शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
3
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले
4
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
5
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
6
तरुणांसाठी 'सायलेंट किलर' ठरतोय 'हा' आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षणं
7
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
8
भयंकर! सुनेने रील बनवताच सासरच्या मंडळींना राग अनावर; संतापलेल्या सासऱ्याने फोडलं डोकं
9
मराठी गायकाने नाकारली तुर्कीतील कॉन्सर्टची ऑफर; म्हणाला, "५० लाख देत होते पण..."
10
गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?
11
ज्योतीची साथीदार, एकत्रच करत होत्या पाकिस्तान वाऱ्या; कोण आहे प्रियंका सेनापती?
12
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर
13
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
14
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
15
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
16
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
17
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."
18
'ठरलं तर मग' मालिकेत पुन्हा येतेय 'ही' अभिनेत्री, लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात कमबॅक
19
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
20
"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा

जयंत पाटील-आर. आर. पाटील गटांत धुसफूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : औपचारिकता म्हणून दिलेली दोन पदे, पक्षीय पदाधिकाऱ्यांकडून बेदखलपणा आणि संस्थात्मक पातळीवरकुचंबणा यामुळे दिवंगत राष्ट्रवादी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : औपचारिकता म्हणून दिलेली दोन पदे, पक्षीय पदाधिकाऱ्यांकडून बेदखलपणा आणि संस्थात्मक पातळीवरकुचंबणा यामुळे दिवंगत राष्ट्रवादी नेते आर. आर. पाटील यांचा गट पालकमंत्री जयंत पाटील गटावर नाराज आहे. दोन्ही गटांमध्ये गेल्या धुसफूस सुरू असून, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत ही गोष्ट गेली आहे.

तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात आर. आर. पाटील यांच्या गटाची ताकद मोठी आहे. पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आ. सुमनताई पाटील यांच्याकडे या गटाचे नेतृत्व आले आहे. त्यांचे पुत्र रोहित पाटील राजकारणात सक्रिय झाले आहेत. आर. आर. पाटील यांनी जपलेली नाती पुढे कायम ठेवण्याचा प्रयत्न हे दोन्ही नेते करीत असताना जयंत पाटील यांच्या व त्यांनी नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यात अडथळे येत आहेत.

आर. आर. पाटील यांच्या विरोधकांशी सुसंवाद व त्यांच्या मित्रांशी विसंवाद असा विचित्र अनुभव आर. आर. पाटील गट घेत आहे. दुसरीकडे पक्षीय स्तरावर या गटातील कार्यकर्त्यांना स्पष्टपणे डावलले जात आहे. या गटातील दोघांनाच पदे मिळाली आहेत. जिल्ह्यातील पक्षाच्या एकाही सेलच्या कार्यकारिणीवर या गटातील कार्यकर्त्यांना संधी दिली जात नाही. ज्या काही मोजक्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली आहे, त्यांना कार्यक्रमांना निमंत्रित केले जात नाही. अशा अनेक गोष्टींमुळे पालकमंत्री व आर. आर. पाटील गटात मोठी दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यांतील आर. आर. पाटील गटातील कार्यकर्ते सध्या अस्वस्थ आहेत.

चौकट

शत्रूशी मित्रता, मित्राशी शत्रूता

आर. आर. पाटील आणि सगरे गटाची मैत्री मतदारसंघाला माहीत आहे. तरीही या गटावर सध्या पालकमंत्र्यांची खप्पामर्जी झाली आहे. अडचणीत असलेल्या महांकाली कारखान्याच्या अस्तित्वाच्या दोऱ्या त्यांच्या हाती असतानाही मदतीबाबत त्यांनी हात वर केले आहेत. दुसरीकडे आर. आर. पाटील गटाशी हाडवैर असलेले भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्याशी त्यांची वाढती मैत्रीही आर. आर. पाटील गटाला खटकत आहे.

चौकट

नेत्यांनीही घेतली दखल

आर. आर. पाटील गटाने संस्थात्मक पातळीवर सुरू असलेली कुचंबणा व पालकमंत्र्यांकडून मिळत नसलेली मदत याबाबत पक्षाचे नेते शरद पवार यांच्याकडे तक्रार केली होती. मुंबईत त्याबाबत चर्चाही झाली, मात्र या परिस्थितीत किंचितही बदल झाला नाही. सध्या धुमसत असलेला हा संघर्ष वेळीच थांबला नाही, तर राष्ट्रवादीलाच त्याचा मोठा फटका बसू शकतो.