शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

पावसाने दडी मारल्याने खरीप धोक्यात

By admin | Updated: July 12, 2017 00:05 IST

पावसाने दडी मारल्याने खरीप धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यात खरीप हंगामासाठी तीन लाख ९१ हजार ५०० हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी ६१ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मात्र सध्या पावसाने दडी मारल्यामुळे जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर, मिरज पूर्व तालुक्यातील कोवळ्या पिकांनी माना टाकल्या आहेत. मागील वर्षापेक्षा यावर्षी ५० टक्केही पाऊस झाला नसल्यामुळे ७९ लघु प्रकल्पात तीन टक्के, तर पाच मध्यम प्रकल्पांत केवळ एक टक्का पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे खरीप हंगामातील पिके जगविणे हे आव्हान ठरणार आहे.जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र अत्यंत भिन्न आहे. शिराळा, वाळवा, पलूस, मिरज पश्चिम, तासगाव पश्चिम भाग आणि कडेगाव तालुक्यातील बहुतांशी खरीप पेरण्या मान्सून पावसावर होतात. पेरण्या झाल्यानंतर पाऊस गायब झाल्यास ८५ टक्के पिके वारणा आणि कृष्णा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. या भागातील खरीप पेरण्या वाया जाण्याचा धोका कमी आहे. परंतु, यासाठी नदीमध्ये पुरेशा प्रमाणात पाणीसाठा असण्याची गरज आहे. उर्वरित १५ टक्के पेरण्या केवळ पावसावरच अवलंबून आहेत. येथील पिके सध्या अडचणीत आहेत. जिल्ह्याचा सर्वाधिक मोठा भाग दुष्काळी पट्ट्यात येत आहे. यामध्ये खानापूर, आटपाडी, तासगाव, जत, कवठेमहांकाळ, मिरज पूर्व आणि कडेगाव तालुक्यातील काही भागाचा समावेश होत आहे. या भागामध्ये मान्सूनपूर्व पाऊस काहीप्रमाणात झाल्यामुळे येथील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. पाऊस येईल म्हणून शेतकऱ्यांनी आतापर्यंत ६१ टक्के पेरण्या पूर्ण केल्या आहेत. बाजरी, ज्वारीची ८२.२ टक्के झाली आहे. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यात उडिदाची ९२ टक्के, तर मूग आणि तुरीची ३८ टक्के पेरणी झाली आहे. येथील पिके अर्धा ते एक फूट वाढून कोमेजली आहेत. माळरानावरील पिकांनी तर मानाच टाकल्या असून, दोन दिवसांत पाऊस आला नाही, तर येथे दुबार पेरणीच करावी लागणार आहे. पलूस, वाळवा, खानापूर, शिराळा, मिरज पश्चिम, तासगाव पश्चिम भागामध्ये सोयाबीनची पेरणी केली जाते. मान्सून पावसाचा जोर नसल्यामुळे केवळ २९.६ टक्केच पेरण्या झाल्या आहेत. उर्वरित शेतकऱ्यांचे आभाळाकडे लक्ष लागले आहे. जोराचा पाऊस झाल्याशिवाय येथील पेरण्या होणार नसल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दुसरीकडे हवामान खात्याचे अंदाजही सध्या चुकत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. ..तरच पिके वाचू शकतील : राजेंद्र साबळेजिल्ह्यात मागील वर्षाच्या तुलनेत नक्कीच पाऊस कमी आहे. पण, येत्या चार दिवसांत पाऊस झाल्यास खरीप हंगामातील पिके वाचण्यास मदत होईल. पाऊस झालाच नाही, तर खरीप हंगामातील दुष्काळी भागातील पिके वाया जाण्याची शक्यता आहे. चार दिवस वाट पाहून जिल्ह्यातील खरीप हंगामातील पेरणीचा सद्य:स्थितीचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे यांनी दिली.जिल्ह्यात आजअखेर झालेली पेरणीपीकपेरणी झालेले क्षेत्रभात१४७४० हेक्टरज्वारी२७०१० हेक्टरबाजरी३५०७४ हेक्टरमका१४६२४ हेक्टरतूर२८८७ हेक्टरमूग२९१९ हेक्टरउडीद७२३९ हेक्टरभुईमूग१२९५६ हेक्टरसोयाबीन२६३९७ हेक्टरजिल्ह्यातील पाऊस मि.मी.तालुका११ जुलै १७११ जुलै १६मिरज६३.८ २५७.२ जत१३९.२११९.२खानापूर७५.३१२४.५वाळवा१०३.६२५३.४तासगाव५२.५१६९.७शिराळा२४१.९५३०.२आटपाडी१४३.५१३६.२क़महांकाळ१२३.६२४२.१पलूस६५.२२०५.१कडेगाव६६.८१९३.२एकूण१०८.५२२०.३