शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

मगरींच्या मुक्त वावरामुळे कृष्णाकाठावर धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 23:26 IST

सोमनाथ डवरी ।लोकमत न्यूज नेटवर्ककसबे डिग्रज : गेल्या काही दिवसांत कृष्णा नदीत चार मगरी मृत झाल्याचे आढळून आले, तर गेल्या काही वर्षांत आतापर्यंत कृष्णा नदीतील मगरींनी सात व्यक्तींचे बळी घेतले आहेत. औदुंबर डोह ते सांगली पूल परिसरात मगरीचे दर्शन कायमचेच झाले आहे. वीसहून अधिकजण मगरींच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. एखादी ...

सोमनाथ डवरी ।लोकमत न्यूज नेटवर्ककसबे डिग्रज : गेल्या काही दिवसांत कृष्णा नदीत चार मगरी मृत झाल्याचे आढळून आले, तर गेल्या काही वर्षांत आतापर्यंत कृष्णा नदीतील मगरींनी सात व्यक्तींचे बळी घेतले आहेत. औदुंबर डोह ते सांगली पूल परिसरात मगरीचे दर्शन कायमचेच झाले आहे. वीसहून अधिकजण मगरींच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. एखादी घटना घडली की वन विभाग जागा होतो. कागदी घोडे नाचविले जातात. प्राणीमित्रांचे ‘प्रबोधन’ सुरू होते.आतापर्यंत अनिकेत कदम (कसबे डिग्रज, २९ एप्रिल २००३), रामचंद्र नलवडे (भिलवडी, ११ नोव्हेंबर २००४), सुनील भोसले (अंकलखोप, १६ एप्रिल २००७), वसंत मोरे (भिलवडी, २९ मार्च २०१५), अजय जाधव (चोपडेवाडी, २० एप्रिल २०१५) आणि नुकताच संजय भानुसे (तुंग) या सातजणांचा मगरींच्या हल्ल्यात बळी गेला आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत अंकलखोप, ब्रह्मनाळ, कसबे डिग्रज, सांगली, तुंग या ठिकाणी नदीवर अंघोळीसाठी, मासेमारीसाठी, वैरणीसाठी गेलेल्या सुमारे ४० जणांवर मगरींनी जीवघेणे हल्ले केले आहेत. नदीवर विविध कारणांनी जावेच लागते. वाळू उपशामुळे मगरींची आश्रयस्थाने उद्ध्वस्त झाली आहेत. पण याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे.औदुंबर डोह ते सांगली पूल परिसरात वन विभागाने ९ जून २०१५ रोजी केलेल्या मगर सर्वेक्षणात १९ मोठ्या आणि ३९ लहान मगरी आढळल्या. मगर एकावेळी ४०-५० पिलांना जन्म देते. यापैकी ४-५ जरी प्रौढ झाल्या, तरी मगरींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते.२५ नोव्हेंबरला तुंग येथे एक मगर मृत आढळली, तर इनाम धामणी येथे दोन चार-पाच फुटी मगरींची हत्या झाल्याचे आढळले. तसेच २५ डिसेंबर रोजी कसबे डिग्रज बंधारा जॅकवेलजवळ दहाफुटी मगरीची हत्या केलेले शीर आढळले. मात्र तिचे बाकीचे धड सापडले नाही. हे प्रकरण प्रसारित होऊ नये, यासाठी वन विभाग प्रयत्न करताना दिसून येत आहे. सध्या या प्रकरणाचा शोध सुरू आहे. पोलिसात प्रकरण दाखल आहे, पण अद्याप याबाबत ठोस माहिती पुढे येत नाही.मगरींची शिकार, तस्करी होतेय का?सध्या मानवबळीनंतर आता मगरहत्यांची मालिका सुरू होत आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. मगरींची शिकार किंवा तस्करी होते का? याबाबत शोध घेणे गरजेचे आहे. संशय कुणावर घ्यायचा, हा प्रश्न आहे. वनखाते कागदी घोडे नाचवित आहे. मगरतचे दर्शन, भीती कायमच आहे. मगरी पकडण्याबाबत ठोस धोरण गरजेचे आहे. गेली कित्येक वर्षे संरक्षक जाळी, नदीवर वीज व्यवस्था याबाबतची चर्चा वन विभाग करतो. महाजाळी कितपत योग्य ठरते, हे महत्त्वाचे आहे. प्राणीमित्रांच्या प्रबोधनाचा कितपत उपयोग होतो, हाही प्रश्न आहेच.