शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

तमाशातला राजा विकतोय भेंड्या आणि महाराणीच्या नशिबात कांदे-बटाटे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:32 IST

फोटो संतोष भिसे/लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : टाळेबंदीने लोककलावंतांच्या आयुष्याची फरपट केली आहे. आयुष्यात कधी नव्हे ते प्रथमच इतके ...

फोटो

संतोष भिसे/लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : टाळेबंदीने लोककलावंतांच्या आयुष्याची फरपट केली आहे. आयुष्यात कधी नव्हे ते प्रथमच इतके वाईट दिवस पहावे लागत असल्याची व्यथा कलाकारांनी मांडली. शासनाने त्यांच्यासाठी पाच हजार रुपये मदतीची घोषणा केली असली तरी त्याविषयीदेखील स्पष्टता नाही. मानधन मिळविणाऱ्यांचा अपवाद वगळता अन्य कलाकारांची शासन दरबारी नोंद नाही. शिवाय कलावंत कोणाला म्हणायचे याचीही नेमकी व्याख्या शासनाकडे नाही. त्यामुळे पाच हजारांची शासनाने जाहीर केलेली मदत म्हणजे बिरबलाची खिचडी ठरणार आहे. मदतीविषयी नेमका अध्यादेश अद्याप निघालेला नसल्याने संभ्रमावस्था आहे. जिल्हास्तरावरही अद्याप निश्चित माहिती प्रशासनाला नाही.

बॉक्स

सरकारी मदतीकडे डोळे

- प्रत्येक कलावंतासाठी शासनाने पाच हजार रुपयांची मदत देणार असल्याचे जाहीर केले आहे.

- जिल्हास्तरावर सर्वच कलावंतांची नोंद प्रशासनाकडे नाही, त्यामुळे सर्वांनाच मदत मिळण्याची शक्यता नाही.

- तमाशा कलावंतांची नोंद फड मालकाकडे असली तरी वासुदेव, पोतराज यासह जलसा कलाकारांना मदत मिळणार का? हा प्रश्न आहे.

बॉक्स

मानधन थोडे, सोंगेच फार

- कोरोना काळात अनेक कलावंतांकडून शासनाने कोरोनाविषयक जनजागृतीचे कार्यक्रम करुन घेतले आहेत.

- नव्याने मानधन देतानाही कार्यक्रमांची अपेक्षा ठेवली जाऊ शकते, त्यामुळे मिळणारी मदत मानधनापोटीच खर्ची पडू शकते.

- जनजागृतीचे कार्यक्रम करणाऱ्यांची यादी माहिती कार्यालयाकडे आहे, इतरांचा शोध कसा घेणार, याचीही उत्सुकता असेल.

बॉक्स

जिल्ह्यात मानधन घेणारे २६०० कलाकार

- शासनाचे कलावंत मानधन घेणारे २६०० कलाकार शासनाकडे नोंद आहेत.

- अन्य कलावंतांची अधिृकत नोंद नाही, पण किमान दहा हजारांहून अधिक कलावंत असल्याचा अंदाज आहे.

- कोरोना संकटाला संधी मानून कलावंतांची मोजदाद व नोंदणी शासनाने करावी असा सूर कलाक्षेत्रातून व्यक्त होत आहे.

कोट

कलाक्षेत्र विस्कटले, नवी माणसे आणायची कोठून?

उपासमारीमुळे अनेक कलावंतांनी कलाक्षेत्राला रामराम ठोकला आहे. कोरोना संपल्यावर कार्यक्रमांसाठी नवे कलाकार आणायचे कोठून? सध्या कलाकार परस्परांना मदत करत दिवस कंठत आहेत.

- भास्कर सदाकळे, अध्यक्ष, उमा-बाबा हंगामी तमाशा कलाकार संघटना

आयुष्यभर बोर्डावरच काम केल्याने अन्य कोणतेही काम जमत नाही. फडातील कलाकार भाजीपाला विकून पोट भरताहेत. संकटकाळात शासनानेही पाठ फिरवली. उधार-उसनवार करण्याची क्षमताही संपली आहे.

- शामराव कांबळे, कलावंत, सावळज

चार घरची धुणी-भांडी करुन पोट भरण्याची वेळ आली आहे. आयुष्यात इतके वाईट दिवस कधीच अनुभवले नव्हते. कोरोनामुळे समाजही संकटात आहे, त्यामुळे मदत मागायची कोणाकडे? आता शासनानेच मदत करायला हवी.

- सीताबाई लोंढे, कलावंत, दहीवडी (ता. तासगाव)