शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
3
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
4
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
5
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
6
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
7
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
8
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
9
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
10
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
11
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
12
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
13
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
14
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
15
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
16
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
17
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
18
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
19
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
20
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…

दिल्ली आंदोलनाबाबत जयंतरावांकडून हिंसेचे समर्थन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:27 IST

इस्लामपूर : दिल्लीतील शेतकरी आंदोलक आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये जे चालले आहे, त्यात जलसंपदामंत्री जयंत पाटील हिंसेचे समर्थन करत ...

इस्लामपूर : दिल्लीतील शेतकरी आंदोलक आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये जे चालले आहे, त्यात जलसंपदामंत्री जयंत पाटील हिंसेचे समर्थन करत आहेत. भाजप सरकारवर आरोप करून लोकांना भडकवले जात आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केली.

येथे भाजप आणि रयत क्रांती आघाडीच्या असंघटित बांधकाम कामगार मेळाव्यासाठी ते आले होते. मेळावा झाल्यानंतर पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सामान्य नागरिकही हिंसेचे समर्थन करणार नाही. मात्र मंत्री असूनही जयंत पाटील हिंसेचे समर्थन करतात. आंदोलनात भाजप कार्यकर्त्यांचा समावेश असल्याच्या कथा रचल्या जात आहेत. शेतकऱ्यांच्या नावाखाली हिंसेवर विश्वास असणारे लोक या आंदोलनात उतरले आहेत. त्याचमुळे हिंसाचार झाला. संपूर्ण जगाने ही घटना माध्यमातून पाहिली आहे.

ते म्हणाले की, केंद्र सरकारने शेतकरी आंदोलकांशी नऊवेळा चर्चा केली. त्यातून खूप गोष्टी मान्य झाल्या होत्या. केंद्राने कृषी कायद्याची अंमलबजावणी थांबवण्याची तयारी दाखवत समिती नेमून यावर मार्ग काढू अशी भूमिका घेतली होती. यापेक्षा आणखी काय करायला हवे होते? हिंसेचे समर्थन न करता आंदोलने झाली पाहिजेत.

पाटील म्हणाले की, कोरोनाच्या काळात भीतीमुळे घरी बंदिस्त राहिलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता प्रासंगिक बाहेर दिसू लागले आहेत. मराठा आरक्षण, इतर मागास प्रवर्ग आणि इतर बरेच प्रश्न आहेत. मात्र मंत्र्यांमध्ये कोणताही ताळमेळ नाही. कोरोनाकाळात शेतकरी, कामगार किंवा ज्यांना आवश्यकता आहे, अशा घटकांना राज्य सरकारची कसलीही मदत मिळाली नाही. हे सर्व घटक रस्त्यावर उतरल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही.