शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

कडेगाव तालुक्यात खरीप हंगाम वाया : ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 23:41 IST

यावर्षी पावसाने शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेली पिके आणि सुगीचा आनंदही हिरावून घेतला आणि कर्जाचा बोजा मात्र जसाच्या तसाच ठेवला आहे. एवढे करूनही परतीचा पाऊस अजून माघारी जाण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे शेतक-यांची चिंता वाढली आहे.

ठळक मुद्देद्राक्षबागा, भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान

प्रताप महाडिक ।कडेगाव : यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीला पेरण्यांची गणिते बिघडवून जूनमध्ये थोडासा उशिरा दाखल झालेला पाऊस तब्बल पाच महिने उलटले तरी कोसळतच आहे. कडेगाव तालुक्यात तर अतिवृष्टीने सारा खरीप हंगाम गिळून टाकला. शेतांमध्ये पाणी साठून ज्वारी, भात, सोयाबीन, भुईमूग आणि कडधान्ये कुजून गेली. यामुळे दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत सुगीचा काळ धो धो पावसातच गेला. आता धन-धान्याच्या राशी घरात आणण्याऐवजी, शेतात जाऊन सडलेली पिके पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यामुळे तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

यावर्षी पावसाने शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेली पिके आणि सुगीचा आनंदही हिरावून घेतला आणि कर्जाचा बोजा मात्र जसाच्या तसाच ठेवला आहे. एवढे करूनही परतीचा पाऊस अजून माघारी जाण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे शेतक-यांची चिंता वाढली आहे. यावर्षी पावसाळ्यात जून ते सप्टेंबरअखेर ६६७ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली. यानंतर आॅक्टोबरमध्येही सातत्याने आवकाळी पाऊस कोसळला आहे.

शेतक-यांची खरीप पिके वाया गेली असताना शासनाच्या कृषी विभागाने मात्र अद्याप नुकसानीचे पंचनामे केलेले नाहीत. राज्यातील सरकार अद्याप स्थापन झालेले नाही. तोपर्यंतच शेतकºयांपुढे पीक नुकसानीचा प्रश्न आ वासून उभा आहे.

मागीलवर्षी कोरड्या दुष्काळाने आणि यावर्षी ओल्या दुष्काळाने शेतकºयांच्या शेतातील हिरव्या सोन्याची लयलूट केली आणि शेती व्यवसायातील आनंदच हिरावून घेतला. हाता-तोंडाशी आलेली पिके डोळ्यांदेखत सडून जाताना पाहायची वेळ शेतकºयांवर आली. कडेगाव तालुक्यातील भात, ज्वारी, सोयाबीन आणि भुईमूग या पिकांसह कडधान्याचेही मोठे नुकसान झाले आहे. अगदी द्राक्षबागा आणि भाजीपाला पिकांनाही अतिवृष्टीचा फटका बसला आहे. यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

खरिपातील हातची पिके वाया गेल्याने आता रब्बीच्या पेरण्या कशा करायच्या, खते व बी-बियाणे यासाठी पैसे कुठून आणायचे, याची चिंता शेतक-यांसमोर आहे. अशा संकटात सापडलेल्या शेतकºयांचे अश्रू पुसण्याची गरज आहे. यासाठी नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.उसालाही फटकाअतिवृष्टीमुळे शेतात अद्यापही साचून राहिलेल्या पाण्याने ऊसही कुजतोय. जिथे निचरा होऊन पाणी निघून गेले, तिथेही उसाला फुटवा नाही आणि वाढही नाही. साहजिकच त्याचे दुष्परिणाम यंदाच्या आणि पुढील साखर हंगामावरही होतील. साखर कारखान्यांना गाळपासाठी पुरेसा ऊस मिळविण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे. दरम्यान, साखर उत्पादन मर्यादित राहिल्यामुळे उसाला चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा शेतकºयांना आहे. 

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी