शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

जयंतराव व माझी चर्चा नाही : कदम

By admin | Updated: July 8, 2015 23:53 IST

बाजार समिती निवडणूक : मदनभाऊंनी सोबत यायचे की नाही हे ठरवावे!

सांगली : सांगली बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्याशी आपली कसलीही चर्चा झालेली नाही. विक्रम सावंत यांनाही आपण चर्चेसाठी कधी पाठविलेले नाही, असे सांगत काँग्रेसचे आमदार पतंगराव कदम यांनी बुधवारी जयंतरावांशी आघाडीची शक्यता फेटाळून लावली. बाजार समितीबाबत जयंत पाटील यांच्याशी चर्चा झाल्याबद्दल कदम यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, मी कशाला चर्चा करू. जयंत पाटील यांच्याशी कसलीही चर्चा झालेली नाही. एका कार्यक्रमात आमची भेट झाली होती. पण तिथेही निवडणुकीवर चर्चा झाली नाही. जतचे विक्रम सावंत यांना आपण त्यांच्याकडे पाठविलेले नाही. या साऱ्या अफवा आहेत. माजी मंत्री मदन पाटील यांच्या भूमिकेबद्दल कदम म्हणाले की, त्यांनी काँग्रेससोबत रहायचे का नाही, हे ठरवावे. मध्यंतरी मिरजेतील जागांबाबत मदनभाऊ व विशाल पाटील यांनी एकत्रित निर्णय घेण्याची सूचना केली होती, पण त्यानंतर काय झाले, हे मला माहीत नाही. जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा विषय संपलेला आहे. आम्ही बाजार समितीची निवडणूक काँग्रेस पक्षातर्फे लढविणार आहोत. जे सोबत येतील, त्यांनाही बरोबर घेऊ. कोणी कुठे जायचे, ते त्यांनीच ठरवावे, असा टोलाही लगाविला. राज्यातील भाजप सरकारवर टीका करीत कदम म्हणाले की, राज्यातील जनतेचा कल बदलू लागला आहे. मोदींची लाट संपली आहे. गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील निकाल हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. येत्या पावसाळी अधिवेशनातही काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रित सरकारच्या कारभारावर हल्ला चढविणार आहेत. दोन्ही पक्षाच्या नेत्यांची चर्चा झाली आहे. (प्रतिनिधी)जिल्हा परिषद, जिल्हा बॅँकेत लक्ष घालूजिल्हा बॅँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी बँकेत पतंगरावांनी यावे, असे निमंत्रण दिले होते. त्याबद्दल छेडले असता, कदम म्हणाले की, जिल्हा बँक ही कुणाची खासगी मालमत्ता नाही. बँकेच्या कारभाराची कधीही माहिती घेऊ शकतो. कर्जप्रकरणावरून काँग्रेसच्या संचालकांनी विरोध केला आहे. त्याबाबत बँकेच्या व्यवस्थापकांकडून माहिती घेणार आहोत. केवळ जिल्हा बँकच नव्हे, तर जिल्हा परिषदेतही यापुढे लक्ष घालणार असल्याचे ते म्हणाले. आनंदच आहे...जत तालुक्यातील ४२ गावांतील शेतकऱ्यांच्या आंदोलनात सत्ताधारी आमदार, खासदारच सहभागी झाले होते. त्यांनीच सरकारविरोधात मोर्चा काढला. हा आनंदच आहे. त्यातून जिल्ह्याला काहीतरी मिळावे, असा टोला लगाविला.