शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

राखीवमधून जयंत पाटील यांचेच समर्थक आमने-सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : ‘कृष्णे’च्या निवडणुकीत भटक्या विमुक्त जाती-जमाती राखीवमधून तिन्ही पॅनलचे उमेदवार वाळवा तालुक्यातील आहेत. हे तिघेही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : ‘कृष्णे’च्या निवडणुकीत भटक्या विमुक्त जाती-जमाती राखीवमधून तिन्ही पॅनलचे उमेदवार वाळवा तालुक्यातील आहेत. हे तिघेही जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचे समथर्क मानले जातात. आता या तिघांमधून कोण बाजी मारणार, याकडे सातारा आणि सांगली जिल्ह्यातील धनगर बांधवांचे लक्ष लागून राहिले आहे.

सहकार पॅनलचे अविनाश खरात आणि संस्थापक पॅनलचे नितीन खरात हे खरातवाडी (ता. वाळवा) येथील ऊस उत्पादक सभासद आहेत. या दोघांचा ग्रामपंचायतीपासून ते पंचायत समितीपर्यंत राजकीय प्रवास आहे. अविनाश खरात हे माजी सरपंच असून त्यांनी पंचायत समितीची निवडणूक लढविली होती. कृष्णेच्या गत निवडणुकीत रयत पॅनलकडून त्यांची उमेदवारी होती. यावेळी मात्र त्यांच्याच समाजातील मातब्बर नेत्यांच्या शिफारशीने अविनाश खरात यांना सहकार पॅनलकडून उमेदवारी मिळाली आहे, तर संस्थापक पॅनलनेही सहकारवर कडी करत कृष्णेचे माजी संचालक नितीन खरात यांना उमेदवारी देऊन अविनाश खरात यांच्यापुढे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. हे दोघेही जयंत पाटील यांच्याच मार्गदर्शनाखाली खरातवाडी येथे आपले राजकीय अस्तित्व टिकवून आहेत.

सहकार आणि संस्थापक पॅनलला शह देण्यासाठी आणि तोडीस तोड म्हणून रयत पॅनलने याच समाजातील इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांना उमेदवारी दिल्याने आता राखीवमध्ये चुरस निर्माण झाली आहे. मलगुंडे हे सध्या विद्यमान नगरसेवक आहेत. धनगर समाजात त्यांचा संपर्क आहे. इस्लामपूर पालिकेच्या राजकारणात मलगुंडे यांचा दबादबा आहे. ते माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. पालिकेच्या राजकारणात नागरिक संघटना आणि शहर सुधारणा या दोन संघटना होत्या. मलगुंडे हे शहर सुधारणाकडून नगरसेवक होते.

नगराध्यक्ष निवडीवेळी अटीतटीच्या संघर्षात नागरिक संघटनेचे एक मत फोडून मलगुंडे नगराध्यक्ष झाले. प्रारंभीपासून कृष्णेच्या राजकारणात मलगुंडे यांनी यशवंतराव मोहिते, मदन मोहिते यांना साथ दिली आहे. यावेळच्या निवडणुकीत मदन मोहिते सहकार पॅनलमध्ये आहेत, तर मुलगंडे यांंनी मोहिते घराण्यावरील निष्ठा कायम ठेवली आहे. त्यामुळेच डॉ. इंद्रजित मोहिते यांनी आनंदराव मलगुंडे यांना उमेदवारी देऊन कृष्णेच्या निवडणुकीत रयतेच्या झेंड्याला ताकद देण्याचा प्रयत्न केला आहे.

चौकट

नेत्यांची भूमिका तटस्थ

तिन्हीही उमेदवार जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड. चिमण डांगे यांचे नेतृत्व मानतात. त्यांना राजकारणात मार्गदर्शन करणाऱ्या सर्वच नेत्यांनी आपली भूमिका तटस्थ ठेवून कृष्णेच्या राजकारणात समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे.