शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
2
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
3
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
4
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
5
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
6
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
8
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
9
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
10
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
11
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
12
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
13
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
14
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
15
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
16
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
17
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
18
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
19
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
20
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज

मगरींच्या मुक्त वावरामुळे कृष्णाकाठावर धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 23:26 IST

सोमनाथ डवरी ।लोकमत न्यूज नेटवर्ककसबे डिग्रज : गेल्या काही दिवसांत कृष्णा नदीत चार मगरी मृत झाल्याचे आढळून आले, तर गेल्या काही वर्षांत आतापर्यंत कृष्णा नदीतील मगरींनी सात व्यक्तींचे बळी घेतले आहेत. औदुंबर डोह ते सांगली पूल परिसरात मगरीचे दर्शन कायमचेच झाले आहे. वीसहून अधिकजण मगरींच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. एखादी ...

सोमनाथ डवरी ।लोकमत न्यूज नेटवर्ककसबे डिग्रज : गेल्या काही दिवसांत कृष्णा नदीत चार मगरी मृत झाल्याचे आढळून आले, तर गेल्या काही वर्षांत आतापर्यंत कृष्णा नदीतील मगरींनी सात व्यक्तींचे बळी घेतले आहेत. औदुंबर डोह ते सांगली पूल परिसरात मगरीचे दर्शन कायमचेच झाले आहे. वीसहून अधिकजण मगरींच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. एखादी घटना घडली की वन विभाग जागा होतो. कागदी घोडे नाचविले जातात. प्राणीमित्रांचे ‘प्रबोधन’ सुरू होते.आतापर्यंत अनिकेत कदम (कसबे डिग्रज, २९ एप्रिल २००३), रामचंद्र नलवडे (भिलवडी, ११ नोव्हेंबर २००४), सुनील भोसले (अंकलखोप, १६ एप्रिल २००७), वसंत मोरे (भिलवडी, २९ मार्च २०१५), अजय जाधव (चोपडेवाडी, २० एप्रिल २०१५) आणि नुकताच संजय भानुसे (तुंग) या सातजणांचा मगरींच्या हल्ल्यात बळी गेला आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत अंकलखोप, ब्रह्मनाळ, कसबे डिग्रज, सांगली, तुंग या ठिकाणी नदीवर अंघोळीसाठी, मासेमारीसाठी, वैरणीसाठी गेलेल्या सुमारे ४० जणांवर मगरींनी जीवघेणे हल्ले केले आहेत. नदीवर विविध कारणांनी जावेच लागते. वाळू उपशामुळे मगरींची आश्रयस्थाने उद्ध्वस्त झाली आहेत. पण याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे.औदुंबर डोह ते सांगली पूल परिसरात वन विभागाने ९ जून २०१५ रोजी केलेल्या मगर सर्वेक्षणात १९ मोठ्या आणि ३९ लहान मगरी आढळल्या. मगर एकावेळी ४०-५० पिलांना जन्म देते. यापैकी ४-५ जरी प्रौढ झाल्या, तरी मगरींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते.२५ नोव्हेंबरला तुंग येथे एक मगर मृत आढळली, तर इनाम धामणी येथे दोन चार-पाच फुटी मगरींची हत्या झाल्याचे आढळले. तसेच २५ डिसेंबर रोजी कसबे डिग्रज बंधारा जॅकवेलजवळ दहाफुटी मगरीची हत्या केलेले शीर आढळले. मात्र तिचे बाकीचे धड सापडले नाही. हे प्रकरण प्रसारित होऊ नये, यासाठी वन विभाग प्रयत्न करताना दिसून येत आहे. सध्या या प्रकरणाचा शोध सुरू आहे. पोलिसात प्रकरण दाखल आहे, पण अद्याप याबाबत ठोस माहिती पुढे येत नाही.मगरींची शिकार, तस्करी होतेय का?सध्या मानवबळीनंतर आता मगरहत्यांची मालिका सुरू होत आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. मगरींची शिकार किंवा तस्करी होते का? याबाबत शोध घेणे गरजेचे आहे. संशय कुणावर घ्यायचा, हा प्रश्न आहे. वनखाते कागदी घोडे नाचवित आहे. मगरतचे दर्शन, भीती कायमच आहे. मगरी पकडण्याबाबत ठोस धोरण गरजेचे आहे. गेली कित्येक वर्षे संरक्षक जाळी, नदीवर वीज व्यवस्था याबाबतची चर्चा वन विभाग करतो. महाजाळी कितपत योग्य ठरते, हे महत्त्वाचे आहे. प्राणीमित्रांच्या प्रबोधनाचा कितपत उपयोग होतो, हाही प्रश्न आहेच.