शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

तासगावात नेत्यांच्या महत्त्वाकांक्षेला ‘खोडा’

By admin | Updated: November 4, 2015 23:56 IST

वर्चस्वाचा तराजू दोलायमान : ग्रामपंचायतींसाठी भाजप-राष्ट्रवादीचा श्रेय‘वाद’

दत्ता पाटील- तासगाव तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींचा सारीपाट निकालानंतर स्थिरावला. या ग्रामपंचायतींच्या निकालावर तालुक्यातील सत्तेची आणि वर्चस्वाची समीकरणे ठरणार होती. तालुक्यावर वर्चस्व खासदार गटाचे की आमदार गटाचे, याचा फैसला होणार होता. मात्र निकालाचे एकंदरीत चित्र पाहिल्यास, वर्चस्वाचा तराजू दोलायमानच राहिला. खासदार संजयकाका पाटील आणि आमदार सुमनताई पाटील यांच्या वर्चस्वाच्या महत्त्वाकांक्षेला जनतेनेच खोडा घातल्याचे चित्र या निकालावरून दिसून येत आहे. त्यामुळेच निकालानंतरही वर्चस्व दाखवून देण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांत श्रेयवाद सुरु आहे.तासगाव तालुक्यात यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री आर. आर. पाटील आणि खासदार संजयकाका पाटील यांच्या गटातच ग्रामपंचायतींच्या लढती होत होत्या. यापूर्वी झालेल्या निवडणुकांत या दोन्ही नेत्यांचा प्रभाव असायचा. मात्र आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर, त्यांची जागा आमदार सुमनताई पाटील यांनी घेतली. तालुक्यात काही प्रमाणात राजकीय स्थित्यंतराला सुरुवात झाली. राज्यातील सत्ताबदल आणि तालुक्यातील नेतृत्व बदलामुळे तालुक्यात नव्या राजकीय समीकरणांची गोळाबेरीज सुरु झाली. त्यातूनच आबांच्या पश्चात वर्चस्व कोणाचे? हा प्रश्न ऐरणीवर आला. तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतीत निवडणुका झाल्या. त्यापैकी १९ ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले. या सत्तांतरात आबा गटाबरोबरच काका गटाचेही बालेकिल्ले असणारी गावे ढासळली. यापूर्वी तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर आबा गटाचे एकहाती वर्चस्व होते. त्यामुळे बाजार समितीपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत आबा गटाचेच वर्चस्व असायचे. हे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी खासदार संजयकाका पाटील यांनी यंत्रणा राबविली. त्यामध्ये त्यांना यशही आले. आबा गटाच्या अनेक हुकमी ग्रामपंचायती काका गटाकडे आल्या. तरीही काका गटाला तालुक्यावर एकहाती वर्चस्व मिळविण्यात अपयश आले. मात्र वर्चस्वाच्यादृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्यात यश मिळाले. तालुक्यात घोंघावणारे भाजपचे वादळ थोपविण्याचे आव्हान यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर होते. राष्ट्रवादीच्या शिलेदारांनी स्वत:चे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी केलेल्या संघर्षामुळे बहुतांश ग्रामपंचायतींवर वर्चस्व कायम ठेवण्यात त्यांना यश मिळाले. एकंदरीत ग्रामपंचायत निवडणुकीतील यश हे दोन्ही पक्षांसाठी संमिश्र ठरले, मात्र एकहाती वर्चस्व ठेवणारे निश्चितच नाही. नेत्यांच्या महत्त्वाकांक्षेपेक्षा जनतेची महत्त्वाकांक्षा वेगळी होती. त्यामुळेच जनतेने नेत्यांपेक्षा स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत, स्थानिक सत्ताधाऱ्यांविरोधात नाराजी व्यक्त केली. त्यामुळेच नेत्यांच्या वर्चस्वाची महत्त्वाकांक्षा असफल झाली. अर्थात ही महत्त्वाकांक्षा जनतेनेच फोल ठरवली आहे. तरीही बहुतांश ग्रामपंचायतींवर सत्ता आल्याचा दावा करीत, दोन्ही गटांकडून वर्चस्ववादाचा आटापिटा केला जात आहे. त्यामुळे नेमके वर्चस्व कोणाचे? हे पाहण्यासाठी पुढील निवडणुकांची प्रतीक्षा करावी लागणार, हे निश्चित. भाजपचा आलेखपक्षाची सत्ता व खा. संजय पाटील यांचे खमके नेतृत्व यामुळे या खासदार गटाकडून तालुका काबीज करण्यासाठी यंत्रणा राबवली गेली. राष्ट्रवादीतील पक्षांतर्गत रुसवे-फुगवे असतानाही यश आले नसले तरी, गतवेळच्या तुलनेत तालुक्यात ताकद वाढली आहे.प्रतिष्ठेची लढाई : नेत्यांची महत्त्वाकांक्षा खासदार संजयकाका पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून जिल्ह्याचे नेतृत्व हातात घेतले. या नेतृत्वाला पाठबळ मिळण्यासाठी, त्यांचे होमग्राऊंड असणाऱ्या तासगाव तालुक्यात आपलेच वर्चस्व असायला हवे, ही खासदारांची महत्त्वाकांक्षा प्रबळ झाली. दुसरीकडे आबांच्या पश्चात राष्ट्रवादीचे नेतृत्व स्वीकारलेल्या आमदार सुमनताई पाटील यांचे नेतृत्व मजबूत असल्याचे दाखवून देण्यासाठी, आबांचे तालुक्यावर असलेले वर्चस्व कायम ठेवण्याची महत्त्वाकांक्षा आमदार पाटील यांना होती. त्यामुळेच या दोन्ही नेत्यांनी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.राष्ट्रवादीचा आलेखआबांच्या पश्चात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला कायम ठेवण्याचे आव्हान राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांसमोर होते. खासदार गटाकडून आक्रमक खेळी होणार, हे गृहीत धरूनच राष्ट्रवादीचे शिलेदार सुरुवातीपासूनच तयारीनिशी उतरले होते. गतवेळच्या निवडणुकीशी तुलना करता, यावेळी राष्ट्रवादीची संख्या घटली तरी, वर्चस्व कायम ठेवण्यात यश मिळाले. त्यामुळे राष्ट्रवादीत गड टिकवून ठेवल्याचे समाधानच अधिक आहे.