शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

खिरवडे, हत्तेगावचे पंप १ डिसेंबरपासून सुरू होणार

By admin | Updated: November 16, 2015 23:58 IST

शिवाजीराव नाईक : ‘वाकुर्डे’च्या आढावा बैठकीत थकबाकीदारांचा वीज पुरवठा बंद करण्याचे आदेश

कोकरूड : वाकुर्डे बुद्रुक योजनेचे खिरवडे, हत्तेगाव येथील पंप १ डिसेंबर रोजी सुरू होतील. २०१३-२०१४ च्या हंगामात काही बड्या शेतकऱ्यांनी ‘वाकुर्डे’चे पाणी घेऊन वीज वितरण कंपनीची बिले जाणूनबुजून थकवली आहेत. त्यांच्या विद्युत पंपाची वीज कनेक्शन्स ताबडतोब तोडावीत, असे आदेश आमदार शिवाजीराव नाईक यांनी दिले. शिराळा तहसील कार्यालयात आयोजित वाकुर्डे योजना आढावा बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे होते. यावेळी शिराळाचे तहसीलदार विजय पाटील, इस्लामपूरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत, पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता टी. टी. सूर्यवंशी, जे. जे. बारदेसकर, शिराळाचे गटविकास अधिकारी, इस्लामपूरचे गटविकास अधिकारी विजय पाटील, जि. प. सदस्य रणधीर नाईक, सुखदेव पाटील, अरविंद बुद्रक, विजय कांबळे, विजय पाटील प्रमुख उपस्थित होते. नाईक म्हणाले, चांदोली धरणात यावर्षी ९३ टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या पाणी साठ्याचा पुरेपूर वापर करण्यासाठी या आढावा बैठकीचे आयोजन केले आहे. वारणा धरणातून डिसेंबर महिन्याच्या १ ते ७ तारखेला पाणी आवर्तन सुरू होणार आहे. चालूवर्षी चांदोली धरणातून एकूण पाच आवर्तनांद्वारे एकूण ३५ दिवस पाणी सोडण्यात येणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी वीज वितरणची वीज बिले देखील थकवली आहेत. त्यावेळच्या २३ लाख थकबाकीपैकी अद्याप १३ लाख बाकी असल्याने वाकुर्डे बुद्रुक योजना अशा शेतकऱ्यांमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. जे शेतकरी जुनी थकबाकी भरणार नाहीत, त्यांच्या वीज मोटारींचे कनेक्शन ताबडतोब तोडावे. नाईक म्हणाले, कऱ्हाड तालुक्याने देखील ‘वाकुर्डे’चे पाणी मांड नदीत सोडावे. घोगाव, उंडाळे तलाव त्यामधून भरून द्यावेत, अशी मागणी केली आहे. पाटबंधारे विभागाने ७ दिवसांचा आवर्तनाचा कालावधी वाढवून तो किमान १० दिवस तसे केल्यास वाकुर्डेचा करमजाई तलाव भरेल. करमजाई भरल्यावर पहिल्या टप्प्यात कऱ्हाड तालुक्यालादेखील पाणी मिळेल. याकरिता २० एम.सी.एफ.टी. पाण्याची आवश्यकता आहे. यावेळी अरविंद पाटील, विजय कांबळे, विजय पाटील, सुनील पाटील, नामदेव पाटील यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)‘वीज वितरण’चे अधिकारी धारेवर खिरवडे व हत्तेगाव पंप हाऊसच्या दुरूस्तीसाठी त्याठिकाणी सिंगल फेज कनेक्शन वीज वितरण कंपनीने तातडीने द्यावीत, या विषयावरून आमदार नाईक वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले. काहीही करा, कायदा व व्यवहार, लोकांची तातडीची गरज पाहून याठिकाणी ताबडतोब सिंगल फेज वीज कनेक्शन द्या, तुमच्यामुळे वाकुर्डे बुद्रुक योजनेत पाणी सोडण्यास विलंब झाल्यास आपल्याला जबाबदार धरण्यात येईल. जर याबाबत कार्यवाही झाली नाही, तर जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत संबंधित सर्व विभागांची बैठक बोलावण्यात येईल, असा इशारा नाईक यांनी दिला.