शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
4
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
5
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
6
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
7
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
8
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
9
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
10
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
11
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
12
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
13
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
14
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
15
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
16
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
17
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
18
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
19
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
20
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली

खानापूर तालुका मार्चपूर्वी ‘निर्मल’ करा

By admin | Updated: February 9, 2016 00:15 IST

अनिल बाबर : विट्यातील कार्यशाळेत सरपंच, ग्रामसेवकांना सूचना

विटा : शौचालय बांधकामासाठी जागा नाही, अगोदर अनुदान द्या, यासह अन्य अडचणी सांगू नका. ज्या ठिकाणी खरोखरच अडचण आहे, तेथे प्रशासनासह आम्ही येऊ. महसूल प्रशासनाचे शौचालय बांधकामासाठी सहकार्य राहील, त्यामुळे खानापूर तालुका मार्चपूर्वी हागणदारीमुक्त झाला पाहिजे, त्यासाठी सरपंच व ग्रामसेवकांनी प्रयत्नशील राहावे, अशी सूचना आ. अनिल बाबर यांनी दिली.येथे खानापूर पंचायत समितीच्यावतीने तालुका शंभर टक्के हागणदारी मुक्त करण्याच्यादृष्टीने आयोजित सरपंच व ग्रामसेवकांच्या कार्यशाळेत आ. बाबर बोलत होते. यावेळी सभापती सौ. वैशाली माळी, उपसभापती सुहास बाबर, जि. प. सदस्य फिरोज शेख, जि. प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ, प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार कल्पना ढवळे, पोलीस निरीक्षक मोहन जाधव उपस्थित होते. या कार्यशाळेत खानापूर तालुका २५ मार्चपूर्वी हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प सोडण्यात आला.आ. बाबर म्हणाले, केंद्र शासनाच्या नवीन धोरणानुसार सांगली जिल्ह्यातील एकही तालुका अद्याप हागणदारीमुक्त झालेला नाही. खानापूर तालुक्याला संधी आहे. त्यामुळे ग्रामसेवक व सरपंचांनी कोणतीही अडचण न सांगता ध्येयाने काम करून तालुका संपूर्ण हागणदारीमुक्त केला पाहिजे. आगामी काळात या कामासाठी प्रयत्न करणाऱ्या सरपंच व ग्रामसेवकांचा प्रशासनाच्यावतीने विशेष सन्मान केला जाईल.रविकांत आडसूळ यांनी, सांगली जिल्ह्यात एकही तालुका हागणदारीमुक्त नसल्याचे सांगून, ग्रामसेवक, सरपंच यांनी प्रामाणिक प्रयत्न केल्यास खानापूर तालुका तसा होण्यास कोणतीही अडचण नसल्याचे सांगितले. यावेळी आ. बाबर यांनी तालुक्यातील नागेवाडी, खानापूर, लेंगरे, भाळवणी जि. प. गटनिहाय शौचालय बांधकाम, उद्दिष्ट व अडचणींची सरपंच, ग्रामसेवकांकडून आढावा घेतला.काही ठिकाणी वन विभाग आणि गायरान जमिनीत घरांची अतिक्रमणे असल्याने त्या लाभार्थ्यांना अनुदान देण्यात अडचण असल्याचे ग्रामसेवकांनी सांगितले. भाळवणी परिसरात वाळू मिळत नसल्याने कामे थांबल्याचे माजी सरपंच महेश घोरपडे यांनी सांगितले.निर्मलग्राममध्ये उत्कृष्ट काम केलेल्या सरपंच व ग्रामसेवकांचा सत्कार करण्यात आला. गटविकास अधिकारी संतोष जोशी यांनी स्वागत, सभापती सौ. वैशाली माळी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यशाळेस पं. स. सदस्य पांडुरंग डोंगरे, सचिता सावंत, सुशांत देवकर, राहुल साळुंखे, चंद्रकांत चव्हाण यांच् यासह मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)निर्मलग्राम पुरस्कार : मिळालाच कसा?या कार्यशाळेत आ. बाबर यांनी, आळसंद गावातील शौचालय बांधकाम उद्दिष्टाबाबत विचारणा केली. त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य नितीन जाधव, उपसरपंच प्रा. विलास गोरड व ग्रामसेवक हे तिघेही उठून उभे राहिले. त्यावेळी सरपंच व ग्रामसेवकांत आता तरी ताळमेळ आहे का? असा सवाल आ. बाबर यांनी उपस्थित केला. उपसरपंच प्रा. गोरड यांनी, उद्दिष्टपूर्तीबाबत सांगता येत नाही, परंतु, शौचालये शंभर टक्के नसताना, यापूर्वी आमच्या गावाला निर्मलग्राम पुरस्कार कोणत्या आधारावर दिला? असा सवाल केला. त्यावर आ. बाबर यांनी, पूर्वीचे नियम वेगळे होते, आताची नियमावली वेगळी आल्याचे सांगितले.द्राक्ष बागायतदारच शौचालयाविना : पळशी हे निर्यातक्षम द्राक्षबागांचे माहेरघर समजले जाते. या गावाच्या उद्दिष्टाबाबत चर्चा केली असता, या गावात काही अडचणी आहेत. द्राक्षबाग गेल्यानंतर शौचालय बांधतो, असे अनेकजण सांगतात. त्यामुळे शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण झाले नसल्याचे ग्रामसेवकाने सांगितले. निर्यातक्षम द्राक्ष बागायतदारांकडेच शौचालय नसल्याची चर्चा कार्यशाळेत ऐकावयास मिळाली.