शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Kerala Floods : सांगलीकरांची मदत पोहोचविण्यासाठी कन्याकुमारी एक्सप्रेसला स्वतंत्र बोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 12:50 IST

केरळमधील आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला सांगली जिल्हावासियांनी अत्यंत अल्पकाळात उत्स्फूर्त प्रतिसाद देत माणुसकीचे दर्शन घडविले आहे. दुसऱ्या दिवशीही मदतीचा अखंड ओघ सुरू असून जिल्ह्यातून आज दुसऱ्या दिवशी दीड टन बिस्किट्स, दूध पावडर व अन्य सीलबंद अन्नपदार्थ घेवून ट्रक पाठविण्यात आला.

ठळक मुद्देकेरळमधील आपद्ग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरूचसांगलीकरांच्या माणुसकीबद्दल जिल्हाधिकारी काळम यांनी मानले आभार

सांगली  : केरळमधील आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला सांगली जिल्हावासियांनी अत्यंत अल्पकाळात उत्स्फूर्त प्रतिसाद देत माणुसकीचे दर्शन घडविले आहे. दुसऱ्या दिवशीही मदतीचा अखंड ओघ सुरू असून जिल्ह्यातून आज दुसऱ्या दिवशी दीड टन बिस्किट्स, दूध पावडर व अन्य सीलबंद अन्नपदार्थ घेवून ट्रक पाठविण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी वि. ना. काळम व त्यांच्या सुविद्य पत्नी जयश्री काळम, जिल्हा पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, विटा उपविभागीय अधिकारी अश्विनी जिरंगे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) मिनाज मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती.

केरळमधील आपद्ग्रस्तांसाठी जिल्ह्यातून पहिल्या दिवशी 13 टन आणि  दुसऱ्या दिवशी दीड टन बिस्किट्स, दूध पावडर व अन्य सीलबंद अन्नपदार्थ असे एकूण 14 हजार 500 किलो अन्नपदार्थ पाठविण्यात आले आहेत.

सांगली जिल्ह्यातून उभारण्यात आलेली ही मदत पाठविण्यासाठी भारतीय रेल्वे प्रशासनाने 22 टन मालवाहू बोगी उपलब्ध करून दिली असून ती पुणे येथून आज सायंकाळी 7 वाजता कन्याकुमारी एक्सप्रेसने (ट्रेन नंबर 16381) केरळला पाठविण्यात येत आहे. त्यामुळे ही मदत जलद व वेळेत पोहोचणार आहे. याबरोबरच जिल्ह्यातून आतापर्यंत 4 लाख 50 हजार रूपयांची आर्थिक मदत केरळ मुख्यमंत्री सहाय्यता कक्षासाठी प्राप्त झाली असून तीही पाठविण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून जिल्ह्यातील विद्यार्थी, वकील, शासनमान्य धान्य दुकानदार, वॉटर कप स्पर्धेतील गावांमधील लोक, काही गावचे सरपंच, शाळा, बोटींग क्लब, विविध ग्रामपंचायती अशा समाजातील सर्वच स्तरांनी एकत्र येत मदतीचा हात दिल्याबद्दल जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी संपूर्ण जिल्हावासियांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.आटपाडी येथील एका शालेय विद्यार्थ्याने खाऊच्या पैशातून बिस्कीटचा पुडा घेवून तहसिलदार यांच्याकडे आणून देवून आपलाही खारीचा वाटा उचलला. तसेच पत्रकार बांधवानीही बिस्कीटचे बॉक्स दिले. अनेक शालेय विद्यार्थ्यांनी चिमुकल्या हाताने दिलेल्या सर्व मदतीचे जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी रात्रभर जागून पॅकिंग केले आहे. विटा नगरपालिकेच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार दिला.

भिलवडी ग्रामपंचायतीने आपदग्रस्तांच्या मदतीसाठी 51 हजार रूपयांचा धनादेश जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांच्याकडे सुपूर्द केला. तर खासदार संजय पाटील यांनी 50 हजार रूपये, महादेव जगदर (आटपाडी) 55 हजार 555 रूपये, प्रशांत गंगधर (मिरज) 51 हजार रूपये, राजेंद्र पाटील (आटपाडी) 25 हजार 370, तसेच मेडीकल असोसिएशन आटपाडी, सर्व ग्रामस्थ आटपाडी, आसिफ तांबोळी (आटपाडी), चेअरमन खानापूर तालुका खरेदी विक्री संघ, रोहन जाधव (विटा), अनिल दिवेकर (सांगली), चेतना पेट्रोलियम सांगली, सांगली अक्रोबेटीक असोसिएशन सांगली, खंडू रंगराव माने (सांगली), हनुमान सांस्कृतिक विश्रामबाग सांगली, दिपक जाधव (भिलवडी), शुभा सिव्हील इंजीनिअरींग वर्क्स (पलूस), संग्राम ग्रामीण बिगर शेत पत संस्था मर्यादित पलूस, पलूस औद्योगिक वसाहत सहकारी सोसायटी पलूस, अतुल बाबासो शिंदे (पलूस), संदीप विश्वनाथ औटे (आमणापूर), पांडुरंग कांबळे (शिराळा), प्रसाद उत्तमराव पाटील (वाळवा) यांनी आर्थिक मदतीचे धनादेश जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केले.

आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासन, पोलीस व अन्य कर्मचारी-अधिकाऱ्यांनी स्वयंसेवकाची भूमिका बजावली आहे. समाजाला अशा आपत्तीच्या प्रसंगी जेंव्हा जेंव्हा गरज असेल तेंव्हा तेंव्हा सांगली जिल्हावासियांनी अशीच एकजूट दाखवत मानवतेच्या सेवेसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी यावेळी केले.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरSangliसांगलीcollectorजिल्हाधिकारी