शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
6
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
8
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
9
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
10
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
11
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
12
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
13
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
14
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
15
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
16
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
17
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
18
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
19
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
20
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?

तासगावात नेत्यांच्या महत्त्वाकांक्षेला ‘खोडा’

By admin | Updated: November 4, 2015 23:56 IST

वर्चस्वाचा तराजू दोलायमान : ग्रामपंचायतींसाठी भाजप-राष्ट्रवादीचा श्रेय‘वाद’

दत्ता पाटील- तासगाव तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींचा सारीपाट निकालानंतर स्थिरावला. या ग्रामपंचायतींच्या निकालावर तालुक्यातील सत्तेची आणि वर्चस्वाची समीकरणे ठरणार होती. तालुक्यावर वर्चस्व खासदार गटाचे की आमदार गटाचे, याचा फैसला होणार होता. मात्र निकालाचे एकंदरीत चित्र पाहिल्यास, वर्चस्वाचा तराजू दोलायमानच राहिला. खासदार संजयकाका पाटील आणि आमदार सुमनताई पाटील यांच्या वर्चस्वाच्या महत्त्वाकांक्षेला जनतेनेच खोडा घातल्याचे चित्र या निकालावरून दिसून येत आहे. त्यामुळेच निकालानंतरही वर्चस्व दाखवून देण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांत श्रेयवाद सुरु आहे.तासगाव तालुक्यात यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री आर. आर. पाटील आणि खासदार संजयकाका पाटील यांच्या गटातच ग्रामपंचायतींच्या लढती होत होत्या. यापूर्वी झालेल्या निवडणुकांत या दोन्ही नेत्यांचा प्रभाव असायचा. मात्र आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर, त्यांची जागा आमदार सुमनताई पाटील यांनी घेतली. तालुक्यात काही प्रमाणात राजकीय स्थित्यंतराला सुरुवात झाली. राज्यातील सत्ताबदल आणि तालुक्यातील नेतृत्व बदलामुळे तालुक्यात नव्या राजकीय समीकरणांची गोळाबेरीज सुरु झाली. त्यातूनच आबांच्या पश्चात वर्चस्व कोणाचे? हा प्रश्न ऐरणीवर आला. तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतीत निवडणुका झाल्या. त्यापैकी १९ ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले. या सत्तांतरात आबा गटाबरोबरच काका गटाचेही बालेकिल्ले असणारी गावे ढासळली. यापूर्वी तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर आबा गटाचे एकहाती वर्चस्व होते. त्यामुळे बाजार समितीपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत आबा गटाचेच वर्चस्व असायचे. हे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी खासदार संजयकाका पाटील यांनी यंत्रणा राबविली. त्यामध्ये त्यांना यशही आले. आबा गटाच्या अनेक हुकमी ग्रामपंचायती काका गटाकडे आल्या. तरीही काका गटाला तालुक्यावर एकहाती वर्चस्व मिळविण्यात अपयश आले. मात्र वर्चस्वाच्यादृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्यात यश मिळाले. तालुक्यात घोंघावणारे भाजपचे वादळ थोपविण्याचे आव्हान यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर होते. राष्ट्रवादीच्या शिलेदारांनी स्वत:चे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी केलेल्या संघर्षामुळे बहुतांश ग्रामपंचायतींवर वर्चस्व कायम ठेवण्यात त्यांना यश मिळाले. एकंदरीत ग्रामपंचायत निवडणुकीतील यश हे दोन्ही पक्षांसाठी संमिश्र ठरले, मात्र एकहाती वर्चस्व ठेवणारे निश्चितच नाही. नेत्यांच्या महत्त्वाकांक्षेपेक्षा जनतेची महत्त्वाकांक्षा वेगळी होती. त्यामुळेच जनतेने नेत्यांपेक्षा स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत, स्थानिक सत्ताधाऱ्यांविरोधात नाराजी व्यक्त केली. त्यामुळेच नेत्यांच्या वर्चस्वाची महत्त्वाकांक्षा असफल झाली. अर्थात ही महत्त्वाकांक्षा जनतेनेच फोल ठरवली आहे. तरीही बहुतांश ग्रामपंचायतींवर सत्ता आल्याचा दावा करीत, दोन्ही गटांकडून वर्चस्ववादाचा आटापिटा केला जात आहे. त्यामुळे नेमके वर्चस्व कोणाचे? हे पाहण्यासाठी पुढील निवडणुकांची प्रतीक्षा करावी लागणार, हे निश्चित. भाजपचा आलेखपक्षाची सत्ता व खा. संजय पाटील यांचे खमके नेतृत्व यामुळे या खासदार गटाकडून तालुका काबीज करण्यासाठी यंत्रणा राबवली गेली. राष्ट्रवादीतील पक्षांतर्गत रुसवे-फुगवे असतानाही यश आले नसले तरी, गतवेळच्या तुलनेत तालुक्यात ताकद वाढली आहे.प्रतिष्ठेची लढाई : नेत्यांची महत्त्वाकांक्षा खासदार संजयकाका पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून जिल्ह्याचे नेतृत्व हातात घेतले. या नेतृत्वाला पाठबळ मिळण्यासाठी, त्यांचे होमग्राऊंड असणाऱ्या तासगाव तालुक्यात आपलेच वर्चस्व असायला हवे, ही खासदारांची महत्त्वाकांक्षा प्रबळ झाली. दुसरीकडे आबांच्या पश्चात राष्ट्रवादीचे नेतृत्व स्वीकारलेल्या आमदार सुमनताई पाटील यांचे नेतृत्व मजबूत असल्याचे दाखवून देण्यासाठी, आबांचे तालुक्यावर असलेले वर्चस्व कायम ठेवण्याची महत्त्वाकांक्षा आमदार पाटील यांना होती. त्यामुळेच या दोन्ही नेत्यांनी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.राष्ट्रवादीचा आलेखआबांच्या पश्चात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला कायम ठेवण्याचे आव्हान राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांसमोर होते. खासदार गटाकडून आक्रमक खेळी होणार, हे गृहीत धरूनच राष्ट्रवादीचे शिलेदार सुरुवातीपासूनच तयारीनिशी उतरले होते. गतवेळच्या निवडणुकीशी तुलना करता, यावेळी राष्ट्रवादीची संख्या घटली तरी, वर्चस्व कायम ठेवण्यात यश मिळाले. त्यामुळे राष्ट्रवादीत गड टिकवून ठेवल्याचे समाधानच अधिक आहे.