शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
3
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
4
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
5
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
6
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
7
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
8
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
9
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
10
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
11
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
12
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
13
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
14
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

जयंतराव-पतंगराव एकत्र

By admin | Updated: February 26, 2017 00:43 IST

भाजपला शह देण्याची रणनीती : जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी हालचाली गतिमान

सांगली : जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेच्या हालचालींना शनिवारी कलाटणी मिळाली. सर्वाधिक जागा पटकावणाऱ्या भाजपने सत्तेसाठी तयारी सुरू केल्यानंतर त्यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीचे माजी मंत्री आ. जयंत पाटील आणि काँग्रेसचे माजी मंत्री आ. पतंगराव कदम व जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम यांनी आघाडीची मोट बांधून आवश्यक संख्याबळ गाठण्याची तयारी सुरू केल्याचे वृत्त आहे.जिल्हा परिषदेतील ६० पैकी २५ जागांवर विजय मिळवत भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, सत्तास्थापनेसाठी त्यांना अजून सहा जागांची आवश्यकता आहे. वाळवा तालुक्यातील रयत विकास आघाडीच्या चार जागाही आपल्याच असल्याचा दावा भाजपने आणि कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला असला तरी या आघाडीतील नानासाहेब महाडिक गटाने भाजपशी बांधील नसल्याचे स्पष्ट केले आहे. शिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनीही भाजपला पाठिंबा देण्यास विरोध केला आहे. त्यांच्या संघटनेकडेही जिल्हा परिषदेचा एक सदस्य आहे. शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्या गटाने तीन जागा जिंकल्या असून, त्यांनी अजून पत्ते खुले केलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे.या घडामोडींवर लक्ष ठेवून असलेले राष्ट्रवादीचे माजी मंत्री आ. जयंत पाटील आणि काँग्रेसचे माजी मंत्री आ. पतंगराव कदम यांनी आघाडी बनविण्याची तयारी केली आहे. राष्ट्रवादीकडे १४, तर काँग्रेसकडे १० सदस्य आहेत. बागणीतून निवडून आलेले अपक्ष संभाजी कचरे मूळ जयंत पाटील यांचे समर्थक आहेत. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीने दोन जागा जिंकल्या असून त्यांनी निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत आघाडी केली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मिरज पश्चिम भागात काँग्रेसशी आघाडी केली होती. रयत विकास आघाडीतील वैभव नायकवडी गटाशी आणि शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्याशी पतंगराव कदम व मोहनराव कदम यांची जवळीक आहे. ही सर्व गोळाबेरीज केली तर ३२ सदस्यसंख्या गाठून सत्तेपर्यंत पोहोचता येते, असे आडाखे बांधून जयंत पाटील आणि कदम बंधूंनी हालचाली सुरू केल्याचे समजते. त्यांच्यामध्ये तशी चर्चा झाली आहे. वैभव नायकवडी आणि आ. बाबर यांच्याशी बोलणी करण्याची जबाबदारी मोहनराव कदम यांच्यावर देण्यात आली आहे. मोहनराव कदम यांचा पुढाकारभाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचे चुलतबंधू संग्रामसिंह देशमुख जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार आहेत. देशमुख आणि कदम गटाचे हाडवैर सर्वश्रुत आहे. पतंगराव कदम यांचा स्वत:चा विधानसभा मतदारसंघ असलेल्या पलूस आणि कडेगाव तालुक्यांत जिल्हा परिषदेच्या आठपैकी केवळ एक जागा कदम गटाला जिंकता आली आहे. संग्रामसिंह देशमुख जर अध्यक्ष झाले, तर भविष्यात कदम गटाला आणखी मोठा धोका संभवतो. त्यामुळेच भाजपला शह देण्यासाठी कदम बंधूंनी हालचालींना सुरुवात केल्याचे बोलले जाते.एकत्र बसून निर्णयशनिवारी सायंकाळी पेठनाका येथे रयत विकास आघाडीची बैठक झाली. खा. राजू शेट्टी, आ. शिवाजीराव नाईक, नानासाहेब महाडिक, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, सी. बी. पाटील, राहुल महाडिक बैठकीस उपस्थित होते. मंत्री सदाभाऊ खोत अनुपस्थित होते. रयत आघाडीचे सगळे नेते एकत्र बसून पाठिंब्याचा निर्णय घेतील, असे ठरल्याचे सांगण्यात आले.पृथ्वीराज देशमुख यांची महाडिकांकडे धावरयत आघाडीची बैठक झाल्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी सायंकाळी पेठनाक्याकडे धाव घेतली. तेथील पॉलिटेक्निकमध्ये नानासाहेब महाडिक, राहुल महाडिक यांच्यासह आ. शिवाजीराव नाईक आणि सी. बी. पाटील यांची त्यांनी भेट घेतली. देशमुख यांच्याकडून महाडिक यांचे मन वळविण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते.