शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

सांगली ते पेठ रस्त्याबाबत जयंतरावांनी व्यक्त केली दिलगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:29 IST

सांगली : पेठ ते सांगली रस्त्याच्या दुरवस्थेबाबत ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकल्यानंतर त्याची दखल घेत पालकमंत्री जयंत पाटील यांनी नागरिकांना होत ...

सांगली : पेठ ते सांगली रस्त्याच्या दुरवस्थेबाबत ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकल्यानंतर त्याची दखल घेत पालकमंत्री जयंत पाटील यांनी नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. केंद्र शासनाच्या अखत्यारीतील हा रस्ता असला तरी अधिकाऱ्यांना रस्तेदुरुस्तीसाठी सूचना देण्यात आल्याची माहिती त्यांनी ट्विटद्वारे दिली.

जयंत पाटील यांनी रविवारी दुपारी ट्विट केले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पेठ ते सांगली हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे म्हणजेच केंद्र शासनाच्या अखत्यारीत आहे. तरीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना हे खड्डे भरून घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्याकरिता मुरूमसुद्धा उपलब्ध करण्यात आला आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने डांबरीकरण करता येत नाही. पाऊस थांबल्यानंतर डांबरीकरण करण्यात येईल. नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.

जयंत पाटील यांनी याप्रश्नी दखल घेतल्याबद्दल नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी त्यांना धन्यवाद दिले. साखळकर म्हणाले की, पालकमंत्री म्हणून त्यांनी या प्रश्नाची दखल घेतली आहे. आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने हे काम पूर्ण करून नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात. महाराष्ट्रातील एक मंत्री म्हणून जयंत पाटील यांनी तसेच भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी पक्षीय अभिनिवेश न बाळगता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून चौपदरीकरण होईपर्यंत थांबू नये, अशी अपेक्षा आहे.

चौकट

‘लाेकमत’कडून प्रकाशझोत

सांगली ते पेठ रस्त्यावर पडलेले खड्डे, त्यामुळे होणारे नागरिकांचे, वाहनधारकांचे हाल व यावर मौन बाळगलेले राजकारणी यांविषयी प्रकाशझोत टाकला होता. त्याची दखल पालकमंत्र्यांनी घेतल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

चौकट

भाजप नेते गप्पच

राष्ट्रीय प्राधिकरणाच्या अखत्यारीत असलेल्या या रस्त्याच्या प्रश्नाबाबत भाजप नेत्यांनी मौन बाळगले आहे. पालकमंत्र्यांच्या अखत्यारीत हा विषय नसतानाही त्यांनी याची दखल घेतली. भाजपला या प्रश्नाची दखल घ्यावीशी वाटत नाही का, त्यांना या रस्त्यावर होणारे जनतेचे हाल दिसत नाहीत का, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.