शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

आळसंदला आठ एकर ऊस आगीत जळून खाक

By admin | Updated: January 7, 2015 23:24 IST

आगीचे कारण अस्पष्ट : साडेआठ लाखाचे नुकसान

आळसंद : आळसंद (ता. खानापूर) येथे अचानक लागलेल्या भीषण आगीत आठ एकर ऊस जळून खाक झाला. ही घटना आज, बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. आगीत ३० गुंठे केळी बागेच्या काही भागासह ठिबक सिंचनच्या साहित्याचेही नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले.आळसंद येथील कमळापूर रस्त्यालगत लव्हाण नावाच्या शेतात ताकारी, आरफळ योजनेच्या पाण्यावर ऊसपीक घेण्यात आले आहे. सर्व ऊस उत्पादकांचा सुमारे आठ एकर ऊस शेतात होता. दुपारी दीडच्या सुमारास अचानक उसाच्या फडाला आग लागली. यावेळी वारे व उन्हाचा तडाखा असल्याने आगीने क्षणार्धात उग्ररूप धारण केले. या आगीत तानाजी भीमराव जाधव यांचा ३० गुंठे, विजया संपत महाडिक, संपत बापूसाहेब महाडिक यांचा चार एकर, तर विलास बापूसाहेब महाडिक यांचा तीन एकर ऊस जळून खाक झाला. यावेळी सुरेश भीमराव जाधव यांच्या ३० गुंठे केळीच्या बागेपैकी दोन ओळीतील केळीच्या १२० ते १५० रोपांना आगीची झळ पोहोचली.उसाच्या फडाला आग लागल्याची माहिती आळसंद गावात पसरताच शेतकरी व ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. क्रांती साखर कारखाना व विटा नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. परंतु, उसाच्या फडात गाड्या जात नसल्याने जेसीबी यंत्राच्या साहाय्याने वाट करीत अग्निशमन वाहनांना फडात प्रवेश करावा लागला. सुमारे दोन ते अडीच तासानंतर आग आटोक्यात आली. उसाच्या फडाला आग लागली, त्यावेळी भारनियमन असल्याने शॉर्टसर्किट होण्याचा धोका टळला. आग नक्की कशामुळे लागली, याचे कारण समजलेले नाही. (वार्ताहर)