शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

जयंत पाटील, वैभव शिंदे येणार एकाच व्यासपीठावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 17:14 IST

आष्टा तालुका होण्यासाठी हे पहिले पाऊल पडले. वैभव शिंदे यांना भाजप शासनाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे संचालक पद दिले. अशा परिस्थितीतही आष्टा पालिकेतील सत्तेतील विलासराव शिंदे यांना मानणारा गट जयंत पाटील यांच्यासोबतच राहिला. विधानसभा निवडणुकीत या गटाने राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार केला.

आष्टा : आष्टा येथे माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन शुक्रवार दि. ७ रोजी होणार आहे. या कार्यक्रमानिमित्ताने विलासराव शिंदे यांचे पुत्र व भाजपचे जिल्हा सरचिटणीस वैभव शिंदे, माजी उपनगराध्यक्ष विशाल शिंदे व मंत्री जयंत पाटील एकत्र येत आहेत. यामुळे वैभव शिंदे यांची राष्ट्रवादीत घरवापसी होऊन बेरजेचे राजकारण सुरू होणार का? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या जयंतीनिमित्त आष्टा शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शुक्रवार दि. ७ रोजी विलासराव शिंदे यांच्या ह्यशक्तिस्थळह्ण या स्मारकाचे भूमिपूजन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते होत आहे. वैभव शिंदे व विशाल शिंदे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले आहे.

गतवेळच्या जिल्हा परिषद निवडणुकीत बागणी मतदारसंघातून वैभव शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी जाहीर झाली; मात्र माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे पुत्र सागर खोत यांनी भाजपमधून, तर संभाजी कचरे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. यात अटीतटीची निवडणूक होऊन मोठा राजकीय संघर्ष रंगला आणि संभाजी कचरे विजयी झाले.

वैभव शिंदे यांचा विजय निश्चित आहे असे शिंदे गटाला वाटत होते; मात्र संभाजी कचरे यांच्या विजयानंतर जयंत पाटील गटाने सहकार्य केले नसल्याची भावना निर्माण झाली. वैभव शिंदे यांनी पक्षाचा त्याग करून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आष्टा परिसर व तालुक्यात भाजप वाढविण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

आष्टा शहरात अतिरिक्त तहसील कार्यालय सुरू करावे, आष्टा तालुका, एमआयडीसी व पालिकेला भरघोस निधी मिळावा म्हणून प्रयत्न केले. यापैकी आष्टा येथे अतिरिक्त तहसील कार्यालय मंजूर करून ते सुरू झाले. यामुळे विलासराव शिंदे यांचे सुमारे चाळीस वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण झाले. आष्टा तालुका होण्यासाठी हे पहिले पाऊल पडले.वैभव शिंदे यांना भाजप शासनाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे संचालक पद दिले. अशा परिस्थितीतही आष्टा पालिकेतील सत्तेतील विलासराव शिंदे यांना मानणारा गट जयंत पाटील यांच्यासोबतच राहिला. विधानसभा निवडणुकीत या गटाने राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार केला.

दरम्यान, माजी आमदार विलासराव शिंदे यांचे निधन झाले. या काळात भाजप, राष्ट्रवादीच्या नेत्यांसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मंत्री जयंत पाटील यांनीही शिंदे कुटुंबीयांचे सांत्वन केले.

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगली