शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
3
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
4
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
5
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
6
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
7
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
8
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
9
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
10
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
11
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
12
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
13
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
14
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
15
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...
16
Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले
17
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
18
Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?

उच्च शिक्षणाचा सुरू आहे खेळखंडोबा; शाळा सुरू, महाविद्यालयांबाबत मात्र चालढकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:32 IST

सांगली : कोरोनाचा प्रभाव कमी होताच मंदिरे, दुकाने, खेळ, आदींना सरकारने परवानगी दिली. मग महाविद्यालयांनीच काय घोडे मारले आहे? ...

सांगली : कोरोनाचा प्रभाव कमी होताच मंदिरे, दुकाने, खेळ, आदींना सरकारने परवानगी दिली. मग महाविद्यालयांनीच काय घोडे मारले आहे? असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे. दहा महिन्यांपासून महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचे अपरिमित शैक्षणिक नुकसान होत आहे, त्याला सरकारच जबबादार असल्याचा आरोपही त्यांनी केला.

पहिल्या टप्प्यात नववी ते बारावी आणि आता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. जलतरण तलाव, मंदिरे, चित्रपटगृहे, मॉल, आदींना परवानगी मिळाली, महाविद्यालये मात्र अजूनही बंदच आहेत. ती सुरू करण्याविषयी शासकीय स्तरावर ठोस निर्णय होत नसून शिक्षण विभागही खेळखंडोबा करीत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे.

दहा महिन्यांपासून विद्यार्थी मोबाईलमध्ये डोळे खुपसून बसले आहेत. अभियांत्रिकीचे विद्यार्थी तर सकाळी सातपासून संध्याकाळी सहापर्यंत मोबाईलमध्येच अडकून पडलेत. अभ्यासाचे होणारे नुकसान क्लासेसमधून भरून काढण्याची विद्यार्थ्यांची धडपड सुरू आहे. सरकारच्या धरसोडीच्या वृत्तीमुळे विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळ सुरू असल्याच्या प्रतिक्रिया आहेत.

चौकट

महाविद्यालये बंद, तरीही कॅम्पसमध्ये वर्दळ

सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांचे डोळे महाविद्यालये सुुरू होण्याकडे लागून राहिले आहेत. महाविद्यालये सुरू नसली तरी प्रशासकीय कामे, प्राध्यापकांचे मार्गदर्शन यासाठी कॅम्पसमध्ये गर्दी वाढत आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालये बंदचा मोठा शैक्षणिक फटका बसला आहे. अभियांत्रिकी, आयटीआय, कायदा, वैद्यकीय, आदी शाखांच्या विद्यार्थ्यांची कसरत सुरू आहे.

पॉईंटर्स

एकूण महाविद्यालये - २१६

एकूण विद्यार्थी संख्या - ११५०००

कोट

सरकारने मद्यालये, मंदिरे, हॉटेल्स, व्यायामशाळांना परवानगी दिली. मग महाविद्यालयेच बंद का, असा आमचा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीची जबाबदारी सरकार घेणार आहे काय, हेदेखील स्पष्ट झाले पाहिजे. पाचवी ते बारावीपर्यंतचे सर्व वर्ग सुरू झाले; त्यामुळे वरिष्ठ महाविद्यालयांचा निर्णय सरकारने त्वरित घ्यायला हवा.

- प्रतीक पाटील, अभाविप

कोट

महाविद्यालये बंद असल्याने होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीला सरकारच जबाबदार आहे. महाविद्यालेय त्वरित सुरू झाली नाहीत तर आम्हाला आक्रमक व्हावे लागेल. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शैक्षणिक सत्र तातडीने सुरू केले पाहिजे.

- माधुरी लड्डा, अभाविप

कोट

कोरोनाविषयक खबरदारी घेऊन महाविद्यालये सुरू व्हायला हवीत. सध्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अत्यंत कमी आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने सर्व महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला पाहिजे. विद्यार्थ्यांनीही आरोग्याची काळजी घेत महाविद्यालयात उपस्थिती लावायला हवी.

- सौरभ पाटील, एनएसयूआय

कोट

ऑनलाईन शिक्षणामुळे गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे महाविद्यालये सुुरू व्हायला हवीत. खासगी क्लासेसना परवानगी देताना सरकारने महाविद्यालयांचाही विचार करायला हवा होता. कोरोना बहुतांश संपुष्टात आल्याने महाविद्यालयांचे दरवाजे उघडायला हवेत.

- श्रेयस मोहिते, विद्यार्थी

-------------