शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

पाच लाख खातेदारांना जमिनीचे आरोग्यपत्र

By admin | Updated: June 24, 2015 00:41 IST

कृषी विभाग : क्षारपडमुक्त जमिनीस प्राधान्य

सांगली : केंद्र शासनाच्या आदेशानुसार जिल्हा मृद् सर्वेक्षण व चाचणी विभागाच्यावतीने जिल्ह्यातील ५ लाख ३५ हजार खातेदारांना त्यांच्या जमिनीचे आरोग्यपत्र देण्यात येणार आहे. बागायत आणि जिरायत क्षेत्रातील मातीचे नमुने जीपीएस उपकरणाच्या साहाय्याने घेतले जात आहेत. यामुळे जमिनी क्षारपड होण्यापासून वाचविता येणार असून, एकरी उत्पादनही वाढण्यास मदत होणार आहे. पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी मृद् आरोग्य अभियान हा एक आहे. जिल्ह्यातील एक लाख एकराहून अधिक जमीन क्षारपड झाली आहे. एकरी उत्पादनही ५० टक्क्याने घटले आहे. जमिनीचा पोत न पाहता शेतकरी जादा उत्पादन मिळविण्यासाठी अति पाण्याचा आणि रासायनिक खतांचा वापर करीत आहेत. यामुळे शेतीचे उत्पादन वाढण्याऐवजी जमिनी क्षारपड होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे केंद्र शासनाने जमिनीचे आरोग्य तपासण्यासाठी मृद् आरोग्य अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्हा मृद् सर्वेक्षण व चाचणी विभागाच्या अधिकाऱ्यांनी २०१५ ते १८ असा तीन वर्षाचा जिल्ह्याचा आराखडा तयार केला असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे यांनी सांगितले.जिल्हा मृद् सर्वेक्षण व मृद् चाचणी अधिकारी प्रकाश कुंभार म्हणाले की, जिल्ह्यातील ५ लाख ३५ हजार खातेदारांच्या जमिनीतील मातीचे नमुने घेऊन त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. तीन वर्षात एकूण १४ लाख ४६ माती नमुने घेतले जाणार आहेत. त्यापैकी २०१५-१६ वर्षामध्ये ३७ हजार ८२० नमुने तपासून शेतकऱ्यांना जमिनीचे आरोग्यपत्र देण्यात येणार आहे. या वर्षात खरीप हंगामामध्ये ३९ गावांमधील १७ हजार ६७७ आणि रब्बी हंगामात ६० गावांमधील ३७ हजार ८२० मातीचे नमुने तपासणार आहेत. यासाठी जिल्ह्यातील शासकीय प्रयोगशाळा, तसेच आठ खासगी प्रयोगशाळांची मदत घेण्यात येणार आहे. यामध्ये एक फिरती माती चाचणी प्रयोगशाळा असणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन तेथील नमुने फिरती प्रयोगशाळा घेणार आहे. लगेच शेतकऱ्यांना जमिनीमध्ये कोणते घटक कमी आणि कोणते घटक जास्त आहेत, याची कल्पना दिली जाणार आहे. यामुळे शेतीचे उत्पन्न वाढून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे. (प्रतिनिधी)