शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत फळांच्या राजाला ग्राहकराजा पावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 15:27 IST

रत्नागिरीच्या आंबा उत्पादकांना थेट आंबाविक्री करता यावी आणि ग्राहकांना उत्पादकांकडून त्याच्या खरेदीचा व दर्जाचा लाभ मिळावा, म्हणून आयोजित केलेल्या सांगलीतील आंबा महोत्सवाला पहिल्याच दिवशी ग्राहकराजा पावला. अवघ्या तीन तासात चार टन हापूस आंब्याची विक्री झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देसांगलीत फळांच्या राजाला ग्राहकराजा पावलाचार तासात तब्बल चार टन आंब्याची विक्री

सांगली : रत्नागिरीच्या आंबा उत्पादकांना थेट आंबाविक्री करता यावी आणि ग्राहकांना उत्पादकांकडून त्याच्या खरेदीचा व दर्जाचा लाभ मिळावा, म्हणून आयोजित केलेल्या सांगलीतील आंबा महोत्सवाला पहिल्याच दिवशी ग्राहकराजा पावला. अवघ्या तीन तासात चार टन हापूस आंब्याची विक्री झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी दिली.नैसर्गिकरित्या पिकविलेला आंबा थेट ग्राहकांना उपलब्ध करून देण्यासाठी सांगलीतील मार्केट यार्डात गुरुवारी आंबा महोत्सवाला सुरुवात झाली. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूर व कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आंबा महोत्सवाची सुरुवात झाली.

महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांच्याहस्ते झाले. यावेळी पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक सुभाष घुले, सहायक सरव्यवस्थापक अनिल पवार व सचिव एन. एम. हुल्याळकर, व्ही. जे. राजेशिर्के व बाजार समितीचे संचालक, अधिकारी उपस्थित होते.आंबा महोत्सवात सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण वीस आंबा उत्पादक शेतकरी सहभागी झाले आहेत. सांगली शहरातील ग्राहकांना नैसर्गिकरित्या पिकविलेला व अस्सल हापूस आंबा चाखावयास मिळावा, या उद्देशाने आंबा महोत्सवाचे आयोजन सांगली शहरामध्ये करण्यात आले आहे. बाजार समितीच्या माध्यमातून प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा मध्यस्थांशिवाय थेट उत्पादक शेतकऱ्यांकडून ग्राहकांना रास्त दरात उपलब्ध करण्यात आला आहे.

पहिल्या चार तासात तब्बल चार टन आंब्याची विक्री झाली. तीनशे ते पाचशे रुपये डझन असा सरासरी दर असल्याचे बाजार समितीच्यावतीने सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारातील पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मृती भवनमध्ये २० मेपर्यंत हा महोत्सव सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत सुरु राहणार असून, त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती पाटील व सचिव हुल्याळकर यांनी केले आहे.

टॅग्स :MangoआंबाSangliसांगली