शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
4
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
5
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
6
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
7
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
8
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
9
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
10
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
11
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
12
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
13
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
14
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
15
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
16
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
17
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
18
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
19
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
20
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
Daily Top 2Weekly Top 5

जयंतराव-संभाजी पवार गटातील संघर्ष पेटणार-: निवडणुकीच्या तोंडावर कोंडी करण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 00:32 IST

सर्वोदय साखर कारखान्याच्या मालकी हक्कावरून पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील व माजी आमदार संभाजी पवार यांच्यात संघर्ष पेटणार आहे. आगामी लोकसभा, विधानसभा

ठळक मुद्दे ‘सर्वोदय’चा वाद

सांगली : सर्वोदय साखर कारखान्याच्या मालकी हक्कावरून पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील व माजी आमदार संभाजी पवार यांच्यात संघर्ष पेटणार आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शासनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून जयंतरावांची कोंडी करण्याचा डाव आखला जात आहे. हा चक्रव्यूह जयंतराव कसे भेदतात? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

कारंदवाडी येथील सर्वोदय साखर कारखान्यावरून जयंत पाटील-संभाजी पवार यांच्यात उघड संघर्ष झाला. अखेर जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजारामबापू साखर कारखान्याने सर्वोदयचा ताबा घेत संभाजी पवार गटाला दूर केले. त्याचे राजकीय पडसादही जिल्ह्यात उमटले. राजारामबापूंचे शिष्य असलेल्या संभाजी पवारांचे राजकीय भवितव्यच पणाला लागले होते. त्यात भाजपनेही पवार यांना डावलल्याने राजकीय पटलावर त्यांची पिछेहाट झाली. गेल्या विधानसभा निवडणुकीत पवार यांचे पुत्र पृथ्वीराज पवार यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली, खरी पण ते तिसऱ्या क्रमांकावर घसरले. त्यानंतर सांगली विधानसभा मतदारसंघातून पवार गटाचे अस्तित्व धोक्यात आले.

नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीतही पवार गटाने स्वतंत्र आघाडी मैदानात उतरवली होती. पण त्यातही यश आले नाही. कधी काही महापालिकेच्या सत्तेची सूत्रे स्वत:कडे राखणाºया पवार गटाला महापालिकेच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला. या गटाचे सारे शिलेदार मोठ्या फरकाने पराभूत झाले. त्यामुळे पवार गट राजकीयदृष्ट्या अज्ञातवासात गेला होता. तरीही सर्वोदय साखर कारखान्याच्या मालकी हक्काचा लढा शासन व न्यायालयीन पातळीवर सुरूच होता.

त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आ. जयंत पाटील यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली. त्यांनी राज्यातील सत्ताधारी भाजपविरोधात रान पेटविण्यास सुरुवात केली. परिवर्तन यात्रेच्यानिमित्ताने राज्यभर पाटील यांनी दौरा सुरू केला आहे. भाजपच्या कारभारावर ते तुटून पडत आहेत. अशावेळी सर्वोदय कारखान्याच्या मालकी हक्कावरून झालेल्या जखमेवरील खपली काढण्याचे काम शासनाने केले. सर्वोदय व राजरामबापू कारखान्यातील करारच शासनाने रद्द केला. शिवाय सर्वोदयच्या सात-बारा उताºयावरील राजारामबापू कारखान्याचे नावही हटविले. त्यामुळे सर्वोदयवरील पवार गटाच्या हक्काला अधिक बळ मिळाले आहे. सध्या राजारामबापू कारखान्याने शासनाच्या निर्णयाला स्थगिती घेतली आहे.

शासनाच्या या निर्णयाला राजकीय किनार असल्याचीही चर्चा सुरू आहे. इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असून, संभाजी पवार यांना बळ देऊन जयंत पाटील यांच्याविरोधात ‘पवारास्त्र’ वापरले जाणार आहे.संभाजी पवार सक्रिय : चर्चेला उधाणगेली तीन ते चार वर्षे राजकीय अज्ञातवासात असलेले संभाजी पवार गेल्या काही दिवसांपासून राजकारणात सक्रिय झाले आहेत. विशेषत: त्यांनी जयंतरावांच्या इस्लामपूर मतदारसंघातील तुंग, कसबेडिग्रज या परिसरात बैठकाही घेतल्या. सर्वोदय साखर कारखान्यावर जाऊन आपले कार्यालय तयार ठेवण्याची सूचनाही त्यांनी केली. सध्या ते दररोज सर्वोदयवर जात असल्याचे समजते. आपण भाजप सोडलेली नाही आणि भाजपने आपल्याला पक्षातून काढलेले नाही, असे वक्तव्यही त्यांनी मध्यंतरी केले होते. त्यामुळे ते पुन्हा भाजपसाठी सक्रिय होतील, अशी चर्चा आहे. त्यातच राज्य शासनानेही सर्वोदयबाबतचा निर्णय त्यांच्या बाजूने दिल्याने पवारांना बळ मिळणार आहे. त्यांचे सक्रिय होणे व सर्वोदयचा निर्णय यामागचे गणित काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Politicsराजकारण