शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

पावसाने दडी मारल्याने खरीप धोक्यात

By admin | Updated: July 12, 2017 00:05 IST

पावसाने दडी मारल्याने खरीप धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यात खरीप हंगामासाठी तीन लाख ९१ हजार ५०० हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी ६१ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मात्र सध्या पावसाने दडी मारल्यामुळे जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर, मिरज पूर्व तालुक्यातील कोवळ्या पिकांनी माना टाकल्या आहेत. मागील वर्षापेक्षा यावर्षी ५० टक्केही पाऊस झाला नसल्यामुळे ७९ लघु प्रकल्पात तीन टक्के, तर पाच मध्यम प्रकल्पांत केवळ एक टक्का पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे खरीप हंगामातील पिके जगविणे हे आव्हान ठरणार आहे.जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र अत्यंत भिन्न आहे. शिराळा, वाळवा, पलूस, मिरज पश्चिम, तासगाव पश्चिम भाग आणि कडेगाव तालुक्यातील बहुतांशी खरीप पेरण्या मान्सून पावसावर होतात. पेरण्या झाल्यानंतर पाऊस गायब झाल्यास ८५ टक्के पिके वारणा आणि कृष्णा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. या भागातील खरीप पेरण्या वाया जाण्याचा धोका कमी आहे. परंतु, यासाठी नदीमध्ये पुरेशा प्रमाणात पाणीसाठा असण्याची गरज आहे. उर्वरित १५ टक्के पेरण्या केवळ पावसावरच अवलंबून आहेत. येथील पिके सध्या अडचणीत आहेत. जिल्ह्याचा सर्वाधिक मोठा भाग दुष्काळी पट्ट्यात येत आहे. यामध्ये खानापूर, आटपाडी, तासगाव, जत, कवठेमहांकाळ, मिरज पूर्व आणि कडेगाव तालुक्यातील काही भागाचा समावेश होत आहे. या भागामध्ये मान्सूनपूर्व पाऊस काहीप्रमाणात झाल्यामुळे येथील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. पाऊस येईल म्हणून शेतकऱ्यांनी आतापर्यंत ६१ टक्के पेरण्या पूर्ण केल्या आहेत. बाजरी, ज्वारीची ८२.२ टक्के झाली आहे. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यात उडिदाची ९२ टक्के, तर मूग आणि तुरीची ३८ टक्के पेरणी झाली आहे. येथील पिके अर्धा ते एक फूट वाढून कोमेजली आहेत. माळरानावरील पिकांनी तर मानाच टाकल्या असून, दोन दिवसांत पाऊस आला नाही, तर येथे दुबार पेरणीच करावी लागणार आहे. पलूस, वाळवा, खानापूर, शिराळा, मिरज पश्चिम, तासगाव पश्चिम भागामध्ये सोयाबीनची पेरणी केली जाते. मान्सून पावसाचा जोर नसल्यामुळे केवळ २९.६ टक्केच पेरण्या झाल्या आहेत. उर्वरित शेतकऱ्यांचे आभाळाकडे लक्ष लागले आहे. जोराचा पाऊस झाल्याशिवाय येथील पेरण्या होणार नसल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दुसरीकडे हवामान खात्याचे अंदाजही सध्या चुकत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. ..तरच पिके वाचू शकतील : राजेंद्र साबळेजिल्ह्यात मागील वर्षाच्या तुलनेत नक्कीच पाऊस कमी आहे. पण, येत्या चार दिवसांत पाऊस झाल्यास खरीप हंगामातील पिके वाचण्यास मदत होईल. पाऊस झालाच नाही, तर खरीप हंगामातील दुष्काळी भागातील पिके वाया जाण्याची शक्यता आहे. चार दिवस वाट पाहून जिल्ह्यातील खरीप हंगामातील पेरणीचा सद्य:स्थितीचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे यांनी दिली.जिल्ह्यात आजअखेर झालेली पेरणीपीकपेरणी झालेले क्षेत्रभात१४७४० हेक्टरज्वारी२७०१० हेक्टरबाजरी३५०७४ हेक्टरमका१४६२४ हेक्टरतूर२८८७ हेक्टरमूग२९१९ हेक्टरउडीद७२३९ हेक्टरभुईमूग१२९५६ हेक्टरसोयाबीन२६३९७ हेक्टरजिल्ह्यातील पाऊस मि.मी.तालुका११ जुलै १७११ जुलै १६मिरज६३.८ २५७.२ जत१३९.२११९.२खानापूर७५.३१२४.५वाळवा१०३.६२५३.४तासगाव५२.५१६९.७शिराळा२४१.९५३०.२आटपाडी१४३.५१३६.२क़महांकाळ१२३.६२४२.१पलूस६५.२२०५.१कडेगाव६६.८१९३.२एकूण१०८.५२२०.३