शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

कडेगाव तालुक्यात खरीप हंगाम वाया : ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 23:41 IST

यावर्षी पावसाने शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेली पिके आणि सुगीचा आनंदही हिरावून घेतला आणि कर्जाचा बोजा मात्र जसाच्या तसाच ठेवला आहे. एवढे करूनही परतीचा पाऊस अजून माघारी जाण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे शेतक-यांची चिंता वाढली आहे.

ठळक मुद्देद्राक्षबागा, भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान

प्रताप महाडिक ।कडेगाव : यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीला पेरण्यांची गणिते बिघडवून जूनमध्ये थोडासा उशिरा दाखल झालेला पाऊस तब्बल पाच महिने उलटले तरी कोसळतच आहे. कडेगाव तालुक्यात तर अतिवृष्टीने सारा खरीप हंगाम गिळून टाकला. शेतांमध्ये पाणी साठून ज्वारी, भात, सोयाबीन, भुईमूग आणि कडधान्ये कुजून गेली. यामुळे दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत सुगीचा काळ धो धो पावसातच गेला. आता धन-धान्याच्या राशी घरात आणण्याऐवजी, शेतात जाऊन सडलेली पिके पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यामुळे तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

यावर्षी पावसाने शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेली पिके आणि सुगीचा आनंदही हिरावून घेतला आणि कर्जाचा बोजा मात्र जसाच्या तसाच ठेवला आहे. एवढे करूनही परतीचा पाऊस अजून माघारी जाण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे शेतक-यांची चिंता वाढली आहे. यावर्षी पावसाळ्यात जून ते सप्टेंबरअखेर ६६७ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली. यानंतर आॅक्टोबरमध्येही सातत्याने आवकाळी पाऊस कोसळला आहे.

शेतक-यांची खरीप पिके वाया गेली असताना शासनाच्या कृषी विभागाने मात्र अद्याप नुकसानीचे पंचनामे केलेले नाहीत. राज्यातील सरकार अद्याप स्थापन झालेले नाही. तोपर्यंतच शेतकºयांपुढे पीक नुकसानीचा प्रश्न आ वासून उभा आहे.

मागीलवर्षी कोरड्या दुष्काळाने आणि यावर्षी ओल्या दुष्काळाने शेतकºयांच्या शेतातील हिरव्या सोन्याची लयलूट केली आणि शेती व्यवसायातील आनंदच हिरावून घेतला. हाता-तोंडाशी आलेली पिके डोळ्यांदेखत सडून जाताना पाहायची वेळ शेतकºयांवर आली. कडेगाव तालुक्यातील भात, ज्वारी, सोयाबीन आणि भुईमूग या पिकांसह कडधान्याचेही मोठे नुकसान झाले आहे. अगदी द्राक्षबागा आणि भाजीपाला पिकांनाही अतिवृष्टीचा फटका बसला आहे. यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

खरिपातील हातची पिके वाया गेल्याने आता रब्बीच्या पेरण्या कशा करायच्या, खते व बी-बियाणे यासाठी पैसे कुठून आणायचे, याची चिंता शेतक-यांसमोर आहे. अशा संकटात सापडलेल्या शेतकºयांचे अश्रू पुसण्याची गरज आहे. यासाठी नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.उसालाही फटकाअतिवृष्टीमुळे शेतात अद्यापही साचून राहिलेल्या पाण्याने ऊसही कुजतोय. जिथे निचरा होऊन पाणी निघून गेले, तिथेही उसाला फुटवा नाही आणि वाढही नाही. साहजिकच त्याचे दुष्परिणाम यंदाच्या आणि पुढील साखर हंगामावरही होतील. साखर कारखान्यांना गाळपासाठी पुरेसा ऊस मिळविण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे. दरम्यान, साखर उत्पादन मर्यादित राहिल्यामुळे उसाला चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा शेतकºयांना आहे. 

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी