शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Kerala Floods : सांगलीकरांची मदत पोहोचविण्यासाठी कन्याकुमारी एक्सप्रेसला स्वतंत्र बोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 12:50 IST

केरळमधील आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला सांगली जिल्हावासियांनी अत्यंत अल्पकाळात उत्स्फूर्त प्रतिसाद देत माणुसकीचे दर्शन घडविले आहे. दुसऱ्या दिवशीही मदतीचा अखंड ओघ सुरू असून जिल्ह्यातून आज दुसऱ्या दिवशी दीड टन बिस्किट्स, दूध पावडर व अन्य सीलबंद अन्नपदार्थ घेवून ट्रक पाठविण्यात आला.

ठळक मुद्देकेरळमधील आपद्ग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरूचसांगलीकरांच्या माणुसकीबद्दल जिल्हाधिकारी काळम यांनी मानले आभार

सांगली  : केरळमधील आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला सांगली जिल्हावासियांनी अत्यंत अल्पकाळात उत्स्फूर्त प्रतिसाद देत माणुसकीचे दर्शन घडविले आहे. दुसऱ्या दिवशीही मदतीचा अखंड ओघ सुरू असून जिल्ह्यातून आज दुसऱ्या दिवशी दीड टन बिस्किट्स, दूध पावडर व अन्य सीलबंद अन्नपदार्थ घेवून ट्रक पाठविण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी वि. ना. काळम व त्यांच्या सुविद्य पत्नी जयश्री काळम, जिल्हा पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, विटा उपविभागीय अधिकारी अश्विनी जिरंगे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) मिनाज मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती.

केरळमधील आपद्ग्रस्तांसाठी जिल्ह्यातून पहिल्या दिवशी 13 टन आणि  दुसऱ्या दिवशी दीड टन बिस्किट्स, दूध पावडर व अन्य सीलबंद अन्नपदार्थ असे एकूण 14 हजार 500 किलो अन्नपदार्थ पाठविण्यात आले आहेत.

सांगली जिल्ह्यातून उभारण्यात आलेली ही मदत पाठविण्यासाठी भारतीय रेल्वे प्रशासनाने 22 टन मालवाहू बोगी उपलब्ध करून दिली असून ती पुणे येथून आज सायंकाळी 7 वाजता कन्याकुमारी एक्सप्रेसने (ट्रेन नंबर 16381) केरळला पाठविण्यात येत आहे. त्यामुळे ही मदत जलद व वेळेत पोहोचणार आहे. याबरोबरच जिल्ह्यातून आतापर्यंत 4 लाख 50 हजार रूपयांची आर्थिक मदत केरळ मुख्यमंत्री सहाय्यता कक्षासाठी प्राप्त झाली असून तीही पाठविण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून जिल्ह्यातील विद्यार्थी, वकील, शासनमान्य धान्य दुकानदार, वॉटर कप स्पर्धेतील गावांमधील लोक, काही गावचे सरपंच, शाळा, बोटींग क्लब, विविध ग्रामपंचायती अशा समाजातील सर्वच स्तरांनी एकत्र येत मदतीचा हात दिल्याबद्दल जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी संपूर्ण जिल्हावासियांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.आटपाडी येथील एका शालेय विद्यार्थ्याने खाऊच्या पैशातून बिस्कीटचा पुडा घेवून तहसिलदार यांच्याकडे आणून देवून आपलाही खारीचा वाटा उचलला. तसेच पत्रकार बांधवानीही बिस्कीटचे बॉक्स दिले. अनेक शालेय विद्यार्थ्यांनी चिमुकल्या हाताने दिलेल्या सर्व मदतीचे जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी रात्रभर जागून पॅकिंग केले आहे. विटा नगरपालिकेच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार दिला.

भिलवडी ग्रामपंचायतीने आपदग्रस्तांच्या मदतीसाठी 51 हजार रूपयांचा धनादेश जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांच्याकडे सुपूर्द केला. तर खासदार संजय पाटील यांनी 50 हजार रूपये, महादेव जगदर (आटपाडी) 55 हजार 555 रूपये, प्रशांत गंगधर (मिरज) 51 हजार रूपये, राजेंद्र पाटील (आटपाडी) 25 हजार 370, तसेच मेडीकल असोसिएशन आटपाडी, सर्व ग्रामस्थ आटपाडी, आसिफ तांबोळी (आटपाडी), चेअरमन खानापूर तालुका खरेदी विक्री संघ, रोहन जाधव (विटा), अनिल दिवेकर (सांगली), चेतना पेट्रोलियम सांगली, सांगली अक्रोबेटीक असोसिएशन सांगली, खंडू रंगराव माने (सांगली), हनुमान सांस्कृतिक विश्रामबाग सांगली, दिपक जाधव (भिलवडी), शुभा सिव्हील इंजीनिअरींग वर्क्स (पलूस), संग्राम ग्रामीण बिगर शेत पत संस्था मर्यादित पलूस, पलूस औद्योगिक वसाहत सहकारी सोसायटी पलूस, अतुल बाबासो शिंदे (पलूस), संदीप विश्वनाथ औटे (आमणापूर), पांडुरंग कांबळे (शिराळा), प्रसाद उत्तमराव पाटील (वाळवा) यांनी आर्थिक मदतीचे धनादेश जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केले.

आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासन, पोलीस व अन्य कर्मचारी-अधिकाऱ्यांनी स्वयंसेवकाची भूमिका बजावली आहे. समाजाला अशा आपत्तीच्या प्रसंगी जेंव्हा जेंव्हा गरज असेल तेंव्हा तेंव्हा सांगली जिल्हावासियांनी अशीच एकजूट दाखवत मानवतेच्या सेवेसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी यावेळी केले.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरSangliसांगलीcollectorजिल्हाधिकारी