शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

सांगलीत फळांच्या राजाला ग्राहकराजा पावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 15:27 IST

रत्नागिरीच्या आंबा उत्पादकांना थेट आंबाविक्री करता यावी आणि ग्राहकांना उत्पादकांकडून त्याच्या खरेदीचा व दर्जाचा लाभ मिळावा, म्हणून आयोजित केलेल्या सांगलीतील आंबा महोत्सवाला पहिल्याच दिवशी ग्राहकराजा पावला. अवघ्या तीन तासात चार टन हापूस आंब्याची विक्री झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देसांगलीत फळांच्या राजाला ग्राहकराजा पावलाचार तासात तब्बल चार टन आंब्याची विक्री

सांगली : रत्नागिरीच्या आंबा उत्पादकांना थेट आंबाविक्री करता यावी आणि ग्राहकांना उत्पादकांकडून त्याच्या खरेदीचा व दर्जाचा लाभ मिळावा, म्हणून आयोजित केलेल्या सांगलीतील आंबा महोत्सवाला पहिल्याच दिवशी ग्राहकराजा पावला. अवघ्या तीन तासात चार टन हापूस आंब्याची विक्री झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी दिली.नैसर्गिकरित्या पिकविलेला आंबा थेट ग्राहकांना उपलब्ध करून देण्यासाठी सांगलीतील मार्केट यार्डात गुरुवारी आंबा महोत्सवाला सुरुवात झाली. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूर व कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आंबा महोत्सवाची सुरुवात झाली.

महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांच्याहस्ते झाले. यावेळी पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक सुभाष घुले, सहायक सरव्यवस्थापक अनिल पवार व सचिव एन. एम. हुल्याळकर, व्ही. जे. राजेशिर्के व बाजार समितीचे संचालक, अधिकारी उपस्थित होते.आंबा महोत्सवात सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण वीस आंबा उत्पादक शेतकरी सहभागी झाले आहेत. सांगली शहरातील ग्राहकांना नैसर्गिकरित्या पिकविलेला व अस्सल हापूस आंबा चाखावयास मिळावा, या उद्देशाने आंबा महोत्सवाचे आयोजन सांगली शहरामध्ये करण्यात आले आहे. बाजार समितीच्या माध्यमातून प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा मध्यस्थांशिवाय थेट उत्पादक शेतकऱ्यांकडून ग्राहकांना रास्त दरात उपलब्ध करण्यात आला आहे.

पहिल्या चार तासात तब्बल चार टन आंब्याची विक्री झाली. तीनशे ते पाचशे रुपये डझन असा सरासरी दर असल्याचे बाजार समितीच्यावतीने सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारातील पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मृती भवनमध्ये २० मेपर्यंत हा महोत्सव सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत सुरु राहणार असून, त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती पाटील व सचिव हुल्याळकर यांनी केले आहे.

टॅग्स :MangoआंबाSangliसांगली