शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
4
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
5
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
6
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
7
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
8
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
9
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
10
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
11
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
12
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
13
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
14
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
15
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
16
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
17
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
18
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
19
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
20
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी

एलबीटीप्रश्नी उद्या व्यापाऱ्यांचा मेळावा : भूमिकेकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 00:21 IST

सांगली : महापालिकेने थकीत एलबीटी वसुलीसाठी एकतर्फी निर्धारण करून व्यापाºयांना नोटिसा बजाविण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाच्या या कारवाईविरोधात व्यापारी एकता असोसिएशनने येत्या शुक्रवारी

ठळक मुद्देआगामी महापालिका निवडणुकीमुळे सर्वच राजकीय पक्ष व्यापाºयांच्या पाठीशी

सांगली : महापालिकेने थकीत एलबीटी वसुलीसाठी एकतर्फी निर्धारण करून व्यापाºयांना नोटिसा बजाविण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाच्या या कारवाईविरोधात व्यापारी एकता असोसिएशनने येत्या शुक्रवारी व्यापाºयांचा मेळावा बोलाविला आहे. या मेळाव्यात आंदोलनाची दिशा ठरणार आहे. दरम्यान, महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच राजकीय पक्षांनी व्यापाºयांना पाठिंबा दिला आहे.

येथील पाटीदार भवन येथे शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता हा मेळावा होणार असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी सांगितले. या मेळाव्यास काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, जिल्हा सुधार समितीसह अनेकांनी पाठिंबा जाहीर केला आहे.एलबीटी हटून तीन वर्षे झाली तरी एलबीटीचा वाद काही संपेना. एलबीटीअंतर्गत सुमारे साडेपाच हजारहून अधिक व्यापाºयांनी नोंदणी करून करभरणा केला होता. महापालिकेने व्यापाºयांकडे ३० ते ३५ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचा दावा केला आहे. त्यात शासनाच्या आदेशानुसार अभय योजनेतील व्यापाºयांच्या प्रस्तावाचे निर्धारण करण्यासाठी ३१ मार्चपर्यंतची मुदत आहे.महापालिकेने वारंवार नोटिसा बजावूनही निर्धारणासाठी व्यापाºयांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आता पालिकेने एकतर्फी निर्धारण करून व्यापाºयांना नोटिसा बजाविण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या या कारवाईमुळे व्यापाºयांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.हिवाळी अधिवेशनावेळी आमदार सुधीर गाडगीळ यांनी पुढाकार घेऊन एलबीटी वसुलीला स्थगिती मिळविली होती. पण मुख्यमंत्री कार्यालयाकडून लेखी आदेश नसल्याने नगरविकास विभागाने एलबीटीचा स्थगिती आदेश काढण्यास नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा व्यापाºयांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून, शुक्रवारच्या मेळाव्यात त्यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.मुख्यमंत्र्यांशी बोलून तोडगा : गाडगीळआमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती आदेश दिले होते; पण मार्च २०१८ अखेर एलबीटी असेसमेंटची मुदत आहे. त्यामुळे प्रशासनानेही कारवाईची मोहीम सुरू केली आहे. आता याबाबत एकदाच सोक्षमोक्ष लागणे गरजेचे आहे. त्यासाठी दोन दिवसांत अधिवेशनादरम्यान फडणवीस यांच्याशी चर्चा करून तोडगा काढू.मुख्यमंत्र्यांचे आदेशही धाब्यावर : समीर शहासमीर शहा म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांनी तीन महिन्यांपूर्वी एलबीटी कारवाईबाबत स्थगिती आदेश दिले आहेत. पण नगरविकास खाते आणि महापालिका ते मानायला तयार नाहीत. आदेश धाब्यावर बसवून चुकीच्या पद्धतीने कोट्यवधी रुपयांच्या नोटिसा काढत आहेत. हा हुकूमशाही कारभार सुरू आहे. त्यामुळे आंदोलन भडकणार आहे.