शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पतंगराव कदम यांच्याकडून कर्नाटकच्या पाण्याचे आमिष

By admin | Updated: February 19, 2017 00:25 IST

विलासराव जगताप : वाळेखिंडी, शेगाव येथे प्रचारसभा

जत : आमदार डॉ. पतंगराव कदम व सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे संचालक विक्रम सावंत हे तालुक्याच्या पूर्व भागातील जनतेला कर्नाटकातील तुबची, बबलेश्वर आणि हिरेपडसलगी योजनेतून पाणी देतो, असे सांगून गाजराची पुंगी वाजवत आहेत, अशी टीका आमदार विलासराव जगताप यांनी केली.जि. प. व पं. स. निवडणूक प्रचारार्थ वाळेखिंडी, बनाळी, आवंढी, शेगाव आणि सिंगनहळ्ळी येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. ते म्हणाले की, तालुक्यासाठी म्हैसाळ योजना पूर्णत्वास येत आहे. पश्चिम भागात पाणी आले आहे. या योजनेच्या पूर्णत्वासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. राज्यातील योजनेचा पाठपुरावा करणे सोयीचे होते. परराज्यातील योजनेचा पाठपुरावा करणे गैरसोयीचे होते. असे असतानाही कॉँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते तुबची, बबलेश्वर व हिरेपडसलगी योजनेचे गाजर जत तालुक्यातील जनतेला दाखवून त्यांची दिशाभूल करत आहेत. जत येथील राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना बंद पाडून तो विक्री करण्यास हेच नेते आणि कार्यकर्ते कारणीभूत आहेत. पतंगराव कदम व सावंत यांनी तालुक्यात दोन साखर कारखाने काढतो म्हणून अत्यल्प किंमतीत शेतकऱ्यांची जमीन खरेदी करून ठेवली आहे. परंतु मागील चार-पाच वर्षात तेथे काहीच काम सुरू करण्यात आले नाही, असा आरोप त्यांनी केला. सांगली जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती संजयकुमार सावंत म्हणाले की, जगताप यांनी तालुक्यात जातीपातीचे राजकारण केले नाही. जनता व सर्वसामान्य कार्यकर्ता केंद्रबिंदू मानून त्यांनी आजपर्यंत राजकारण केले आहे. कोणत्याही पदापेक्षा सर्वसामान्यांशी त्यांनी आपली नाळ कायम ठेवली आहे. सभेस भाजप सांगली जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी, जत तालुका अध्यक्ष चंद्रकांत गुड्डोडगी, माजी अध्यक्ष शिवाजीराव ताड, माणिक पाटील व जि. प. आणि पं. स. उमेदवार उपस्थित होते. (वार्ताहर)