शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

जयंतरावांनी टाळली मदनभाऊंवर टीका

By admin | Updated: September 16, 2015 00:15 IST

काँग्रेसवर मात्र आरोप : आश्वासन पूर्तीऐवजी नको ते उपद्व्याप!

सांगली : गेल्या दोन ते अडीच वर्षांत महापालिका विकलांग झाली आहे. नागरिकांना सुविधा देण्यात सत्ताधारी काँग्रेस पूर्णपणे अपयशी ठरली आहे, अशी टीकेची झोड उठविताना राष्ट्रवादीचे माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी महापालिकेचे नेतृत्व करणाऱ्या मदन पाटील यांच्यावर मात्र थेट टीका करण्याचे टाळले. महापालिका निवडणूक प्रचारासाठी आलेल्या काँग्रेसच्या सर्व नेत्यांची ही जबाबदारी आहे. काँग्रेसमध्ये अनेक नेते आहेत. एखाद्याचे नाव घेतले, तर दुसरा नाराज होईल, असे म्हणत थेट टीका करण्यास त्यांनी बगल दिली. जिल्हा बँक व बाजार समिती निवडणुकीत जयंत पाटील व मदन पाटील एकत्र आले होते. मात्र, हे दोन्ही नेते महापालिकेत एकमेकांचे विरोधक म्हणून काम करीत आहेत. पालिकेतील सत्ताधाऱ्यांविरोधात मंगळवारी जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने मोर्चा काढला. मोर्चानंतर पत्रकारांशी बोलताना जयंतरावांनी पालिकेच्या कारभारावर टीकेची झोड उठविली, पण मदनभाऊंवर टीका करण्यात मात्र त्यांनी हात आखडता घेतला. पालिकेतील गोंधळ, भ्रष्टाचाराला मदन पाटील यांचे नेतृत्व जबाबदार आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी जयंतरावांना विचारला, पण त्यांनी मदनभाऊंचे थेट नाव न घेता पक्ष म्हणून काँग्रेसचीच जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, महापालिकेत काँग्रेसचे अनेक नेते आहेत. त्यामुळे एकाचे नाव घेतले, तर दुसरा नाराज होईल. मदनभाऊ, पतंगराव कदम यांचे नाव घेण्यापेक्षा काँग्रेस पक्षच महापालिकेचा कारभार चालविण्यात अपयशी ठरला आहे. काँग्रेसच्या प्रचारासाठी आलेल्या नेत्यांनी येथील जनतेला आश्वासने दिली होती. त्यांनी ती जबाबदारी पार पाडावी. महापालिकेच्या कारभाराबद्दल ते म्हणाले की, गेल्या अडीच वर्षात आर्थिक गोंधळामुळे महापालिका विकलांग झाली आहे. जकात, एलबीटी रद्द झाल्याने महापालिकेने नवे पर्याय शोधण्याची गरज होती. महाआघाडीच्या काळात तिजोरीत पैसा नाही, म्हणून आम्ही रडत बसलो नाही. विकासासाठी निधीची उभारणी केली. सत्ता सोडतानाही पालिकेच्या तिजोरीत चाळीस कोटी शिल्लक होते. सत्ताधारी काँग्रेस जनतेला दिलासा देऊ शकलेली नाही. गुंठेवारी भागात सुविधांची वानवा आहे. पाणी खासगीकरणातून नागरिकांवर मोठा भुर्दंड बसणार आहे. पालिकेत सत्ताधाऱ्यांकडून दिलेली आश्वासने पूर्ण करण्याऐवजी नको ते उपद्व्याप सुरू आहेत. महासभेत विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. बीओटीवर जागा विकसित करण्याचा घाट घातला आहे. बीओटीमुळे गतवेळी त्यांची सत्ता गेली, तरीही त्यांना शहाणपण आलेले नाही. पालिकेतील दोष दाखविण्याचे काम राष्ट्रवादी यापुढेही करणार आहे. त्यातून कारभारात सुधारणा न झाल्यास संघर्ष अटळ आहे. (प्रतिनिधी) ... तर पुढील निवडणुकीत उमेदवारी नाही महापालिकेतील अनेक ठरावांवर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या सह्या असल्याचे निदर्शनास आणून देताच जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी विकासकामांसाठी सह्या केल्या असतील, तर त्या समजू शकतो. पण चुकीच्या कामासाठी सह्या केल्या असतील, तर त्यांना पुढील निवडणुकीत उमेदवारी देणार नाही. अशा सह्या करणाऱ्या नगरसेवकांचे विरोधी पक्षनेते सूर्यवंशी यांनी संशोधन करावे. तासगाव नगरपालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक भाजपच्या गोटात गेल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, तासगाव नगरपालिकेत काय चालले आहे, याची मला माहिती नव्हती. तेथील नगरसेवकांनाही मी ओळखत नाही. आमदार सुमनताई पाटील व तालुकाध्यक्ष हणमंतराव देसाई हेच नगरपालिकेचे काम पाहत आहेत. सत्ता गेल्यावर थोडीफार पडझड होत असते म्हणून तासगावच्या जनतेच्या मनात बदल झाला, असे नाही.