शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan: सर्वात मोठी बातमी! भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धविराम; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली घोषणा
2
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
3
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
4
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
5
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
6
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
7
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
8
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
9
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
10
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
11
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
12
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
13
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
14
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे आठ जवान जखमी
15
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
16
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
17
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
18
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
19
Weather Update : वेळेआधीच मान्सून धडकणार! कधी सुरू होणार पाऊस?हवामान विभागाने सांगितली तारीख
20
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती

महापालिकेविरोधात जयंतराव रस्त्यावर

By admin | Updated: September 16, 2015 00:16 IST

सांगलीत भर पावसात मोर्चा : भ्रष्टाचार, गोंधळाने तिन्ही शहरांची सत्ताधाऱ्यांनी वाट लावल्याचा आरोप

सांगली : महापालिकेतील गोंधळ, भ्रष्टाचारामुळे शहराची वाट लागली असून, नागरिकांना किमान सुविधा पुरविण्यात काँग्रेस अपयशी ठरली आहे. या शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून संघर्ष करेल, असा इशारा आमदार जयंत पाटील यांनी मंगळवारी मोर्चाद्वारे दिला. पालिकेतील सत्ताधाऱ्यांविरोधात जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने मोर्चा काढला. भर पावसात निघालेल्या या मोर्चाला नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. पाणी खासगीकरण, गुंठेवारीची दैना, रस्ते, आरोग्य, कचरा उठाव या समस्यांविरोधात राष्ट्रवादीने मंगळवारी रणशिंग फुंकले. या मोर्चाला राष्ट्रवादी कार्यालयापासून सुरूवात झाली. राममंदिर, स्टेशन चौक, राजवाडा चौकमार्गे मोर्चा महापालिकेवर आला. आंदोलकांसमोर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, शहरातील पाणीपुरवठ्याचा बोजवारा उडाला आहे. त्यात सुधारणा करण्याऐवजी सत्ताधाऱ्यांनी खासगीकरणाचा घाट घातला आहे. ठेकेदाराला बिले गोळा करण्याचा अधिकार दिला जाणार आहे. तो धाक दाखवून पैसे वसूल करणार आहे. गेल्या काही महिन्यात सत्ताधाऱ्यांच्या धोरणाविरोधात आपण रस्त्यावर उतरलो आहे. महाआघाडीच्या काळात ७० व ५६ एमएलडी जलशुद्धीकरणाचे काम हाती घेतले होते. सत्ता सोडली तेव्हा हे काम ८० टक्के पूर्ण झाले होते. गेली अडीच वर्षे २० टक्केही काम होऊ शकलेले नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांना शेरीनाल्याचे अशुद्ध पाणी पिण्याची वेळ आली आहे. पाणी शुद्ध करण्यात महापालिका अपयशी ठरली. महाआघाडीच्या काळात कोट्यवधीच्या योजना सुरू केल्या, पण त्या पूर्ण करता आलेल्या नाहीत. सांगली, मिरजेसाठी आम्ही ड्रेनेज योजना मंजूर केली. महाआघाडीच्या काळात काम सुरू झाले. पण आता मिरजेत १६ किलोमीटरचे काम बेकायदा झाले आहे. आराखडाबाह्य कामे करण्यात आली. ही महापालिका नागरिकांच्या हितासाठी नव्हे, तर ठेकेदारांसाठी काम करीत आहे. गुंठेवारीतील जनतेचे हाल होत आहेत. ज्यांच्या हाती सत्ता दिली, त्यांनी महापालिका व्यवस्थित चालविली नाही. अर्थकारण सांभाळले नाही. त्यामुळे गुंठेवारीत रस्ते, गटारी, ड्रेनेजचे काम झालेले नाही. महापालिकेत होणारा भ्रष्टाचार व गोंधळामुळे वाट लागली आहे. राजकीय हव्यासापोटी नव्हे, तर कारभार सुधारण्यासाठी सत्ताधारी, अधिकाऱ्यांना जाग यावी, म्हणून आम्ही मोर्चा काढला आहे. शहरातील जनतेवर झालेल्या अन्यायाचे परिमार्जन व्हावे, वेळीच सावध व्हावे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करेल, असा इशारा दिला. माजी महापौर सुरेश पाटील म्हणाले की, महाआघाडीच्या काळात शहराच्या विकासासाठी सातशे कोटीचा निधी आणला होता. पण सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी विकासाला खो घातला आहे. त्यांच्या कारभाराबद्दल जनतेत तीव्र असंतोष आहे. विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांनी, पाणी खासगीकरण होऊ देणार नाही, असा इशारा दिला. तसेच विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील यांनी, महापालिका चालविता येत नसेल तर काँग्रेसने राजीनामे द्यावेत, आम्ही महापालिका चालवून दाखवू, असे आव्हान दिले. यावेळी माजी नगरसेवक हरिदास पाटील, पद्माकर जगदाळे, राहुल पवार यांचीही भाषणे झाली. मोर्च्यात नगरसेवक विष्णू माने, युवराज गायकवाड, राजू गवळी, संगीता हारगे, प्रसाद मदभावीकर, सुनील कलकुटगी, प्रियंका बंडगर, शहराध्यक्ष सागर घोडके, मिरज शहराध्यक्ष साजीद पठाण, कुपवाडचे प्रकाश व्हनकडे, वसुधा कुंभार, मनोज भिसे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी सहभागी झाले होते. मुख्यमंत्रीही सत्ताधाऱ्यांच्या पाठीशी! महापालिकेतील ड्रेनेज घोटाळ्याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तक्रार केली. मूळ आराखड्याव्यतिरिक्त १६ किलोमीटरची पाईपलाईन टाकल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देत, चौकशीची मागणी केली. पण अजूनपर्यंत काहीच हालचाल नाही. मुख्यमंत्री भाजपचे असूनही ते पालिकेतील सत्ताधाऱ्यांना पाठीशी घालत आहेत, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. या घोटाळ्याची चौकशी होऊन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पाठपुरावा करणार असल्याचेही ते म्हणाले. आयुक्तांकडून आश्वासन आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्त अजिज कारचे यांची भेट घेऊन चर्चा केली. आयुक्त कारचे यांनी, पाणी पुरवठा खासगीकरणाचा ठराव महासभेने केला असला तरी, त्याची अंमलबजावणी करणार नसल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. जलशुद्धीकरण केंद्रासाठी १४ व्या वित्त आयोगातील निधीची तरतूद करून, महिन्याभरात काम पूर्ण करण्याची हमीही त्यांनी दिल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)