शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

फळांचा राजा बाजारात दाखल; तेल, तांदळाच्या दरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:23 IST

सांगली : फळांचा राजा अर्थात आंबा या आठवड्यात बाजारात दाखल झाला. उपलब्ध आंब्याचे दरही आवाक्याबाहेर असले तरी आवकेतील वाढ ...

सांगली : फळांचा राजा अर्थात आंबा या आठवड्यात बाजारात दाखल झाला. उपलब्ध आंब्याचे दरही आवाक्याबाहेर असले तरी आवकेतील वाढ लक्षात घेता लवकरच सर्वसामान्यांना आंब्याची चव चाखता येणार आहे. या आठवड्यात खाद्य तेलांच्या दरात सरासरी २० रूपयांनी वाढ झाली तर तांदळाच्या दरात क्विंटलमागे १० ते १५ रूपयांची वाढ झाली आहे. कांदा, लसूण आणि बटाट्याचेही दर वाढले आहेत.

कोकणासह कर्नाटकातून येणाऱ्या आंब्याची फळ मार्केटमध्ये आवक वाढत आहे. सरासरी ४०० ते ५०० रूपये डझनाचे दर असले तरी काही ठिकाणी वाढीव दरानेही विक्री सुरू आहे. कलिंगड, टरबूजाची मोठी आवक या आठवड्यात झाली आहे. पंधरवड्यात अजून आवक वाढणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

चौकट

किराणा मालाच्या दरातील वाढ त्रासदायक ठरत आहेत. आवकेवरच परिणाम झाल्याने तेल, डाळी आणि तांदूळ, गव्हाच्या दरातील वाढ कायम आहे. नवीन तांदूळ बाजारात येत असला तरी दरातील वाढ कायम आहे. खाद्य तेलाने दराचा उच्चांक गाठला आहे.

चाैकट

आंबा आवाक्याबाहेरच

शहरातील फळ विक्रेत्यांकडे आंबा उपलब्ध झाला असला तरी त्याचे दर अद्यापही चढेच आहेत. आणि त्यामानाने आंब्याची चव रसाळ नसल्याचे ग्राहकांनी सांगितले. तरीही आंब्याला मागणी वाढत आहे. या हंगामातील पहिला आंबा म्हणून उत्सुकतेपोटी ग्राहक आंबा खरेदी करत आहेत.

चौकट

भाजीपाला दर स्थिर

गेल्या आठवड्यापर्यंत भाजीपाल्याच्या दरातील वाढ थांबून दर स्थिर झाले आहेत. वांगी, दोडका, गवारीसह अन्य भाज्या सरासरी ४० ते ५० रूपयांना मिळत आहेत. कोथिंबिरीचीही आवक वाढली आहे.

कोट

कोकणातील आंबा आता उपलब्ध होत आहे. त्यास मागणीही चांगली आहे. कलिंगड, टरबूजही उपलब्ध आहेत. उन्हाळ्यात परदेशी फळांना तितकी मागणी नसते त्यामुळे स्थानिकसह देशी फळांची आवक व विक्रीसाठी मालही वाढवला आहे.

इम्रान शेख, व्यापारी

कोट

उन्हाळा सुरू झाल्याने घरोघरी वाळवणाची कामे सुरू आहेत. त्यासाठी लागणारे बटाटे, डाळी, साबुदाणा दरात वाढच होत आहे. त्यामुळे इच्छा असूनही यंदा वर्षभरासाठी लागणारे उन्हाळ काम करता येणार नाही.

सोनाली पवार, गृहिणी

कोट

महिनाभरापासून अपवाद वगळता दररोज तेलाच्या दरात वाढच होत आहे. दर वाढतच चालल्याने ग्राहकांकडून काहीशी मागणीही कमी आली आहे. किराणा मालाचे इतर दरात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गहू आणि तांदळाचे दर मात्र, स्थिर राहतील असा अंदाज आहे.

महेश ढवळे, व्यापारी.