शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
2
Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा
3
WhatsApp Web Down : लॅपटॉप किंवा माऊस खराब झाला नाही तर WhatsApp Web आहे डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम
4
सोनं १३०० रुपये तर चांदी ३००० रुपयांनी महागली, तुमच्या शहरातील आजचा दर काय?
5
‘ऑफिसात जीव गेला तरी बेहत्तर, पण नोकरी सोडणार नाही’, तरुणाने मांडली EMI मध्ये अडकलेल्या मध्यमवर्गीयाची व्यथा 
6
Apple iPhone : काय सांगता! प्रत्येक फोनवर अ‍ॅपल एवढा नफा मिळवते, आयफोन बनवण्यासाठी खर्च किती येतो?
7
दसरा मेळाव्यानंतर ठाकरेंना धक्का देणार, २ आमदार वगळता इतर संपर्कात; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा
8
पत्नीचं परपुरुषासोबत सुरू होत अफेयर, पतीला लागली कुणकुण अन् कांड झाला!
9
Crime: 'तू माझ्या बायकोला फोन का करतो?' संतापलेल्या तरुणाने चुलत भावाला संपवलं!
10
Pitru Paksha 2025: संकष्टी किंवा उपसाच्या दिवशी श्राद्धतिथी आल्यास नैवेद्य ठेवावा की नाही? वाचा
11
उपराष्ट्रपती निवडणुकीत ईव्हीएमचा वापर का केला जात नाही?
12
"ते मला मराठीत म्हणाले...", उपेंद्र लिमयेने सांगितला रजनीकांत यांच्यासोबतच्या भेटीचा किस्सा
13
उपराष्ट्रपती निवडणूक: मतदानाआधीच ३ माजी मुख्यमंत्र्यांनी 'गेम' बदलला; इंडिया आघाडीला धक्का
14
Nepal Currency Value: भारताच्या ५० रुपयांचं मूल्य नेपाळमध्ये किती असेल? आश्चर्यचकित करेल उत्तर!
15
"ते दोन पवित्र आत्मे पितृ पंधरवड्यात जमिनीवर आले तर काय प्रश्न विचारतील?’’ भाजपाचा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना टोला
16
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका! ८३ मिलियन डॉलर्सच्या नूकसान भरपाईचा निर्णय कायम
17
"मीही बोलू शकले असते, पण.."; धनश्री वर्माचं मोठं विधान, चहलबद्दल म्हणाली- "त्याची अब्रू..."
18
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
19
तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 'हे' ५ शेअर्स आहेत का? ब्रोकरेज फर्मने सांगितली बंपर कमाईची संधी
20
Shantanu Naidu: रतन टाटांचा तरुण सहकारी राहिलेल्या शंतनू नायडूने प्रेमाची कबुली दिली? तिच्यासोबतचे फोटो आले समोर

मगरींच्या मुक्त वावरामुळे कृष्णाकाठावर धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 23:26 IST

सोमनाथ डवरी ।लोकमत न्यूज नेटवर्ककसबे डिग्रज : गेल्या काही दिवसांत कृष्णा नदीत चार मगरी मृत झाल्याचे आढळून आले, तर गेल्या काही वर्षांत आतापर्यंत कृष्णा नदीतील मगरींनी सात व्यक्तींचे बळी घेतले आहेत. औदुंबर डोह ते सांगली पूल परिसरात मगरीचे दर्शन कायमचेच झाले आहे. वीसहून अधिकजण मगरींच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. एखादी ...

सोमनाथ डवरी ।लोकमत न्यूज नेटवर्ककसबे डिग्रज : गेल्या काही दिवसांत कृष्णा नदीत चार मगरी मृत झाल्याचे आढळून आले, तर गेल्या काही वर्षांत आतापर्यंत कृष्णा नदीतील मगरींनी सात व्यक्तींचे बळी घेतले आहेत. औदुंबर डोह ते सांगली पूल परिसरात मगरीचे दर्शन कायमचेच झाले आहे. वीसहून अधिकजण मगरींच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. एखादी घटना घडली की वन विभाग जागा होतो. कागदी घोडे नाचविले जातात. प्राणीमित्रांचे ‘प्रबोधन’ सुरू होते.आतापर्यंत अनिकेत कदम (कसबे डिग्रज, २९ एप्रिल २००३), रामचंद्र नलवडे (भिलवडी, ११ नोव्हेंबर २००४), सुनील भोसले (अंकलखोप, १६ एप्रिल २००७), वसंत मोरे (भिलवडी, २९ मार्च २०१५), अजय जाधव (चोपडेवाडी, २० एप्रिल २०१५) आणि नुकताच संजय भानुसे (तुंग) या सातजणांचा मगरींच्या हल्ल्यात बळी गेला आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत अंकलखोप, ब्रह्मनाळ, कसबे डिग्रज, सांगली, तुंग या ठिकाणी नदीवर अंघोळीसाठी, मासेमारीसाठी, वैरणीसाठी गेलेल्या सुमारे ४० जणांवर मगरींनी जीवघेणे हल्ले केले आहेत. नदीवर विविध कारणांनी जावेच लागते. वाळू उपशामुळे मगरींची आश्रयस्थाने उद्ध्वस्त झाली आहेत. पण याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे.औदुंबर डोह ते सांगली पूल परिसरात वन विभागाने ९ जून २०१५ रोजी केलेल्या मगर सर्वेक्षणात १९ मोठ्या आणि ३९ लहान मगरी आढळल्या. मगर एकावेळी ४०-५० पिलांना जन्म देते. यापैकी ४-५ जरी प्रौढ झाल्या, तरी मगरींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते.२५ नोव्हेंबरला तुंग येथे एक मगर मृत आढळली, तर इनाम धामणी येथे दोन चार-पाच फुटी मगरींची हत्या झाल्याचे आढळले. तसेच २५ डिसेंबर रोजी कसबे डिग्रज बंधारा जॅकवेलजवळ दहाफुटी मगरीची हत्या केलेले शीर आढळले. मात्र तिचे बाकीचे धड सापडले नाही. हे प्रकरण प्रसारित होऊ नये, यासाठी वन विभाग प्रयत्न करताना दिसून येत आहे. सध्या या प्रकरणाचा शोध सुरू आहे. पोलिसात प्रकरण दाखल आहे, पण अद्याप याबाबत ठोस माहिती पुढे येत नाही.मगरींची शिकार, तस्करी होतेय का?सध्या मानवबळीनंतर आता मगरहत्यांची मालिका सुरू होत आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. मगरींची शिकार किंवा तस्करी होते का? याबाबत शोध घेणे गरजेचे आहे. संशय कुणावर घ्यायचा, हा प्रश्न आहे. वनखाते कागदी घोडे नाचवित आहे. मगरतचे दर्शन, भीती कायमच आहे. मगरी पकडण्याबाबत ठोस धोरण गरजेचे आहे. गेली कित्येक वर्षे संरक्षक जाळी, नदीवर वीज व्यवस्था याबाबतची चर्चा वन विभाग करतो. महाजाळी कितपत योग्य ठरते, हे महत्त्वाचे आहे. प्राणीमित्रांच्या प्रबोधनाचा कितपत उपयोग होतो, हाही प्रश्न आहेच.