शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

मंत्र्यांच्या दारात कांदे ओतण्याचा किसान सभेचा इशारा

By संतोष भिसे | Updated: February 26, 2023 18:57 IST

मंत्र्यांच्या दारात कांदे ओतण्याचा किसान सभेचा इशारा दिला आहे. 

सांगली : प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याचा विक्री दर ४५० ते ६०० रुपयांपर्यंत खाली कोसळला आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने कांद्याचा उत्पादन खर्च ८५० ते ९०० रुपये प्रति क्विंटल निश्चित केला आहे. मात्र राज्यात आजमितीला केवळ ४५० ते ६०० रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे शासनाने कांदा उत्पादकांच्या प्रश्नांत हस्तक्षेप करावा, अन्यथा कांदे दारात ओतू असा इशारा किसान सभेने दिला आहे.

प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे की, कांद्याची काढणी आणि वाहतुकीचा खर्चही भरून निघेना झाला आहे. भाजप- शिंदे सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज आहे. सत्ताधारी सत्तेच्या साठमारीत मश्गुल असल्याने शेतकऱ्याला वाली राहिलेला नाही. कोणत्या पक्षाला कोणते चिन्ह मिळाले? कोणाचे आमदार अपात्र झाले? कोणाचे सरकार टिकणार? यातच सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राला गुंतवून टाकले आहे. शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. सरकारने शेतकऱ्यांची संतापजनक उपेक्षा थांबवावी. कांदा उत्पादकांना तातडीने मदत करावी. सरकारने हस्तक्षेप न केल्यास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पणनमंत्री व कृषीमंत्र्यांच्या दारात कांदे ओतण्याचे आंदोलन केले जाईल.  

कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी निर्यातीला प्रोत्साहन द्यावे. निर्यात अनुदान द्यावे. उत्पादकांना प्रतिक्विंटल ६०० रुपये अनुदान जाहीर करावे.  किसान सभेतर्फे लासलगाव, पिंपळगाव बसवंत, सिन्नर, मनमाड, चांदवड व नांदगाव बाजार समित्या, तसेच नगर व पुणे जिल्ह्यांतील समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या सभा आयोजित केल्या जाणार आहेत. शेतकऱ्यांसाठी आक्रमक आंदोलन उभे करण्याचा संकल्प केला आहे असेही पत्रकात म्हंटले आहे. पत्रकावर अशोक ढवळे, जे. पी. गावीत, डॉ. अजित नवले, उमेश देशमुख, संजय ठाकूर, चंद्रकांत गोरखाना, सुभाष चौधरी यांच्या सह्या आहेत.

 

टॅग्स :SangliसांगलीFarmers Protestशेतकरी आंदोलन