शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

जयंतरावांची जिल्हा परिषदेसाठी नवी जुळवाजुळव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:31 IST

सांगली : काँग्रेस, भाजपच्या नेत्यांना राष्ट्रवादीत आणून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी जुळवाजुळव करीत आहेत. भाजपचे ...

सांगली : काँग्रेस, भाजपच्या नेत्यांना राष्ट्रवादीत आणून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी जुळवाजुळव करीत आहेत. भाजपचे नेते अंतर्गत संघर्षात व्यस्त आहेत, तर काँग्रेसमध्येही दादा-कदम गटाच्या मनोमिलनवर पक्षाचे जिल्हा परिषदेतील भवितव्य अवलंबून आहे.

जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समित्यांच्या निवडणुका जानेवारीमध्ये होणार आहेत. या निवडणुकीसाठी जयंत पाटील रणनीती आखत आहेत. पक्षातून बाहेर पडलेल्यांना परत आणण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे. विट्याचे माजी आमदार सदाशिवराव पाटील, आटपाडीचे भारत पाटील, जत तालुक्यात बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे, जनसुराज्य पक्षाचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील, मन्सूर खतीब, सांगली बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, कडेगावमधील सामाजिक कार्यकर्ते डी. एस. देशमुख, माजी नगराध्यक्ष नीता देसाई यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन पक्षाची मजबूत बांधणी जयंत पाटील यांनी सुरू केली आहे. पक्षात घेतलेल्यांचे जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या गटात वजन आहे. आणखी काही नेतेही राष्ट्रवादीत येणार आहेत. पण, त्यांचा अजून पक्ष प्रवेशाचा मुहूर्त ठरलेला नाही.

आमदार विक्रम सावंत यांच्या माध्यमातून काँग्रेसला तरुण जिल्हाध्यक्ष मिळाला आहे. राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्याकडे काँग्रेसचे कार्यकर्ते अपेक्षेने पहात आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी काँग्रेस मजबूत करून जिल्हा परिषदेवर झेंडा फडकविण्याची घोषणा केली आहे, पण, त्यादृष्टीने हालचाली दिसत नाहीत. दादा-कदम गटाने एकसंघपणे काम केले तर जिल्हा परिषदेत काँग्रेस वरचढ ठरू शकते. परंतु, दादा-कदम गटाचे कृतीतून मनोमिलन होण्याची गरज आहे.

भाजपमध्ये सध्या गटातटाचे राजकारण जोमात आहे. जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि खासदार संजयकाका पाटील यांच्यात टोकाचा संघर्ष आहे. या दोन नेत्यांच्या संघर्षात भाजपमधील दुसऱ्या फळीतील नेत्यांची मुस्कटदाबी झाली आहे. नेत्यांच्या संघर्षात जिल्हा परिषदेतील भाजपची सत्ता टिकणार का, अशी चर्चा आहे. देशमुखांपुढे कडेगाव, पलूस तालुक्यातील संख्याबळ टिकवणे मोठे आव्हान आहे. तेवढेच आव्हान तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यात संजयकाका पाटील, मिरज तालुक्यात आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, जतमध्ये माजी आ. विलासराव जगताप, आटपाडीत माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख, आ. गोपीचंद पडळकर यांच्यापुढेही आहे.

चौकट

शिवसेनेची ‘एकला चलो रे’ची तयारी

आमदार अनिल बाबर आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे हे दिग्गज शिवसेनेत आहेत. या दोघांची त्यांच्या मतदारसंघात ताकद आहे. राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडी असली तरी ती जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकांत होण्याची शक्यता कमी आहे. सदाशिवराव पाटील राष्ट्रवादीत असल्यामुळे खानापूर-आटपाडी तालुक्यात बाबर राष्ट्रवादीबरोबर येणार नाहीत. यामुळे शिवसेनेची ‘एकला चलो रे’ अशीच भूमिका असणार आहे. कदाचित घोरपडे राष्ट्रवादीबरोबर जाऊ शकतील.