शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

पतंगराव कदम यांच्याकडून कर्नाटकच्या पाण्याचे आमिष

By admin | Updated: February 19, 2017 00:25 IST

विलासराव जगताप : वाळेखिंडी, शेगाव येथे प्रचारसभा

जत : आमदार डॉ. पतंगराव कदम व सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे संचालक विक्रम सावंत हे तालुक्याच्या पूर्व भागातील जनतेला कर्नाटकातील तुबची, बबलेश्वर आणि हिरेपडसलगी योजनेतून पाणी देतो, असे सांगून गाजराची पुंगी वाजवत आहेत, अशी टीका आमदार विलासराव जगताप यांनी केली.जि. प. व पं. स. निवडणूक प्रचारार्थ वाळेखिंडी, बनाळी, आवंढी, शेगाव आणि सिंगनहळ्ळी येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. ते म्हणाले की, तालुक्यासाठी म्हैसाळ योजना पूर्णत्वास येत आहे. पश्चिम भागात पाणी आले आहे. या योजनेच्या पूर्णत्वासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. राज्यातील योजनेचा पाठपुरावा करणे सोयीचे होते. परराज्यातील योजनेचा पाठपुरावा करणे गैरसोयीचे होते. असे असतानाही कॉँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते तुबची, बबलेश्वर व हिरेपडसलगी योजनेचे गाजर जत तालुक्यातील जनतेला दाखवून त्यांची दिशाभूल करत आहेत. जत येथील राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना बंद पाडून तो विक्री करण्यास हेच नेते आणि कार्यकर्ते कारणीभूत आहेत. पतंगराव कदम व सावंत यांनी तालुक्यात दोन साखर कारखाने काढतो म्हणून अत्यल्प किंमतीत शेतकऱ्यांची जमीन खरेदी करून ठेवली आहे. परंतु मागील चार-पाच वर्षात तेथे काहीच काम सुरू करण्यात आले नाही, असा आरोप त्यांनी केला. सांगली जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती संजयकुमार सावंत म्हणाले की, जगताप यांनी तालुक्यात जातीपातीचे राजकारण केले नाही. जनता व सर्वसामान्य कार्यकर्ता केंद्रबिंदू मानून त्यांनी आजपर्यंत राजकारण केले आहे. कोणत्याही पदापेक्षा सर्वसामान्यांशी त्यांनी आपली नाळ कायम ठेवली आहे. सभेस भाजप सांगली जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी, जत तालुका अध्यक्ष चंद्रकांत गुड्डोडगी, माजी अध्यक्ष शिवाजीराव ताड, माणिक पाटील व जि. प. आणि पं. स. उमेदवार उपस्थित होते. (वार्ताहर)