शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

पाच लाख खातेदारांना जमिनीचे आरोग्यपत्र

By admin | Updated: June 24, 2015 00:41 IST

कृषी विभाग : क्षारपडमुक्त जमिनीस प्राधान्य

सांगली : केंद्र शासनाच्या आदेशानुसार जिल्हा मृद् सर्वेक्षण व चाचणी विभागाच्यावतीने जिल्ह्यातील ५ लाख ३५ हजार खातेदारांना त्यांच्या जमिनीचे आरोग्यपत्र देण्यात येणार आहे. बागायत आणि जिरायत क्षेत्रातील मातीचे नमुने जीपीएस उपकरणाच्या साहाय्याने घेतले जात आहेत. यामुळे जमिनी क्षारपड होण्यापासून वाचविता येणार असून, एकरी उत्पादनही वाढण्यास मदत होणार आहे. पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी मृद् आरोग्य अभियान हा एक आहे. जिल्ह्यातील एक लाख एकराहून अधिक जमीन क्षारपड झाली आहे. एकरी उत्पादनही ५० टक्क्याने घटले आहे. जमिनीचा पोत न पाहता शेतकरी जादा उत्पादन मिळविण्यासाठी अति पाण्याचा आणि रासायनिक खतांचा वापर करीत आहेत. यामुळे शेतीचे उत्पादन वाढण्याऐवजी जमिनी क्षारपड होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे केंद्र शासनाने जमिनीचे आरोग्य तपासण्यासाठी मृद् आरोग्य अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्हा मृद् सर्वेक्षण व चाचणी विभागाच्या अधिकाऱ्यांनी २०१५ ते १८ असा तीन वर्षाचा जिल्ह्याचा आराखडा तयार केला असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे यांनी सांगितले.जिल्हा मृद् सर्वेक्षण व मृद् चाचणी अधिकारी प्रकाश कुंभार म्हणाले की, जिल्ह्यातील ५ लाख ३५ हजार खातेदारांच्या जमिनीतील मातीचे नमुने घेऊन त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. तीन वर्षात एकूण १४ लाख ४६ माती नमुने घेतले जाणार आहेत. त्यापैकी २०१५-१६ वर्षामध्ये ३७ हजार ८२० नमुने तपासून शेतकऱ्यांना जमिनीचे आरोग्यपत्र देण्यात येणार आहे. या वर्षात खरीप हंगामामध्ये ३९ गावांमधील १७ हजार ६७७ आणि रब्बी हंगामात ६० गावांमधील ३७ हजार ८२० मातीचे नमुने तपासणार आहेत. यासाठी जिल्ह्यातील शासकीय प्रयोगशाळा, तसेच आठ खासगी प्रयोगशाळांची मदत घेण्यात येणार आहे. यामध्ये एक फिरती माती चाचणी प्रयोगशाळा असणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन तेथील नमुने फिरती प्रयोगशाळा घेणार आहे. लगेच शेतकऱ्यांना जमिनीमध्ये कोणते घटक कमी आणि कोणते घटक जास्त आहेत, याची कल्पना दिली जाणार आहे. यामुळे शेतीचे उत्पन्न वाढून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे. (प्रतिनिधी)