदम यांनी सहकाराची वाट लावली, अशा शब्दात जतचे भाजपचे आमदार विलासराव जगताप यांनी आठ दिवसांपूर्वी केलेल्या आरोपाचे पडसाद साखर कामगारांच्या मेळाव्यातही उमटले. या मेळाव्यात ‘काहीजणांना आयते पुढारीपण मिळाले आहे,’ असा टोला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी लगावताच भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी, ‘आता राजकारणात नवी पिढी आली आहे, त्यांचे पाय मागे ओढू नका’, असा सल्ला दिला. अर्थात ही टोलेबाजी एकमेकांचे नाव न घेता झाली. येथील वसंत कामगार भवनमध्ये साखर कामगारांचा मेळावा झाला. या मेळाव्यात मनोगतामध्ये मोहनराव कदम म्हणाले की, आपण एकेकाळी महिना तीस रुपये पगारावर कारखान्यात काम केले आहे. कामगारांची दुखणी मला माहीत आहेत. त्यामुळेच सहकारात मी काम करू शकलो. कामगारांना न्याय देऊ शकलो. काहीजणांना आयते पुढारीपण मिळते. त्यांनी कोणताही मतभेद न ठेवता कामगारांच्या हितासाठी काम करावे. वस्तुत: हा टोला त्यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला होता. मात्र तो खा. पाटील यांना लागला असावा. तोच धागा पकडून खा. पाटील म्हणाले की, आता राजकारणात नवी पिढी आली आहे. मोदींची लाट आली आहे. अर्थात हा बदल लोकांनीच घडवून आणला आहे. सामान्य कार्यकर्ते व नव्या पिढीला नावे न ठेवता त्यांना बळ देण्याचे काम आता ज्येष्ठांनी केले पाहिजे. केवळ टीका करून प्रगती होणार नाही. झालेला बदल स्वीकारा. आठ दिवसांपूर्वी आ. जगताप यांनी सांगलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी मंत्री आ. पतंगराव कदम आणि मोहनराव कदम यांच्यामुळेच जिल्ह्यातील सहकाराची वाट लागली असून, द्वेषापोटीच सहकारी कारखाने, बँका, बाजार समित्यांवर प्रशासक नियुक्त करून चौकशीचा कट करण्यात आल्याची टीका केली होती. याला प्रत्युत्तर देताना मोहनराव कदम म्हणाले होते की, लबाड लोकांनी आमच्याबद्दल बोलू नये. कुबड्या घेऊन कधी मी राजकारण केले नाही. सहकारी संस्थांवर प्रशासक नियुक्तीवेळी सहकारमंत्री कोण होते, याचा अभ्यास संबंधितांनी करावा. त्यानंतरही जगताप आणि कदम गटात खेचाखेची कायम राहिली. गुरुवारच्या मेळाव्यातील खा. पाटील आणि मोहनराव कदम यांच्यातील शाब्दिक द्वंद्वाला जगताप-कदम यांच्यातील वादाचीच किनार होती. (प्रतिनिधी)