शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
3
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
4
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
5
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
6
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
7
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
9
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
10
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
11
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
12
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
13
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
14
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
15
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
16
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
17
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
18
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
19
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
20
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले

‘महांकाली’च्या फडात जयंतरावांचा कोयता

By admin | Updated: November 27, 2014 00:21 IST

अंतर्गत राजकारणाची धार : कवठेमहांकाळ तालुक्यातील उसाचा ओघ जत कारखान्याकडेच अधिक

अर्जुन कर्पे - कवठेमहांकाळ -येथील महांकाली कारखान्याच्या फडात माजी मंत्री जयंत पाटील यांचा कोयता जोरात चालला असून, तालुक्यातील उसाचा ओघ ‘राजारामबापू’ने चालविण्यास घेतलेल्या जतच्या कारखान्याला सुरू झाला आहे. जयंतरावांच्या या कोयत्याला अंतर्गत राजकारणाची धार लावल्याचे बोलले जात आहे. यामुळे विजय सगरेंच्या ‘महांकाली’च्या गाळप उद्दिष्टाला ‘ब्रेक’ लागण्याची चिन्हे आहेत.विजय सगरे यांनी गेली २८ वर्षे दुष्काळाशी सामना करत कवठेमहांकाळच्या महांकाली साखर कारखान्याचे धुराडे सुरू ठेवले आहे. मागील दोन वर्षात तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार व माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी म्हैसाळ सिंचन योजनेचे पाणी ‘महांकाली’च्या शिवारात आणले आणि तालुक्यात उसाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली. या हंगामात तब्बल १०,७५० एकरावर उसाचे क्षेत्र उपलब्ध आहे. महांकाली कारखाना एरव्ही उसासाठी परजिल्ह्यासह परराज्यात भटकंती करत होता, पण आता कार्यक्षेत्रातच उसाचे क्षेत्र मुबलक झाले आहे. यावर्षी ‘महांकाली’ला कार्यक्षेत्रातच साडेतीन लाख टन ऊस गाळपासाठी मिळणार आहे.मात्र ‘महांकाली’च्या सुगीच्या दिवसांना शेजारच्या जत तालुक्यातील राजारामबापू साखर कारखान्याच्या युनिटने हादरा दिला आहे. ‘राजारामबापू’ने जतचा डफळे कारखाना चालवण्यास घेतला असून, या युनिटसाठी ‘महांकाली’च्या कार्यक्षेत्रातील उसावर कोयता चालविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गाळप उद्दिष्टासाठीही आता ‘महांकाली’स मोठी स्पर्धा करावी लागणार आहे.जतच्या कारखान्याने ‘महांकाली’च्या कार्यक्षेत्रात ५२ ऊसतोड टोळ्या उतरवल्या आहेत, तर वाहतुकीसाठी ५२ ट्रॅक्टरही कवठेमहांकाळ-जत मार्गावर जोरात धावू लागले आहेत. जत कारखान्याकडे ‘महांकाली’च्या कार्यक्षेत्रातील दीड हजार एकरावर उसाची नोंद झाली आहे. क्रमपाळी पूर्ण झाल्यानंतर पुरवणीमध्ये उसाची नोंद करून शेतकऱ्यांचा ऊस नेण्यास जत कारखाना प्राधान्य देणार असल्याचे खात्रीशीर व विश्वसनीय वृत्त आहे.‘महांकाली’च्या माध्यमातूनही कार्यक्षेत्रातील ऊस उचलण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली जात असल्याचे कारखान्याच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे, परंतु प्रत्यक्षात कारखान्याच्या नियोजित कार्यक्रमानुसारच संथगतीने ऊस नेण्यासाठी पावले उचलली जात असल्याचे चित्र आहे.दुष्काळी टापूतील महत्त्वाचे उद्योग केंद्र म्हणून परिचित असलेल्या ‘महांकाली’ला जयंतरावांनी दुष्काळी टापूतच जतच्या खडकावरून ‘राजारामबापू’च्या माध्यमातून आव्हान दिले आहे. या उसाच्या स्पर्धेने ‘महांकाली’समोर नवे संकट उभे राहिले आहे.जयंतरावांच्या या कोयत्याला अंतर्गत राजकारणाची तीव्र धार असल्याची चर्चा सुरू आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात चार ठिकाणी भाजपचे कमळ फुलले, परंतु ते कमळ फुलण्यामागे जयंतरावांचे खतपाणी होते, असे सांगितले जाते. तथापि ‘महांकाली’च्या मैदानात कमळ फुलले नाही, याची सल कदाचित जयंतरावांच्या मनात बोचत असल्यानेच त्यांनी ‘महांकाली’च्या कार्यक्षेत्रात कोयत्याला राजकीय धार लावल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. काही स्थानिक कार्यकर्तेही जयंतरावांच्या कोयत्याला पाणी लावून धार अधिक तीव्र करत आहेत. तालुक्यातील करोली (टी), हिंगणगाव, कुकटोळी, कोंगनोळी, रामपूरवाडी, सराटी, अग्रण धुळगाव, रांजणी, म्हैसाळ या गावांतून जयंतरावांच्या कोयत्याने सपाटा लावला आहे. सगरे आणि पर्यायाने आर. आर. पाटील यांच्यावर या माध्यमातून कुरघोड्या सुरू आहेत. काहीजण रांजणी, करोली (टी), धुळगाव, कोंगनोळी परिसरातून जत कारखान्याला ऊस पाठविण्यासाठी शेतकऱ्यांना फूस लावत आहेत.महांकाली व जत कारखान्याने अद्याप दर जाहीर केलेला नाही, तरीही ऊसतोड मात्र जोमात सुरू आहे. ‘महांकाली’च्या कार्यक्षेत्रातील ऊस इतर कारखान्यांना शेतकरी देऊ लागल्याने याचा परिणाम ‘महांकाली’वर होणार आहे. गेली २८ वर्षे दुष्काळाशी टक्कर देत हा कारखाना गाळप उद्दिष्ट साध्य करीत आला आहे. यंदाही इतर क्षेत्रातून, कर्नाटकातून ऊस आणावा लागल्यास तो आणून उद्दिष्ट पूर्ण केले जाईल.- मनोज सगरे, प्रभारी कार्यकारी संचालक, महांकाली कारखानाया हंगामात राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या जत युनिटचे चार लाख टन गाळपाचे उद्दिष्ट असून, कवठेमहांकाळ तालुक्यातील दीड हजार एकरातील उसाची नोंद जत कारखान्याकडे झाली आहे. पुरवणीतही ऊस नोंद करण्यात येईल व शेतकऱ्यांचा ऊस नेण्यात येईल.- प्रशांत पाटील, शेती अधिकारी, जत कारखानाकळीचा मुद्दा महांकाली कारखान्याची उभारणी विजय सगरे यांचे वडील नानासाहेब सगरे यांनी केली. नानासाहेब सगरे हे राजारामबापूंचे अनुयायी मानले जातात. राजारामबापूंनी नानासाहेबांना मोठी मदत केल्यानेच कारखान्याच्या परिसराला ‘राजारामबापूनगर’ असे नाव देण्यात आले आहे. मात्र आता विजय सगरे यांनी जयंतरावांचा हात सोडून आर. आर. पाटील यांचा हात धरला आहे. त्यामुळेच राजारामबापूंचे पुत्र असलेल्या जयंत पाटील यांनी या कारखाना कार्यक्षेत्रात कोयता जोरात चालवला असल्याचे सांगितले जाते.