शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

आळसंदच्या शेतकऱ्यांचे ‘ताकारी’च्या पाण्यासाठी बांधावर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:26 IST

आळसंद : खानापूर तालुक्यातील आळसंद येथील शेतकऱ्यांनी ताकारी जलसिंचन योजनेच्या पाण्यासाठी बांधावर गुरुवारी उपोषण सुरू केले आहे. ताकारी पोटकालव्याच्या ...

आळसंद : खानापूर तालुक्यातील आळसंद येथील शेतकऱ्यांनी ताकारी जलसिंचन योजनेच्या पाण्यासाठी बांधावर गुरुवारी उपोषण सुरू केले आहे. ताकारी पोटकालव्याच्या दरवाजातून काढण्यात आलेल्या पोटपाटाचे काम पूर्ण करून हक्काचे पाणी मिळावे, या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत.

आळसंद-कळंबी रस्त्यावर ताकारी जलसिंचन योजनेचा मुख्य कालवा आहे. दहा वर्षांपूर्वी त्याच्या पोटकालव्यामधून पोटपाट काढण्यात आला आहे. परंतु नंदकुमार सुर्वे, वसंत सुर्वे, सुखदेव सुर्वे या शेतकऱ्यांनी त्यांच्या हद्दीतून पुढे जाणाऱ्या पोटपाटाचे काम थांबवले आहे. त्यामुळे लिंगेश्वर मठाशेजारच्या शेतकऱ्यांना हक्काच्या पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. शेतीचे नुकसान होत आहे. शेतीसाठी ताकारी योजनेचे पाणी मिळत नाही, पण पाणीपट्टी मात्र वसूल केली जाते, हे कोणत्या नियमात बसते, असा सवाल शेतकऱ्यातून उपस्थित होत आहे.

शेतातील पिके वाळत आहेत. दहा वर्षांपासून पोटपाटासाठी पाटबंधारे कार्यालयाचा उंबरा झिजवत आहोत, पण अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. गुरुवारी रमेश जाधव, धनाजी जाधव, शशिकांत सुर्वे, भाऊसाहेब जाधव हे शेतकरी उपोषणास बसले आहेत.

चौकट

१ एप्रिल रोजी आढावा बैठक

योजनेच्या कार्यालयाला शेतकऱ्यांनी १५ मार्च रोजी उपोषणाबाबत निवेदन दिले होते. गुरुवारी प्रत्यक्ष भेट न देता अधिकाऱ्यांनी मार्च एन्डमुळे वेळ नसल्याचे कारण देऊन पाणी वितरक सातपुते यांना उपोषणस्थळी पत्र घेऊन पाठवले. या पत्रात १ एप्रिल रोजी आढावा बैठक बोलविली असून, या बैठकीत तोडगा काढू, असे शेतकऱ्यांना सांगण्यात आले. मात्र, शेतकऱ्यांनी पत्र न घेता प्रत्यक्षात पोटपाटाचे काम सुरू केल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचे सांगितले.