शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

आघाडी फायनल; जागांचा निर्णय सांगलीत : अशोक चव्हाण-जयंत पाटील यांच्यात चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 01:11 IST

सांगली : महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्यास काँग्रेसच्या नागपूर येथे झालेल्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत हिरवा कंदील दाखविण्यात आला. त्यामुळे स्वबळावर लढण्याच्या चर्चेला विराम मिळाला आहे. आता दोन्ही पक्षांनी किती जागांवर लढायचे, यावर दोन्ही पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांची शुक्रवारी रात्री बैठक झाली, पण जागा वाटपावर तोडगा निघू शकला नाही. सांगलीत स्थानिक पदाधिकाºयांनी ...

ठळक मुद्देनागपुरात पार्लमेंटरी बोर्डाची बैठक स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे चेंडू

सांगली : महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्यास काँग्रेसच्या नागपूर येथे झालेल्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत हिरवा कंदील दाखविण्यात आला. त्यामुळे स्वबळावर लढण्याच्या चर्चेला विराम मिळाला आहे. आता दोन्ही पक्षांनी किती जागांवर लढायचे, यावर दोन्ही पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांची शुक्रवारी रात्री बैठक झाली, पण जागा वाटपावर तोडगा निघू शकला नाही. सांगलीत स्थानिक पदाधिकाºयांनी एकत्र बसून जागा वाटपाचा निर्णय करावा, असे ठरले.

महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीच्या हालचालीही गतिमान झाल्या होत्या. पण दोन्ही बाजूंनी इच्छुकांची संख्या पाहता वरिष्ठ पातळीवरील नेत्यांच्या आदेशाकडे साºयांचेच लक्ष लागले होते. गुरुवारी काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक नागपूर येथे होती. या बैठकीत महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारीबाबत चर्चा करण्यात आली. शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पार्लमेंटरी बोर्डासमोर काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखतीचा अहवाल सादर केला.

या बैठकीला प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश युवकचे अध्यक्ष आ. विश्वजित कदम, आ. मोहनराव कदम, माजी मंत्री सतेज पाटील, हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री प्रतीक पाटील उपस्थित होते.बैठकीत महापालिका क्षेत्रातील कॉँग्रेस पक्षाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. काँग्रेसने स्वबळावर लढावे, असा सूरही काही नेत्यांनी आळवला होता. पण काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याला नकार देत राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचे आदेश स्थानिक नेत्यांना दिले. त्यामुळे राष्ट्रवादीसोबतच्या आघाडीबाबत काँग्रेसकडून शिक्कामोर्तब करण्यात आले. आघाडी फायनल झाल्याने आता कोण किती जागा लढवायच्या? हा प्रश्न बाकी आहे. त्यासाठी शुक्रवारी अशोक चव्हाण व जयंत पाटील यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. जागा वाटपाचा तिढा सांगलीतच सोडविला जावा, अशी काँग्रेस नेत्यांची भूमिका आहे. काँग्रेसकडील हक्काच्या जागा कायम ठेवाव्यात, असा आग्रह स्थानिक नेत्यांनी धरला होता. त्याला पार्लमेंटरी बोर्डानेही सहमती दर्शविली आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या हक्काच्या जागांचा निर्णय सुरूवातीला घ्यावा. काँग्रेसच्या ज्या जागांवर वाद नाही, त्या जागा आधी जाहीर कराव्यात, अशा सूचनाही पार्लमेंटरी बोर्डाने स्थानिक नेत्यांना केल्या. काँग्रेसअंतर्गत ज्या जागांवर इच्छुकांची संख्या अधिक आहे आणि या जागांवर तोडगा काढण्यात स्थानिक नेत्यांना यश आले नाही, तर या जागांचा निर्णय पार्लमेंटरी बोर्ड व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण घेतील, असा निर्णय बैठकीत करण्यात आला. चव्हाण यांनीही अशा वादाच्या जागांचा अहवाल माझ्याकडे पाठवा, मी त्यावर निर्णय घेऊन कोणाला उमेदवारी द्यायची, हे ठरवू, असे स्पष्ट केले.

आघाडीतील जागा वाटपाबाबत शुक्रवारी रात्री अशोक चव्हाण व जयंत पाटील यांच्यासह सांगलीतील काँग्रेसच्या नेतेमंडळींची भोजनावेळी चर्चा झाली. पण दोन्ही बाजूंनी समाधानकारक तोडगा निघू शकला नाही. सांगलीत दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी एकत्र बसून जागा वाटपावर चर्चा करावी, असा निर्णयही झाला. त्यामुळे पुन्हा एकदा सांगलीत दोन्ही काँग्रेसची चर्चा होणार आहे.राष्ट्रवादी ३५ जागांवर ठाममहापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला किमान ३५ जागा मिळाव्यात, अशी स्थानिक नेत्यांची अपेक्षा आहे. राष्ट्रवादीचे गतवेळचे संख्याबळ १९ असले तरी, धनपाल खोत, इद्रिस नायकवडी गट राष्ट्रवादीत आल्याने ताकद वाढल्याचा दावा केला जात आहे. सध्या राष्ट्रवादीकडे २७ नगरसेवक आहेत, तर आणखी आठ जागांवर मातब्बर उमेदवार असल्याने ३५ जागा मिळाल्या तरच काँग्रेससोबत आघाडी व्हावी, अन्यथा स्वबळावर निवडणूक लढवावा, असा सूर राष्ट्रवादीतून निघत आहे.सांगलीत आज बैठकदोन्ही काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी जागा वाटपाचा चेंडू पुन्हा स्थानिक पातळीवर टोलविला आहे. या पार्श्वभूमीवर जागा वाटपासंदर्भात शुक्रवारी रात्री दोन्ही काँग्रेसच्या पदाधिकाºयांची सांगलीत बैठक होण्याची शक्यता आहे, असे पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले.

 

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूक