शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

मंत्र्यांच्या दारात कांदे ओतण्याचा किसान सभेचा इशारा

By संतोष भिसे | Updated: February 26, 2023 18:57 IST

मंत्र्यांच्या दारात कांदे ओतण्याचा किसान सभेचा इशारा दिला आहे. 

सांगली : प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याचा विक्री दर ४५० ते ६०० रुपयांपर्यंत खाली कोसळला आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने कांद्याचा उत्पादन खर्च ८५० ते ९०० रुपये प्रति क्विंटल निश्चित केला आहे. मात्र राज्यात आजमितीला केवळ ४५० ते ६०० रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे शासनाने कांदा उत्पादकांच्या प्रश्नांत हस्तक्षेप करावा, अन्यथा कांदे दारात ओतू असा इशारा किसान सभेने दिला आहे.

प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे की, कांद्याची काढणी आणि वाहतुकीचा खर्चही भरून निघेना झाला आहे. भाजप- शिंदे सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज आहे. सत्ताधारी सत्तेच्या साठमारीत मश्गुल असल्याने शेतकऱ्याला वाली राहिलेला नाही. कोणत्या पक्षाला कोणते चिन्ह मिळाले? कोणाचे आमदार अपात्र झाले? कोणाचे सरकार टिकणार? यातच सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राला गुंतवून टाकले आहे. शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. सरकारने शेतकऱ्यांची संतापजनक उपेक्षा थांबवावी. कांदा उत्पादकांना तातडीने मदत करावी. सरकारने हस्तक्षेप न केल्यास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पणनमंत्री व कृषीमंत्र्यांच्या दारात कांदे ओतण्याचे आंदोलन केले जाईल.  

कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी निर्यातीला प्रोत्साहन द्यावे. निर्यात अनुदान द्यावे. उत्पादकांना प्रतिक्विंटल ६०० रुपये अनुदान जाहीर करावे.  किसान सभेतर्फे लासलगाव, पिंपळगाव बसवंत, सिन्नर, मनमाड, चांदवड व नांदगाव बाजार समित्या, तसेच नगर व पुणे जिल्ह्यांतील समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या सभा आयोजित केल्या जाणार आहेत. शेतकऱ्यांसाठी आक्रमक आंदोलन उभे करण्याचा संकल्प केला आहे असेही पत्रकात म्हंटले आहे. पत्रकावर अशोक ढवळे, जे. पी. गावीत, डॉ. अजित नवले, उमेश देशमुख, संजय ठाकूर, चंद्रकांत गोरखाना, सुभाष चौधरी यांच्या सह्या आहेत.

 

टॅग्स :SangliसांगलीFarmers Protestशेतकरी आंदोलन