शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

खरसुंडीत सिध्दनाथाची पौषी यात्रा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 00:04 IST

खरसुंडी : खरसुंडी (ता. आटपाडी) येथील श्री सिध्दनाथाची पौषी यात्रा सुरू झाली असून, ती खिलार जनावरांसाठी प्रसिध्द आहे. जातीवंत खिलार जनावरे आणि महाराष्टÑ, कर्नाटक , आंध्र प्रदेशातून खरेदी-विक्री करण्यासाठी व्यापारी दाखल झाले आहेत.पौष पौर्णिमेला दोन दिवस शेळ्या-मेंढ्यांची यात्रा भरत असते. त्यानंतर आठ ते दहा दिवस जनावरांची खरेदी-विक्री होत असते. यात्रेसाठी ...

खरसुंडी : खरसुंडी (ता. आटपाडी) येथील श्री सिध्दनाथाची पौषी यात्रा सुरू झाली असून, ती खिलार जनावरांसाठी प्रसिध्द आहे. जातीवंत खिलार जनावरे आणि महाराष्टÑ, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून खरेदी-विक्री करण्यासाठी व्यापारी दाखल झाले आहेत.पौष पौर्णिमेला दोन दिवस शेळ्या-मेंढ्यांची यात्रा भरत असते. त्यानंतर आठ ते दहा दिवस जनावरांची खरेदी-विक्री होत असते. यात्रेसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती, देवस्थान, ग्रामपंचायत यांनी वीज, पाणी, जागा यांचे नियोजन केले आहे. जनावरांसाठी पुरेसे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. यात्रा तळावर वीज व इतर सुविधा दिल्या असून गुरूवार ते शनिवारपर्यंत यात्रेत गर्दी होणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब गायकवाड यांनी सांगितले.पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकर आणि गावातील सार्वजनिक नळांना पुरेसे पाणी सोडले जात आहे. आरोग्य विभागाने यात्रेसाठी जादा औषधसाठा, डॉक्टर, कर्मचारी यांचे नियोजन केले आहे, असे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी विनायक हात्तेकर यांनी सांगितले. यात्रेसाठी चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला असून, यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस खाते दक्ष असून, नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे पोलिस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी आवाहन केले आहे.एसटीच्या विविध आगारांतून यात्रा स्पेशल जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. यात्राकाळात एसटी स्थानकामध्ये यात्रेकरूंसाठी ज्येष्ठ नागरिक सेवा मंडळाच्यावतीने झुणका-भाकर केंद्र चालू केले आहे. दहा रुपयांत ही सेवा दिली जाणार असल्याचे बाळासाहेब पाठक यांनी सांगितले. परिसरातील शेतकरी तसेच नजीकच्या सोलापूर, कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यातून जनावरांची मोठी आवक होत आहे. छोटी-मोठी हॉटेल्स, खानावळी, दुकाने गावात दाखल झाली आहेत. यामुळे गावातील बाजारपेठ फुलून गेली आहे. सिध्दनाथाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक खरसुंडीत दाखल होत आहेत.सोमवारी प्रदर्शन : विजेत्यास मानचिन्हसोमवार, दि. ८ रोजी जनावरांचे प्रदर्शन भरविण्यात येणार असून, विजेत्यास मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. शेतकºयांनी प्रदर्शनाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रामपंचायतीक डून करण्यात आले आहे.यात्रेकरूंना सुविधायात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब गायकवाड, सरपंच सौ. लता पुजारी, उपसरपंच जितेंद्र पाटील, माजी उपसरपंच अर्जुन सावकार, विजय भांगे, ग्रामपंचायत, देवस्थान, कृषी उत्पन्न बाजार समिती संंयुुक्तपणे प्रयत्न करीत असून, यात्रेकरूंसाठी यात्रेच्या ठिकाणी जागा वाटप, पाणी पुरवठा, आरोग्य सुविधा दिली जात आहे.