शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
2
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
5
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

राज्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास ध्येय आणि चिकाटीमुळेच : शेखर चरेगावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 1:25 AM

शिराळा : ध्येय आणि चिकाटीच्या जोरावर मी पिग्मी एजंट ते राज्यमंत्री असा प्रवास केला. तसेच आयुष्यभर ध्येयाशी एकनिष्ठ राहिलो, असे प्रतिपादन राज्य सहकार परिषद पुणेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर

ठळक मुद्देशिराळा येथे ब्राह्मण समाज मेळावा उत्साहात

शिराळा : ध्येय आणि चिकाटीच्या जोरावर मी पिग्मी एजंट ते राज्यमंत्री असा प्रवास केला. तसेच आयुष्यभर ध्येयाशी एकनिष्ठ राहिलो, असे प्रतिपादन राज्य सहकार परिषद पुणेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी केल.शिराळा येथील ब्राह्मण समाज सेवा संस्थेच्यावतीने आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी गोरक्षनाथ मठाचे मठाधिपती पीर पारसनाथजी महाराज, माजी आमदार मानसिंगराव नाईक, यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष रणधीर नाईक, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख, अखिल भारतीय ब्राह्मण महिला आघाडीच्या सातारा जिल्हा सचिव सौ. शरयू माटे, कºहाड तालुका अध्यक्षा सौ. अनघा कुलकर्णी, कºहाड तालुका कोषाध्यक्षा सौ. वृषाली देशपांडे, ब्राह्मण संघ कºहाड तालुका अध्यक्ष श्रीकांत साने, रामभाऊ आफळे यांची प्रमुख उपस्थिती होती.चरेगावकर म्हणाले की, आपल्या समाजाने, जमलं तर करुया, आपल्या अंगावर तर काय येणार नाही ना? आपण केले तर चालेल का? या व्यथित करणाऱ्या प्रश्नांपासून लांब राहिले पाहिजे. तरच जीवनात यशाचा राजमार्ग दिसेल. अन्यथा आयुष्यभर निराशा मनात घर करून राहील. व्यवसाय करायचाच आहे, तर मोठ्या उद्योगांकडे पाहू नका. हजारातील व्यवसायसुद्धा तुम्हाला करोडपती बनवू शकतो. हे करताना फक्त अंधानुकरण करू नका. कारण तुमची वाट त्यावेळी चुकण्याची शक्यता असते.मानसिंगराव नाईक म्हणाले, समाजाची उन्नती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सर्वच क्षेत्रात आपल्या गुणांनी त्यांनी वेगळा ठसा उमटविला आहे. शिराळा ब्राह्मण संघाचे काम खरंच कौतुकास्पद आहे.यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष रणधीर नाईक म्हणाले, प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींची मानसिकता बदलल्यास समाजाची प्रगती आपोआप बदलेल. यासाठी संघटन आणि सद्चारित्र्य महत्त्वाचे आहे.यशवंत कुलकर्णी म्हणाले, सुखात आणि सुतकात जो समाज एक होतो, तोच माणुसकीला खरी ताकद देतो. समाज मोठा झाला, परंतु नाती दुरावली गेली. ती जोडण्याचे काम आपण भविष्यात करुया. तेच परमेश्वरास मान्य असेल.सोनल भोसेकर म्हणाल्या, महिलांचा सन्मान आणि त्यांचे रक्षण ही जबाबदारी आता आपल्यावर येऊन ठेपली आहे. लघुउद्योगांपासून सुरू झालेला प्रवास नामांकित उद्योजकांपर्यंत येऊन थांबतो. ही आज महिलाशक्तीची खरी ताकद आहे.डॉ. अभिजित जोशी, वनपरिक्षेत्र अधिकारी बाळकृष्ण हसबनीस, सोनाली नवांगूळ, सोनल भोसेकर, वैभवी हसबनीस, डॉ. अभिजित जोशी, विपिन हसबनीस, अनिकेत कळमकर, नारायण जोशी, बाळकृष्ण हसबनीस, वैभवी कुलकर्णी, डॉ. सुनील जोशी, सुनील हसबनीस, दिनेश हसबनीस, संतोष देशपांडे, विठ्ठल जोशी, श्रीकांत इनामदार यावेळी उपस्थित होते.उमेश कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष विद्याधर कुलकर्णी यांनी परिचय करून दिला. प्रशांत कुलकर्णी यांनी आभार मानले. रवींद्र हसबनीस यांनी सूत्रसंचालन केले. वेदश्री पटवर्धन हिने पसायदान म्हटले.समस्या : प्रगतीचे लक्षणकामात समस्या येणे हे प्रगतीचे लक्षण आहे. त्यामुळे निराश न होता मार्गक्रमण करा. भविष्यातील प्लॅन डोळ्यासमोर ठेवून अनुभवी लोकांना साथीला घ्या. तेव्हाच आर्थिकदृष्ट्या तुम्ही मजबूत होऊन मूलभूत प्रश्नांवर भर द्याल, असे चरेगावकर म्हणाले.