शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
7
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
8
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
9
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
10
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
11
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
12
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
13
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
14
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
15
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
16
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
17
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
18
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
19
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
20
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना

मराठवाड्याला न्याय अन् सांगलीवर अन्याय; जमिनींच्या भोगवटादार वर्गीकरणात भेदभाव

By अविनाश कोळी | Updated: September 3, 2024 13:01 IST

गुंठेवारीतील नागरिकांना कमी नजराणा हवा

अविनाश कोळीसांगली : महाराष्ट्र सरकारने देवस्थान व इनाम जमिनी वर्ग दोनमधून वर्ग एकमध्ये करण्यासाठी मराठवाड्याला मोठा न्याय दिला. आता त्या ठिकाणी नाममात्र ५ टक्के नजराणा घेऊन जमिनींचा मालकी हक्क प्रदान केला जाईल. दुसरीकडे महाराष्ट्रातील विशेषत: सांगलीमध्ये देवस्थान व इनाम जमिनी, तसेच गुंठेवारी जमिनींचा नजराणा आहे तसाच आहे. त्यामुळे वर्गीकरणाच्या या प्रक्रियेत शासनाने केलेला दुजाभाव दूर करावा, अशी मागणी होत आहे.

मराठवाड्यातील संभाजीनगर, बीड, नांदेड, हिंगोली, जालना, लातूर, धाराशिव जिल्ह्यांतील देवस्थान व इनाम खालसा झालेल्या वर्ग दोनच्या जमिनी या वर्ग एकमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एकूण ५५ हजार हेक्टर जमिनी या वर्ग एकमध्ये जाणार आहेत. त्यामुळे एवढे क्षेत्र हे अकृषिक करण्यासाठी वाट मोकळी झाली आहे.

५० ऐवजी आता ५ टक्के नजराणाशासन निर्णयानुसार मराठवाड्यातील इनाम जमिनींचे वर्ग दोनमधून वर्ग १ मध्ये रूपांतर करण्यासाठी बाजार मूल्यांच्या ५० टक्क्यांऐवजी नममात्र पाच टक्के नजराणा आकारला जाणार आहे. ही रक्कम भरणे भोगवटादारांना शक्य आहे. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांना याचा फायदा होणार आहे.

गुंठेवारीला शंभर टक्के नजराणा

  • सांगलीच्या गुंठेवारीतील वतनी जमिनीमध्ये वर्ग दोनमधील शासन आदेश २०१९ नुसार बाजार मूल्यांच्या ७५ टक्के शर्तभंग नजराणा लावला आहॆ.
  • गुंठेवारी प्लॉट घेणारा वर्ग हा गरीब व कायद्याचे ज्ञान नसलेला आहे. त्यामुळे सर्रास शर्त भंग झाला आहे.
  • शासन आदेश २०२१ नुसार गुंठेवारीधारकांना वर्ग दोनमधून एकमध्ये करण्याचा नजराणा हा बाजार मूल्याच्या २५ टक्के आकारला आहे.
  • शर्त भंग ७५ टक्के गृहीत धरून शंभर टक्के नजराणा होत आहे.

जागा विकूनही भागत नाहीगुंठेवारी नागरिकांनी स्वतःच्या जागा विकून सरकारला नजराणा भरला तरीही वर्गीकरण होत नाही. त्यामुळे गुंठेवारीतील नागरिकांना केवळ २५ टक्के नजराणा घेऊन वर्ग एकमध्ये येण्याची संधी द्यावी, अशी मागणी गुंठेवारी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.

गोरगरीब गुंठेवारी प्लॉटधारकांना शर्त भंग संपूर्ण माफ करून २५ टक्के नजराणा भरून घेऊन जमिनी वर्ग एक करून दिल्यास महाराष्ट्रातील लाखो जनतेला याचा फायदा होणार आहे. सरकारने तातडीने याबाबत निर्णय घ्यावा. या मागण्यांचा पाठपुरावा करू. - चंदन चव्हाण, गुंठेवारी चळवळीतील कार्यकर्ते

टॅग्स :Sangliसांगली