शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
2
ब्राझीलमध्ये रेड कमांडोविरोधात युद्ध सुरु; रिओमध्ये मोठ्या अड्ड्यावर हेलिकॉप्टरद्वारे हल्ला, माफियांकडून ड्रोन हल्ल्याने प्रत्यूत्तर
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
बदल्याची आग! मोबाईल डेटा, हार्ड ड्राइव्ह, अश्लील...; २० वर्षीय मुलीने का केली पार्टनरची हत्या?
5
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
6
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
7
शोधत होते दारू, सापडले एक कोटी रुपये; तपासणी नाक्यावर खाजगी बसमध्ये आढळली अवैध रक्कम
8
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
9
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
10
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
11
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
12
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
13
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
14
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
15
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
16
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
17
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
18
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
19
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
20
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान

शेट्टींच्या भूमिकेने जयंतराव ‘टेन्शन’मुक्त : सदाभाऊ खोत यांच्या अडचणीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:32 IST

अशोक पाटील।इस्लामपूर : गत लोकसभा निवडणुकी त काँग्रेस आघाडीपुढे उमेदवार निवडीचे आव्हान होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात लढण्यास कोणीही इच्छुक नव्हते. परंतु यावेळी मात्र चित्र उलटे असून, खासदार शेट्टी आणि काँग्रेस आघाडी एकत्र येणार आहेत. त्यामुळे जयंत पाटील टेन्शनमुक्त झाले आहेत, तर भाजपच्या गोटात जाऊन बसलेल्या कृषी ...

ठळक मुद्देउमेदवार निवडीसाठी कसरत ; ‘स्वाभिमानी’ आता आघाडीसोबतगत विधानसभा निवडणुकीवेळी आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात सक्षम नेतृत्व नव्हते

अशोक पाटील।इस्लामपूर : गत लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीपुढे उमेदवार निवडीचे आव्हान होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात लढण्यास कोणीही इच्छुक नव्हते. परंतु यावेळी मात्र चित्र उलटे असून, खासदार शेट्टी आणि काँग्रेस आघाडी एकत्र येणार आहेत. त्यामुळे जयंत पाटील टेन्शनमुक्त झाले आहेत, तर भाजपच्या गोटात जाऊन बसलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. आता त्यांना उमेदवार निवडीसाठी कसरत करावी लागणार आहे.

खासदार राजू शेट्टी, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार शिवाजीराव नाईक, नानासाहेब महाडिक यांनी बांधलेल्या विकास आघाडीची बिघाडी झाली आहे; तर दुसरीकडे बिघडलेली काँग्रेसची घडी बसवण्याचा प्रयत्न खासदार शेट्टी यांच्यामुळे होण्याची शक्यता आहे. कॉँग्रेस आघाडीतर्फे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात भाजपविरोधात शेट्टी यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे; तर भाजपपुढे सध्या कोणताही चेहरा नसला तरी, अंतिम टप्प्यात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याच गळ्यात उमेदवारी मारली जाण्याची शक्यता आहे.

खासदार शेट्टी आता काँग्रेस आघाडीसोबत आहेत. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका दोन्ही कॉँग्रेस एकत्रित लढवणार असल्याचे भाकित राष्टÑवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे. त्यामुळे वाळवा-शिराळ्यातील राजकारण उलट्या दिशेने वाहू लागले आहे. इस्लामपूर मतदार संघात राष्ट्रवादी विरोधात युवा नेतृत्व तयार करण्यासाठी खोत यांनी कंबर कसली आहे. शिराळ्यातही आमदार शिवाजीराव नाईक यांना ताकद देण्यासाठी खोत सरसावले आहेत. परंतु भाजपने दिलेले मंत्रिपदाचे आश्वासन अद्यापही पूर्ण न झाल्याने आमदार नाईक यांचे कार्यकर्ते आगामी विधानसभेला काय भूमिका घेणार, हा महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे.

गत विधानसभा निवडणुकीवेळी आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात सक्षम नेतृत्व नव्हते. यावेळी भाजपने पाटील यांना खिंडीत पकडण्याचा डाव आखला आहे. बंदूक चालवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असले तरी, खांदा मात्र खोत यांचा आहे. खोत यांनी गेल्या वर्षभरापासून उमेदवार शोधमोहीम सुरू ठेवली होती. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांना पहिली पसंती दिली आहे. यानंतर आष्ट्याचे वैभव शिंदे, महाडिक गटाचे राहुल महाडिक, विकास आघाडीचे पक्षप्रतोद विक्रम पाटील यांच्याही नावाची चर्चा आहे.लोकसभा निवडणूक : रंगतदार होणारराजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत हे दोघेही शेतकरी चळवळीतील नेते आहेत. हे दोघे एकत्रित होते त्यावेळी त्यांच्यापुढे इतर पक्षांचा टिकाव लागत नव्हता. दस्तुरखुद्द जयंतरावांनाही त्यांच्यापुढे नमते घ्यावे लागले होते. परंतु आता हे दोघे विरोधात आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून आघाडीतर्फे खा. शेट्टी आणि भाजपतर्फे खोत यांचीच लढत निश्चित मानली जात आहे.

टॅग्स :SangliसांगलीSadabhau Khotसदाभाउ खोत Politicsराजकारण