शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

कळंबीतील अल्पवयीन मुलीचे दोघांकडून अपहरण

By admin | Updated: April 23, 2015 00:58 IST

गुन्हा दाखल : फूस लावून पळवून नेल्याची नातेवाईकांची तक्रार; शोधासाठी दोन पथके रवाना

विटा : फूस लावून कळंबी (ता. खानापूर) येथील एका अल्पवयीन शाळकरी मुलीचे अपहरण झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अमोल लक्ष्मण चव्हाण व महेंद्र हणमंत धनवडे (दोघेही रा. भाळवणी) या दोघांविरुध्द विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.विटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंबी येथील १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी भाळवणी विद्यालयात नववीच्या वर्गात शिक्षण घेत होती. दि. १८ एप्रिल रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून अमोल व महेंद्र हे दोघे कळंबी गावात मुलीच्या घरासमोर आले. त्यावेळी मुलीच्या घरातील नातेवाईक झोपी गेल्याचे पाहून या दोघांनी दुचाकीवरून मुलीचे अपहरण केले. हा प्रकार दुसऱ्यादिवशी सकाळी मुलीच्या नातेवाईकांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी अन्य नातेवाईक, मुलीच्या मैत्रिणींकडे चौकशी केली. ठिकठिकाणी तिचा शोध घेतला. परंतु मुलगी सापडली नाही. त्यानंतर भाळवणी येथील अमोल व महेंद्र या दोघांनी फूस लावून मुलीचे अपहरण केल्याचे मुलीच्या वडिलांना समजल्यानंतर त्यांनी रविवारी रात्री उशिरा विटा पोलिसांत अमोल चव्हाण व महेंद्र धनवडे या दोघांविरुध्द मुलीचे अपहरण केल्याची फिर्याद दिली. याप्रकरणी अमोल व महेंद्र या दोघांवर अल्पवयीन शाळकरी मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल शिंदे करीत आहेत. अल्पवयीन मुलीच्या अपहरणाने खानापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)