शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

‘कडकनाथ’प्रकरणी सहाशेवर तक्रारी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 23:46 IST

सांगली/इस्लामपूर : कडकनाथ कोंबडीपालन फसवणूक प्रकरणाचा गतीने तपास सुरू आहे. हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी देण्यात आले आहे. ...

सांगली/इस्लामपूर : कडकनाथ कोंबडीपालन फसवणूक प्रकरणाचा गतीने तपास सुरू आहे. हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी देण्यात आले आहे. रयत अ‍ॅग्रो इंडिया आणि महारयत अ‍ॅग्रो इंडिया या कंपन्यांकडून महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थानपासून छत्तीसगडपर्यंतच्या शेतकऱ्यांची यात फसवणूक झाली असून, आतापर्यंत सहाशेवर तक्रार अर्ज आले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.दरम्यान, पोलिसांनी अटक केलेल्या हणमंत शंकर जगदाळे (रा. अंबक-चिंचणी, ता. कडेगाव, जि. सांगली) या दुसºया संचालकाला येथील न्यायालयाने ९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. कंपनीचा संचालक संदीप सुभाष मोहिते याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.शर्मा म्हणाले की, कडकनाथ कोंबडी फसवणूक प्रकरणात तक्रारदारांची संख्याही वाढत आहे. रयत अ‍ॅग्रो कंपनीचे कार्यालय बंद झाल्याने शेतकऱ्यांसमोर या कोंबड्यांचे करायचे काय, कोंबडी खाद्याचे काय करायचे, असे प्रश्न आहेत. ग्राहक मिळविण्यातही अडचण आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग सखोल चौकशी करणार आहे. आतापर्यंत या प्रकरणात दोघांना अटक केली आहे. सोमवारी कर्नाटकातील बिदर येथील एक कुटुंब चार लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार घेऊन पोलिसांकडे आले होते.अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख मनीषा डुबले यांनी इस्लामपूर येथे भेट देऊन माहिती घेतली. अटकेत असलेल्या संदीप मोहिते याच्याकडे कसून चौकशी केली. त्याचबरोबर अधिकाºयांना तपासकामी सूचनाही केल्या. घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने प्रत्येक शक्यता काटेकोरपणे पडताळून संशयितांविरुध्द भक्कम पुरावे संकलित करावेत, असे निर्देश दिले. पोलीस उपअधीक्षक कृष्णत पिंगळे, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी डुबले यांना माहिती दिली.राज्य आणि परराज्यातील आठ ते दहा हजार शेतकºयांची ५०० कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक करणाºया कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसायातील कंपनीच्या पाच संचालकांविरुध्द शनिवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. पोलिसांनी इस्लामपूर आणि पुणे येथील कार्यालये सील केली आहेत. पुण्याच्या कार्यालयातील प्रत्येक कागदपत्राची तपासणी करून ती ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे.मोठ्या गुंतवणूकदारांच्या अद्याप तक्रारी नाहीतआतापर्यंत एक लाखापासून अडीच लाखापर्यंत फसवणूक झालेले गुंतवणूकदारच तक्रार देण्यासाठी पुढे आले आहेत. मात्र, पाच लाखांपासून ३० लाखांपर्यंत फसवणूक झालेले गुंतवणूकदार अद्याप पोलिसांकडे आलेले नाहीत. अशा मोठ्या गुंतवणूकदारांची संख्या मोठी आहे. त्यांच्या तक्रारी पोलिसांकडे आल्यावर या घोटाळ्यातील आकडा वाढण्याची शक्यता आहे.