शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जयंतरावांची जिल्हा परिषदेसाठी नवी जुळवाजुळव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:31 IST

सांगली : काँग्रेस, भाजपच्या नेत्यांना राष्ट्रवादीत आणून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी जुळवाजुळव करीत आहेत. भाजपचे ...

सांगली : काँग्रेस, भाजपच्या नेत्यांना राष्ट्रवादीत आणून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी जुळवाजुळव करीत आहेत. भाजपचे नेते अंतर्गत संघर्षात व्यस्त आहेत, तर काँग्रेसमध्येही दादा-कदम गटाच्या मनोमिलनवर पक्षाचे जिल्हा परिषदेतील भवितव्य अवलंबून आहे.

जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समित्यांच्या निवडणुका जानेवारीमध्ये होणार आहेत. या निवडणुकीसाठी जयंत पाटील रणनीती आखत आहेत. पक्षातून बाहेर पडलेल्यांना परत आणण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे. विट्याचे माजी आमदार सदाशिवराव पाटील, आटपाडीचे भारत पाटील, जत तालुक्यात बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे, जनसुराज्य पक्षाचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील, मन्सूर खतीब, सांगली बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, कडेगावमधील सामाजिक कार्यकर्ते डी. एस. देशमुख, माजी नगराध्यक्ष नीता देसाई यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन पक्षाची मजबूत बांधणी जयंत पाटील यांनी सुरू केली आहे. पक्षात घेतलेल्यांचे जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या गटात वजन आहे. आणखी काही नेतेही राष्ट्रवादीत येणार आहेत. पण, त्यांचा अजून पक्ष प्रवेशाचा मुहूर्त ठरलेला नाही.

आमदार विक्रम सावंत यांच्या माध्यमातून काँग्रेसला तरुण जिल्हाध्यक्ष मिळाला आहे. राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्याकडे काँग्रेसचे कार्यकर्ते अपेक्षेने पहात आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी काँग्रेस मजबूत करून जिल्हा परिषदेवर झेंडा फडकविण्याची घोषणा केली आहे, पण, त्यादृष्टीने हालचाली दिसत नाहीत. दादा-कदम गटाने एकसंघपणे काम केले तर जिल्हा परिषदेत काँग्रेस वरचढ ठरू शकते. परंतु, दादा-कदम गटाचे कृतीतून मनोमिलन होण्याची गरज आहे.

भाजपमध्ये सध्या गटातटाचे राजकारण जोमात आहे. जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि खासदार संजयकाका पाटील यांच्यात टोकाचा संघर्ष आहे. या दोन नेत्यांच्या संघर्षात भाजपमधील दुसऱ्या फळीतील नेत्यांची मुस्कटदाबी झाली आहे. नेत्यांच्या संघर्षात जिल्हा परिषदेतील भाजपची सत्ता टिकणार का, अशी चर्चा आहे. देशमुखांपुढे कडेगाव, पलूस तालुक्यातील संख्याबळ टिकवणे मोठे आव्हान आहे. तेवढेच आव्हान तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यात संजयकाका पाटील, मिरज तालुक्यात आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, जतमध्ये माजी आ. विलासराव जगताप, आटपाडीत माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख, आ. गोपीचंद पडळकर यांच्यापुढेही आहे.

चौकट

शिवसेनेची ‘एकला चलो रे’ची तयारी

आमदार अनिल बाबर आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे हे दिग्गज शिवसेनेत आहेत. या दोघांची त्यांच्या मतदारसंघात ताकद आहे. राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडी असली तरी ती जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकांत होण्याची शक्यता कमी आहे. सदाशिवराव पाटील राष्ट्रवादीत असल्यामुळे खानापूर-आटपाडी तालुक्यात बाबर राष्ट्रवादीबरोबर येणार नाहीत. यामुळे शिवसेनेची ‘एकला चलो रे’ अशीच भूमिका असणार आहे. कदाचित घोरपडे राष्ट्रवादीबरोबर जाऊ शकतील.