शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जयंतराव-पतंगराव एकत्र

By admin | Updated: February 26, 2017 00:43 IST

भाजपला शह देण्याची रणनीती : जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी हालचाली गतिमान

सांगली : जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेच्या हालचालींना शनिवारी कलाटणी मिळाली. सर्वाधिक जागा पटकावणाऱ्या भाजपने सत्तेसाठी तयारी सुरू केल्यानंतर त्यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीचे माजी मंत्री आ. जयंत पाटील आणि काँग्रेसचे माजी मंत्री आ. पतंगराव कदम व जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम यांनी आघाडीची मोट बांधून आवश्यक संख्याबळ गाठण्याची तयारी सुरू केल्याचे वृत्त आहे.जिल्हा परिषदेतील ६० पैकी २५ जागांवर विजय मिळवत भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, सत्तास्थापनेसाठी त्यांना अजून सहा जागांची आवश्यकता आहे. वाळवा तालुक्यातील रयत विकास आघाडीच्या चार जागाही आपल्याच असल्याचा दावा भाजपने आणि कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला असला तरी या आघाडीतील नानासाहेब महाडिक गटाने भाजपशी बांधील नसल्याचे स्पष्ट केले आहे. शिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनीही भाजपला पाठिंबा देण्यास विरोध केला आहे. त्यांच्या संघटनेकडेही जिल्हा परिषदेचा एक सदस्य आहे. शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्या गटाने तीन जागा जिंकल्या असून, त्यांनी अजून पत्ते खुले केलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे.या घडामोडींवर लक्ष ठेवून असलेले राष्ट्रवादीचे माजी मंत्री आ. जयंत पाटील आणि काँग्रेसचे माजी मंत्री आ. पतंगराव कदम यांनी आघाडी बनविण्याची तयारी केली आहे. राष्ट्रवादीकडे १४, तर काँग्रेसकडे १० सदस्य आहेत. बागणीतून निवडून आलेले अपक्ष संभाजी कचरे मूळ जयंत पाटील यांचे समर्थक आहेत. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीने दोन जागा जिंकल्या असून त्यांनी निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत आघाडी केली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मिरज पश्चिम भागात काँग्रेसशी आघाडी केली होती. रयत विकास आघाडीतील वैभव नायकवडी गटाशी आणि शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्याशी पतंगराव कदम व मोहनराव कदम यांची जवळीक आहे. ही सर्व गोळाबेरीज केली तर ३२ सदस्यसंख्या गाठून सत्तेपर्यंत पोहोचता येते, असे आडाखे बांधून जयंत पाटील आणि कदम बंधूंनी हालचाली सुरू केल्याचे समजते. त्यांच्यामध्ये तशी चर्चा झाली आहे. वैभव नायकवडी आणि आ. बाबर यांच्याशी बोलणी करण्याची जबाबदारी मोहनराव कदम यांच्यावर देण्यात आली आहे. मोहनराव कदम यांचा पुढाकारभाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचे चुलतबंधू संग्रामसिंह देशमुख जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार आहेत. देशमुख आणि कदम गटाचे हाडवैर सर्वश्रुत आहे. पतंगराव कदम यांचा स्वत:चा विधानसभा मतदारसंघ असलेल्या पलूस आणि कडेगाव तालुक्यांत जिल्हा परिषदेच्या आठपैकी केवळ एक जागा कदम गटाला जिंकता आली आहे. संग्रामसिंह देशमुख जर अध्यक्ष झाले, तर भविष्यात कदम गटाला आणखी मोठा धोका संभवतो. त्यामुळेच भाजपला शह देण्यासाठी कदम बंधूंनी हालचालींना सुरुवात केल्याचे बोलले जाते.एकत्र बसून निर्णयशनिवारी सायंकाळी पेठनाका येथे रयत विकास आघाडीची बैठक झाली. खा. राजू शेट्टी, आ. शिवाजीराव नाईक, नानासाहेब महाडिक, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, सी. बी. पाटील, राहुल महाडिक बैठकीस उपस्थित होते. मंत्री सदाभाऊ खोत अनुपस्थित होते. रयत आघाडीचे सगळे नेते एकत्र बसून पाठिंब्याचा निर्णय घेतील, असे ठरल्याचे सांगण्यात आले.पृथ्वीराज देशमुख यांची महाडिकांकडे धावरयत आघाडीची बैठक झाल्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी सायंकाळी पेठनाक्याकडे धाव घेतली. तेथील पॉलिटेक्निकमध्ये नानासाहेब महाडिक, राहुल महाडिक यांच्यासह आ. शिवाजीराव नाईक आणि सी. बी. पाटील यांची त्यांनी भेट घेतली. देशमुख यांच्याकडून महाडिक यांचे मन वळविण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते.