शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
3
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
4
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
5
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
6
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
7
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
8
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
9
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
10
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
11
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
12
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
13
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
14
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
15
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
16
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
17
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
18
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
19
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
20
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार

सांगली ते पेठ रस्त्याबाबत जयंतरावांनी व्यक्त केली दिलगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:29 IST

सांगली : पेठ ते सांगली रस्त्याच्या दुरवस्थेबाबत ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकल्यानंतर त्याची दखल घेत पालकमंत्री जयंत पाटील यांनी नागरिकांना होत ...

सांगली : पेठ ते सांगली रस्त्याच्या दुरवस्थेबाबत ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकल्यानंतर त्याची दखल घेत पालकमंत्री जयंत पाटील यांनी नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. केंद्र शासनाच्या अखत्यारीतील हा रस्ता असला तरी अधिकाऱ्यांना रस्तेदुरुस्तीसाठी सूचना देण्यात आल्याची माहिती त्यांनी ट्विटद्वारे दिली.

जयंत पाटील यांनी रविवारी दुपारी ट्विट केले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पेठ ते सांगली हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे म्हणजेच केंद्र शासनाच्या अखत्यारीत आहे. तरीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना हे खड्डे भरून घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्याकरिता मुरूमसुद्धा उपलब्ध करण्यात आला आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने डांबरीकरण करता येत नाही. पाऊस थांबल्यानंतर डांबरीकरण करण्यात येईल. नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.

जयंत पाटील यांनी याप्रश्नी दखल घेतल्याबद्दल नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी त्यांना धन्यवाद दिले. साखळकर म्हणाले की, पालकमंत्री म्हणून त्यांनी या प्रश्नाची दखल घेतली आहे. आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने हे काम पूर्ण करून नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात. महाराष्ट्रातील एक मंत्री म्हणून जयंत पाटील यांनी तसेच भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी पक्षीय अभिनिवेश न बाळगता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून चौपदरीकरण होईपर्यंत थांबू नये, अशी अपेक्षा आहे.

चौकट

‘लाेकमत’कडून प्रकाशझोत

सांगली ते पेठ रस्त्यावर पडलेले खड्डे, त्यामुळे होणारे नागरिकांचे, वाहनधारकांचे हाल व यावर मौन बाळगलेले राजकारणी यांविषयी प्रकाशझोत टाकला होता. त्याची दखल पालकमंत्र्यांनी घेतल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

चौकट

भाजप नेते गप्पच

राष्ट्रीय प्राधिकरणाच्या अखत्यारीत असलेल्या या रस्त्याच्या प्रश्नाबाबत भाजप नेत्यांनी मौन बाळगले आहे. पालकमंत्र्यांच्या अखत्यारीत हा विषय नसतानाही त्यांनी याची दखल घेतली. भाजपला या प्रश्नाची दखल घ्यावीशी वाटत नाही का, त्यांना या रस्त्यावर होणारे जनतेचे हाल दिसत नाहीत का, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.