शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

पाच लाख खातेदारांना जमिनीचे आरोग्यपत्र

By admin | Updated: June 24, 2015 00:41 IST

कृषी विभाग : क्षारपडमुक्त जमिनीस प्राधान्य

सांगली : केंद्र शासनाच्या आदेशानुसार जिल्हा मृद् सर्वेक्षण व चाचणी विभागाच्यावतीने जिल्ह्यातील ५ लाख ३५ हजार खातेदारांना त्यांच्या जमिनीचे आरोग्यपत्र देण्यात येणार आहे. बागायत आणि जिरायत क्षेत्रातील मातीचे नमुने जीपीएस उपकरणाच्या साहाय्याने घेतले जात आहेत. यामुळे जमिनी क्षारपड होण्यापासून वाचविता येणार असून, एकरी उत्पादनही वाढण्यास मदत होणार आहे. पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी मृद् आरोग्य अभियान हा एक आहे. जिल्ह्यातील एक लाख एकराहून अधिक जमीन क्षारपड झाली आहे. एकरी उत्पादनही ५० टक्क्याने घटले आहे. जमिनीचा पोत न पाहता शेतकरी जादा उत्पादन मिळविण्यासाठी अति पाण्याचा आणि रासायनिक खतांचा वापर करीत आहेत. यामुळे शेतीचे उत्पादन वाढण्याऐवजी जमिनी क्षारपड होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे केंद्र शासनाने जमिनीचे आरोग्य तपासण्यासाठी मृद् आरोग्य अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्हा मृद् सर्वेक्षण व चाचणी विभागाच्या अधिकाऱ्यांनी २०१५ ते १८ असा तीन वर्षाचा जिल्ह्याचा आराखडा तयार केला असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे यांनी सांगितले.जिल्हा मृद् सर्वेक्षण व मृद् चाचणी अधिकारी प्रकाश कुंभार म्हणाले की, जिल्ह्यातील ५ लाख ३५ हजार खातेदारांच्या जमिनीतील मातीचे नमुने घेऊन त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. तीन वर्षात एकूण १४ लाख ४६ माती नमुने घेतले जाणार आहेत. त्यापैकी २०१५-१६ वर्षामध्ये ३७ हजार ८२० नमुने तपासून शेतकऱ्यांना जमिनीचे आरोग्यपत्र देण्यात येणार आहे. या वर्षात खरीप हंगामामध्ये ३९ गावांमधील १७ हजार ६७७ आणि रब्बी हंगामात ६० गावांमधील ३७ हजार ८२० मातीचे नमुने तपासणार आहेत. यासाठी जिल्ह्यातील शासकीय प्रयोगशाळा, तसेच आठ खासगी प्रयोगशाळांची मदत घेण्यात येणार आहे. यामध्ये एक फिरती माती चाचणी प्रयोगशाळा असणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन तेथील नमुने फिरती प्रयोगशाळा घेणार आहे. लगेच शेतकऱ्यांना जमिनीमध्ये कोणते घटक कमी आणि कोणते घटक जास्त आहेत, याची कल्पना दिली जाणार आहे. यामुळे शेतीचे उत्पन्न वाढून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे. (प्रतिनिधी)