शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

एलबीटीचा निर्णय चुकलाच

By admin | Updated: October 2, 2014 22:28 IST

जयंत पाटील : सांगलीतील सभेत जाहीर कबुली

सांगली : घाईगडबडीने जकात रद्द करून एलबीटी व्यापाऱ्यांवर लादण्याचा आघाडी सरकारचा निर्णय चुकलाच आहे. एलबीटीचा प्रश्न अर्धवट ठेवून व्यापारी, महापालिका कर्मचारी आणि नागरिकांचीही राज्य सरकारने फरफटच केली आहे. या प्रश्नाबद्दल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वारंवार आपण भांडत होतो. परंतु, त्याकडे आमच्या सहकाऱ्यांनी गांभीर्याने पाहिले नाही, अशी टीका माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी करून, आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने हरिपूर येथे आयोजित सभेत जयंत पाटील बोलत होते. ते म्हणाले की, जकात रद्द केल्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांचे पगार होत नाहीत. अनेक महापालिकांची आर्थिक कोंडी झाली आहे. जकात रद्दचे व्यापाऱ्यांनी स्वागत केले. पण, एलबीटी कराच्या जाचामध्ये त्यांची होरपळ होत आहे. एलबीटीचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढण्याचा प्रत्येक मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी आग्रह धरला होता. परंतु, याकडे आमच्याच सहकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष दिले नाही. सध्या मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीतील चुकीच्या निर्णयावर भाष्य करू शकतो. म्हणूनच एलबीटीच्या प्रश्नाबाबत आघाडी सरकारचा निर्णय चुकला आहे, असे माझे मत आहे, असे पाटील म्हणाले. राष्ट्रवादी पक्ष ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहोचला आहे. पण, भाजप आणि शिवसेनेला ग्रामीण भागात जनाधार नाही, असेही ते म्हणाले. यावेळी सुरेश पाटील, दिग्विजय सूर्यवंशी, पद्माकर जगदाळे, श्रीनिवास पाटील, यांची भाषणे झाली. संजय बजाज, अभिजित हारगे उपस्थित होते. (प्रतिनिधी)संस्था चालविण्यास अंगात धमक लागतेज्यांना स्वत:च्या संस्था व्यवस्थित चालवता आल्या नाहीत, ते दुसऱ्यांवर आरोप करीत सुटले आहेत. आपण कसे पराभूत झालो, याची कारणे शोधून ती दुरुस्त करण्याऐवजी माझ्यावरच पराभवाचे खापर फोडत आहेत. संस्था चालविण्यासाठीही अंगात धमक लागते, अशी टीका त्यांनी प्रतीक पाटील यांच्यांवर केली.लोकसभेला नरेंद्र मोदींची गरज होती म्हणून जनतेने त्यांना मतदान केले. परंतु, राज्यात मोदी उमेदवार नसल्याने त्यांच्या नावाचा काहीही फायदा होणार नाही. जनमत चाचण्यांचे अंदाजही चुकणार आहेत. भ्रष्टाचारविषयी जाहिराती प्रसिध्द करण्यासाठी कोट्यवधी रूपये भाजपकडे कुठून आले?, असा सवालही केला.