शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगाम गेला वाया, रब्बीवरही संकट दाटले; निम्म्या सांगली जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 23:54 IST

अशोक डोंबाळे । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस पुरेसा न झाल्यामुळे खरिपाच्या केवळ ८३ टक्केच पेरण्या ...

अशोक डोंबाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस पुरेसा न झाल्यामुळे खरिपाच्या केवळ ८३ टक्केच पेरण्या झाल्या. त्यानंतरही पावसाचा जोर नसल्यामुळे दुष्काळी तालुक्यातील पेरण्या पूर्णत: वाया गेल्या आहेत. आता आॅक्टोबर महिना निम्मा संपला तरी, परतीचा मान्सून पाऊस झाला नसल्यामुळे रब्बीच्या पेरण्याही पूर्णत: खोळंबल्या आहेत. जिल्ह्यात केवळ ६ टक्केच रब्बीच्या पेरण्या झाल्यामुळे निम्म्या जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट आले आहे.जिल्ह्यात दोन लाख ७५ हजार ४२९ हेक्टर खरीप पेरणीचे क्षेत्र होते. त्यापैकी दोन लाख २७ हजार ५७२ हेक्टरवर म्हणजे ८३ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली होती. उर्वरित १७ टक्के क्षेत्रावर पेरणीच झाली नाही. मान्सूनपूर्व पावसाने जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव, मिरज पूर्व तालुक्यात हजेरी लावली होती. त्यावर लगेचच शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. पण, त्यानंतर पावसाने हुलकावणीच दिली. त्यामुळे फूटभर उगवून आल्यानंतर पिके वाळून गेली आहेत.जिल्ह्यात सोयाबीनचे ५७ हजार १४६ हेक्टर क्षेत्र होते. त्यापैकी ३९ हजार १५९ हेक्टरवरच म्हणजे ६९ टक्के पेरणी झाली होती. ३१ टक्के क्षेत्रावर खरीप पेरणीच झाली नाही. त्यामुळे सोयाबीनला चांगला दर मिळण्याची अपेक्षा आहे. खरीप मका पिकाचे जिल्ह्यात सरासरी ३० हजार ३१० हेक्टर क्षेत्र होते. यामध्ये पाच हजार हेक्टरने वाढ होऊन ३५ हजार ५०८ हेक्टरवर पेरणी झाली होती. कमी कालावधित खात्रीशीर उत्पन्न मिळत असल्यामुळे शेतकरी मका पिकाकडे वळला आहे. कडधान्याची केवळ ५३ टक्के पेरणी झाली असून कापसाची तर केवळ ३ टक्केच टोकण झाली आहे. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यात काही गावातच कापूस लागवड केली जाते.खरीप हंगामाचे विदारक चित्र असताना, शेतकरी परतीच्या पावसाकडे लक्ष ठेवून होता. जमिनीची मशागत करून शेतकरी रब्बीच्या पेरणीसाठी सज्ज असताना, परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. जिल्ह्यात रब्बीचे दोन लाख ५१ हजार ४६७ हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी आतापर्यंत केवळ १५ हजार ९२० हेक्टरवरच पेरणी झाली आहे. तिची टक्केवारी केवळ ६ टक्के आहे.रब्बी हंगामातील पेरणी सर्वसाधारणपणे १ आॅक्टोबरपासून सुरू होते. परंतु, पुरेसा पाऊस नसल्यामुळे यावेळी पेरण्याच नाहीत. वाळवा, शिराळा, मिरज, पलूस तालुक्यातील नदीकाठच्या गावांनी रब्बीच्या पेरण्या सुरु केल्या आहेत. विहिरी, पाणीपुरवठा योजनांमधून पाणी देऊन गहू, हरभरा, ज्वारी, रब्बी मका पेरणीस सुरुवात केली आहे. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव, कडेगाव, मिरज पूर्व तालुक्यातील शेतकºयांनी रब्बी हंगामातील पेरण्याच सुरू केलेल्या नाहीत. परतीच्या पावसाचा जोर नसल्यामुळे रब्बी हंगामही वाया जाण्याची भीती शेतकºयांना वाटत आहे. निम्म्या जिल्ह्यावर सध्या दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे.विहिरी, तलावांनी : तळ गाठलानिम्म्या जिल्ह्यात मान्सून आणि परतीचा पाऊसच झाला नसल्यामुळे जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर तालुक्यातील पाझर तलाव आणि विहिरी, कूपनलिकांनी तळ गाठला आहे. जिल्ह्यात मध्यम प्रकल्प पाच आणि लघु प्रकल्प ७९ असून, यापैकी वाळवा, शिराळा आणि मिरज तालुक्यातील दहा लघु प्रकल्पांतच १०० टक्के पाणीसाठा आहे. उर्वरित सर्व प्रकल्पात २५ ते ३५ टक्केच पाणीसाठा आहे. यामुळे जत, आटपाडी, तासगाव, खानापूर तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनास टँकर सुरु करावे लागणार आहेत. जिल्हा प्रशासनाने त्यादृष्टीने नियोजनही सुरु केले आहे.