शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘कडकनाथ’प्रकरणी सहाशेवर तक्रारी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 23:46 IST

सांगली/इस्लामपूर : कडकनाथ कोंबडीपालन फसवणूक प्रकरणाचा गतीने तपास सुरू आहे. हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी देण्यात आले आहे. ...

सांगली/इस्लामपूर : कडकनाथ कोंबडीपालन फसवणूक प्रकरणाचा गतीने तपास सुरू आहे. हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी देण्यात आले आहे. रयत अ‍ॅग्रो इंडिया आणि महारयत अ‍ॅग्रो इंडिया या कंपन्यांकडून महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थानपासून छत्तीसगडपर्यंतच्या शेतकऱ्यांची यात फसवणूक झाली असून, आतापर्यंत सहाशेवर तक्रार अर्ज आले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.दरम्यान, पोलिसांनी अटक केलेल्या हणमंत शंकर जगदाळे (रा. अंबक-चिंचणी, ता. कडेगाव, जि. सांगली) या दुसºया संचालकाला येथील न्यायालयाने ९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. कंपनीचा संचालक संदीप सुभाष मोहिते याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.शर्मा म्हणाले की, कडकनाथ कोंबडी फसवणूक प्रकरणात तक्रारदारांची संख्याही वाढत आहे. रयत अ‍ॅग्रो कंपनीचे कार्यालय बंद झाल्याने शेतकऱ्यांसमोर या कोंबड्यांचे करायचे काय, कोंबडी खाद्याचे काय करायचे, असे प्रश्न आहेत. ग्राहक मिळविण्यातही अडचण आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग सखोल चौकशी करणार आहे. आतापर्यंत या प्रकरणात दोघांना अटक केली आहे. सोमवारी कर्नाटकातील बिदर येथील एक कुटुंब चार लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार घेऊन पोलिसांकडे आले होते.अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख मनीषा डुबले यांनी इस्लामपूर येथे भेट देऊन माहिती घेतली. अटकेत असलेल्या संदीप मोहिते याच्याकडे कसून चौकशी केली. त्याचबरोबर अधिकाºयांना तपासकामी सूचनाही केल्या. घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने प्रत्येक शक्यता काटेकोरपणे पडताळून संशयितांविरुध्द भक्कम पुरावे संकलित करावेत, असे निर्देश दिले. पोलीस उपअधीक्षक कृष्णत पिंगळे, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी डुबले यांना माहिती दिली.राज्य आणि परराज्यातील आठ ते दहा हजार शेतकºयांची ५०० कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक करणाºया कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसायातील कंपनीच्या पाच संचालकांविरुध्द शनिवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. पोलिसांनी इस्लामपूर आणि पुणे येथील कार्यालये सील केली आहेत. पुण्याच्या कार्यालयातील प्रत्येक कागदपत्राची तपासणी करून ती ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे.मोठ्या गुंतवणूकदारांच्या अद्याप तक्रारी नाहीतआतापर्यंत एक लाखापासून अडीच लाखापर्यंत फसवणूक झालेले गुंतवणूकदारच तक्रार देण्यासाठी पुढे आले आहेत. मात्र, पाच लाखांपासून ३० लाखांपर्यंत फसवणूक झालेले गुंतवणूकदार अद्याप पोलिसांकडे आलेले नाहीत. अशा मोठ्या गुंतवणूकदारांची संख्या मोठी आहे. त्यांच्या तक्रारी पोलिसांकडे आल्यावर या घोटाळ्यातील आकडा वाढण्याची शक्यता आहे.