शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

एलबीटीप्रश्नी उद्या व्यापाऱ्यांचा मेळावा : भूमिकेकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 00:21 IST

सांगली : महापालिकेने थकीत एलबीटी वसुलीसाठी एकतर्फी निर्धारण करून व्यापाºयांना नोटिसा बजाविण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाच्या या कारवाईविरोधात व्यापारी एकता असोसिएशनने येत्या शुक्रवारी

ठळक मुद्देआगामी महापालिका निवडणुकीमुळे सर्वच राजकीय पक्ष व्यापाºयांच्या पाठीशी

सांगली : महापालिकेने थकीत एलबीटी वसुलीसाठी एकतर्फी निर्धारण करून व्यापाºयांना नोटिसा बजाविण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाच्या या कारवाईविरोधात व्यापारी एकता असोसिएशनने येत्या शुक्रवारी व्यापाºयांचा मेळावा बोलाविला आहे. या मेळाव्यात आंदोलनाची दिशा ठरणार आहे. दरम्यान, महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच राजकीय पक्षांनी व्यापाºयांना पाठिंबा दिला आहे.

येथील पाटीदार भवन येथे शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता हा मेळावा होणार असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी सांगितले. या मेळाव्यास काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, जिल्हा सुधार समितीसह अनेकांनी पाठिंबा जाहीर केला आहे.एलबीटी हटून तीन वर्षे झाली तरी एलबीटीचा वाद काही संपेना. एलबीटीअंतर्गत सुमारे साडेपाच हजारहून अधिक व्यापाºयांनी नोंदणी करून करभरणा केला होता. महापालिकेने व्यापाºयांकडे ३० ते ३५ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचा दावा केला आहे. त्यात शासनाच्या आदेशानुसार अभय योजनेतील व्यापाºयांच्या प्रस्तावाचे निर्धारण करण्यासाठी ३१ मार्चपर्यंतची मुदत आहे.महापालिकेने वारंवार नोटिसा बजावूनही निर्धारणासाठी व्यापाºयांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आता पालिकेने एकतर्फी निर्धारण करून व्यापाºयांना नोटिसा बजाविण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या या कारवाईमुळे व्यापाºयांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.हिवाळी अधिवेशनावेळी आमदार सुधीर गाडगीळ यांनी पुढाकार घेऊन एलबीटी वसुलीला स्थगिती मिळविली होती. पण मुख्यमंत्री कार्यालयाकडून लेखी आदेश नसल्याने नगरविकास विभागाने एलबीटीचा स्थगिती आदेश काढण्यास नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा व्यापाºयांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून, शुक्रवारच्या मेळाव्यात त्यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.मुख्यमंत्र्यांशी बोलून तोडगा : गाडगीळआमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती आदेश दिले होते; पण मार्च २०१८ अखेर एलबीटी असेसमेंटची मुदत आहे. त्यामुळे प्रशासनानेही कारवाईची मोहीम सुरू केली आहे. आता याबाबत एकदाच सोक्षमोक्ष लागणे गरजेचे आहे. त्यासाठी दोन दिवसांत अधिवेशनादरम्यान फडणवीस यांच्याशी चर्चा करून तोडगा काढू.मुख्यमंत्र्यांचे आदेशही धाब्यावर : समीर शहासमीर शहा म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांनी तीन महिन्यांपूर्वी एलबीटी कारवाईबाबत स्थगिती आदेश दिले आहेत. पण नगरविकास खाते आणि महापालिका ते मानायला तयार नाहीत. आदेश धाब्यावर बसवून चुकीच्या पद्धतीने कोट्यवधी रुपयांच्या नोटिसा काढत आहेत. हा हुकूमशाही कारभार सुरू आहे. त्यामुळे आंदोलन भडकणार आहे.