शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

जयंत पाटील-आर. आर. पाटील गटांत धुसफूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : औपचारिकता म्हणून दिलेली दोन पदे, पक्षीय पदाधिकाऱ्यांकडून बेदखलपणा आणि संस्थात्मक पातळीवरकुचंबणा यामुळे दिवंगत राष्ट्रवादी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : औपचारिकता म्हणून दिलेली दोन पदे, पक्षीय पदाधिकाऱ्यांकडून बेदखलपणा आणि संस्थात्मक पातळीवरकुचंबणा यामुळे दिवंगत राष्ट्रवादी नेते आर. आर. पाटील यांचा गट पालकमंत्री जयंत पाटील गटावर नाराज आहे. दोन्ही गटांमध्ये गेल्या धुसफूस सुरू असून, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत ही गोष्ट गेली आहे.

तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात आर. आर. पाटील यांच्या गटाची ताकद मोठी आहे. पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आ. सुमनताई पाटील यांच्याकडे या गटाचे नेतृत्व आले आहे. त्यांचे पुत्र रोहित पाटील राजकारणात सक्रिय झाले आहेत. आर. आर. पाटील यांनी जपलेली नाती पुढे कायम ठेवण्याचा प्रयत्न हे दोन्ही नेते करीत असताना जयंत पाटील यांच्या व त्यांनी नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यात अडथळे येत आहेत.

आर. आर. पाटील यांच्या विरोधकांशी सुसंवाद व त्यांच्या मित्रांशी विसंवाद असा विचित्र अनुभव आर. आर. पाटील गट घेत आहे. दुसरीकडे पक्षीय स्तरावर या गटातील कार्यकर्त्यांना स्पष्टपणे डावलले जात आहे. या गटातील दोघांनाच पदे मिळाली आहेत. जिल्ह्यातील पक्षाच्या एकाही सेलच्या कार्यकारिणीवर या गटातील कार्यकर्त्यांना संधी दिली जात नाही. ज्या काही मोजक्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली आहे, त्यांना कार्यक्रमांना निमंत्रित केले जात नाही. अशा अनेक गोष्टींमुळे पालकमंत्री व आर. आर. पाटील गटात मोठी दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यांतील आर. आर. पाटील गटातील कार्यकर्ते सध्या अस्वस्थ आहेत.

चौकट

शत्रूशी मित्रता, मित्राशी शत्रूता

आर. आर. पाटील आणि सगरे गटाची मैत्री मतदारसंघाला माहीत आहे. तरीही या गटावर सध्या पालकमंत्र्यांची खप्पामर्जी झाली आहे. अडचणीत असलेल्या महांकाली कारखान्याच्या अस्तित्वाच्या दोऱ्या त्यांच्या हाती असतानाही मदतीबाबत त्यांनी हात वर केले आहेत. दुसरीकडे आर. आर. पाटील गटाशी हाडवैर असलेले भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्याशी त्यांची वाढती मैत्रीही आर. आर. पाटील गटाला खटकत आहे.

चौकट

नेत्यांनीही घेतली दखल

आर. आर. पाटील गटाने संस्थात्मक पातळीवर सुरू असलेली कुचंबणा व पालकमंत्र्यांकडून मिळत नसलेली मदत याबाबत पक्षाचे नेते शरद पवार यांच्याकडे तक्रार केली होती. मुंबईत त्याबाबत चर्चाही झाली, मात्र या परिस्थितीत किंचितही बदल झाला नाही. सध्या धुमसत असलेला हा संघर्ष वेळीच थांबला नाही, तर राष्ट्रवादीलाच त्याचा मोठा फटका बसू शकतो.