शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

काँग्रेसला सतावतेय अनुभवी नेत्यांची उणीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 23:16 IST

अविनाश कोळी । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कधीकाळी दिग्गज, अनुभवी नेत्यांचा भरणा असलेल्या काँग्रेस-राष्टÑवादीला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अनुभवी, ...

अविनाश कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : कधीकाळी दिग्गज, अनुभवी नेत्यांचा भरणा असलेल्या काँग्रेस-राष्टÑवादीला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अनुभवी, ज्येष्ठ नेत्यांची उणीव भासणार आहे. काँग्रेसची बहुतांश मतदारसंघातील सूत्रे दुसऱ्या फळीच्या हाती गेली असून, राष्टÑवादीची अवस्थाही फारशी वेगळी नाही. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत या दुसºया फळीतील नेत्यांचे कौशल्य व ताकद पणाला लागणार आहे.सांगली जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांच्या काळात अनेक दिग्गज नेत्यांचे निधन झाले. त्यामुळे एक मोठी पोकळी आघाडीत निर्माण झाली आहे. माजी मंत्री पतंगराव कदम, शिवाजीराव देशमुख, आर. आर. पाटील, मदन पाटील, माजी आमदार हाफिज धत्तुरे, विलासराव शिंदे, इलियास नायकवडी अशा दिग्गज नेत्यांचे निधन आघाडीला धक्का देऊन गेले. अचानक इतकी मोठी पोकळी निर्माण झाल्याने आघाडीत चिंतेचे वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीतही हा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र या राजकीय पोकळीची सर्वाधिक चिंता विधानसभा निवडणुकीत सतावणार आहे. राष्टÑवादीतून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसमधून माजी आमदार सदाशिवराव पाटील हे दोनच ज्येष्ठ नेते सध्या आघाडीत आहेत. तरीही दोन्ही नेत्यांना त्यांच्या मतदारसंघातच अडकविण्याची खेळी भाजपकडून खेळली जाणार असल्याने, अन्य मतदारसंघात दुसºया फळीच्या ताकदीची परीक्षा होणार आहे.सहा वर्षापूर्वी राष्टÑवादीतून अनेक दिग्गज नेते भाजप व शिवसेनेत गेले. यामध्ये खासदार संजयकाका पाटील, आ. विलासराव जगताप, आ. अनिल बाबर, पृथ्वीराज देशमुख, अजितराव घोरपडे, दिनकर पाटील आदी नेत्यांचा समावेश आहे. दिग्गज नेत्यांची फळी अन्य पक्षात गेल्यानंतर राष्टÑवादीला मोठा दणका बसला. काँग्रेसपाठोपाठ त्यांंच्या ताकदीचा आलेखही अचानक खाली आला. त्यातही पक्षाच्या अस्तित्वाची धडपड उर्वरित नेत्यांकडून सुरू होती, मात्र दिग्गज नेत्यांच्या निधनाने पुन्हा धक्के बसत राहिले. जिल्ह्यातील सध्याची काँग्रेस-आघाडीची ताकद फार मोठी नाही. भाजपने काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यातील आठपैकी चार, तर शिवसेनेने एक विधानसभा मतदारसंघ हस्तगत केला. तासगाव-कवठेमहांकाळ, वाळवा आणि पलूस-कडेगाव हे तीनच मतदारसंघ आघाडीने राखले. यंदा हे मतदारसंघही खेचण्याची जोरदार तयारी भाजपने केली आहे. आघाडीत अनुभवी, ज्येष्ठ नेत्यांची उणीव तीव्र होत असतानाच, भाजपकडे ज्येष्ठ, अनुभवी नेत्यांची ताकद वाढत आहे. त्यामुळे आघाडी आणि युती यांच्या ताकदीमधील अंतर मोठे होत आहे.या नेत्यांकडे राहणार लक्ष...शिराळ्यात शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र सत्यजित देशमुख, सांगलीत मदन पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील, वसंतदादांचे नातू विशाल पाटील, तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात आर. आर. पाटील यांच्या पत्नी आ. सुमनताई पाटील, त्यांचे पुत्र रोहित पाटील, पलूस-कडेगावमध्ये पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजित कदम या दुसºया फळीतील नेत्यांकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे. त्यांच्या राजकीय कौशल्याची तसेच ताकदीची परीक्षा घेणारी ही निवडणूक आहे.भाजपच्या वाढत्या ताकदीची आघाडीस चिंताजिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत भाजपने सर्व महत्त्वाच्या संस्था ताब्यात घेऊन आघाडीला कमकुवत केले असताना, यंदाच्या निवडणुकीत त्यांनी आघाडीचे उरले-सुरले अस्तित्व संपुष्टात आणण्याची रणनीती आखली आहे. आघााडीकडे असलेल्या तीन जागा तरी ताकदीने लढविण्याबाबत आघाडी प्रयत्नशील असली तरी, अन्य मतदारसंघात त्यांच्या लढतीचे भवितव्य दुसºया फळीवर अवलंबून आहे.