शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जत तालुक्यात द्राक्षबागायतदारांचा कल बेदाण्याकडे

By admin | Updated: March 25, 2016 23:32 IST

काढणी हंगामाची धांदल : व्यापाऱ्यांनी दर पाडल्याने उत्पादन परवडेना, शेड झाले ‘हाऊसफुल्ल’

गजानन पाटील -- संख --दुष्काळी परिस्थिती, अवकाळी पाऊस, ढगाळ हवामान, दावण्या रोगाचा प्रादुर्भाव यासारख्या संकटांना तोंड देत सांभाळलेल्या द्राक्षबागांमधील द्राक्षांच्या काढणीची धांदल जत तालुक्यात सुरू झाली आहे. व्यापाऱ्यांनी अवकाळी पाऊस, बदलत्या हवामानाची कारणे सांगून बाजारात द्राक्षाचा दर पाडला आहे. सध्या द्राक्षाला व्यापारी २५ ते ३२ रुपये किलो असा दर देत आहेत.महागडी औषधे, खते व मशागतीचा खर्च पाहता हा दर परवडत नसल्याने बेदाणा करण्याकडे कल वाढला आहे. बाजारात विक्री करण्यासाठी उत्पादित केलेल्या द्राक्षांचाही बेदाणा केला जात आहे. त्यामुळे बेदाण्याची शेड हाऊसफुल्ल झाली आहेत. त्यातच रब्बी हंगामाची सुगी सुरू अससल्याने मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे.तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी फोंड्या माळरानावर द्राक्षबागा उभारल्या आहेत. उमदी, बिळूर, तिकोंडी, सिद्धनाथ, संख, जालिहाळ खुर्द, भिवर्गी, जालिहाळ बु।।, दरीकोणूर, डफळापूर, मुचंडी, कोंत्यावबोबलाद, बालगाव, हळ्ळी, करजगी आदी भागात द्राक्षबागांचे क्षेत्र अधिक आहे. तालुक्यात ६ हजार ६० हेक्टर द्राक्षबागांचे क्षेत्र आहे. १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती असतानासुद्धा शेतकऱ्यांनी कूपनलिका, विहिरीतील, शेततलावातील उपलब्ध पाणीसाठा तसेच टॅँकरद्वारे बागा जगविल्या आहेत. आॅक्टोबरच्या १५ तारखेनंतर व शेवटच्या आठवड्यामध्ये छाटणी घेतली जाते. यावर्षी प्रतिकूल हवामान, पाणीटंचाई, वाढती औषधे, खते यांच्या वाढत्या किमती, अवकाळी पाऊस, ढगाळ हवामान यामुळे द्राक्ष बागायतदाना अनेक संकटातून वाट काढावी लागत आहे. अनेक अडचणींवर मात करीत द्राक्षबागा चांगल्या आल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी बाजारात थेट विक्री करण्यासाठी उत्पादन घेतले आहे. द्राक्षघड विरळ करण्यासाठी थिनिंग केले आहे. थिनिंगसाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. द्राक्षघडातील मण्यांची वाढ चांगली झाली आहे. किमान यंदा तरी द्राक्षांना चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा असताना फेबु्रवारी, मार्चला अवकाळी पावसाला सुरुवात झाली. अवकाळी पावसाचा गैरफायदा घेत व्यापाऱ्यांनी दर पाडला आहे. व्यापाऱ्यांनी किलोमागे ७ ते ९ रुपये दर कमी केला आहे. सध्या बाजारात २५ ते ३२ रुपये दर मिळत आहे. हा मिळणारा दर कमी असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.सध्या रासायनिक खते, औषधाच्या किंमती भरमसाठ वाढल्या आहेत. मशागतीचा खर्च वाढला आहे. वीज बिल, मजुरीच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे बाजारात द्राक्ष विक्रीसाठी नेणे शेतकऱ्यांना परवडत नाही. परिणामी बेदाणा करण्याकडे कल वाढला आहे.पाण्यावरील खर्च वाढलाछाटणी घेतल्यानंतर फळ आणण्यापर्यंत शेतकऱ्यांनी पाण्यावर लाखो रुपये खर्च केले आहेत. परतीचा पाऊस पडेल या आशेवर बागा धरल्या होत्या, पण पाऊसच न झाल्याने टॅँकरने पाणी घातले आहे. कूपनलिका, विहीर खुदाई करून पैसे खर्च केले आहेत. आतापर्यंत सर्वात जास्त पैसा पाण्यावर खर्च झालेला आहे.सर्वत्र कामे सुरू झाल्यामुळे मजुरांची टंचाईसध्या द्राक्षाची काढणी, पेटी पॅकिंग करणे आदी कामे मजुरांकरवी केली जात आहेत. दोन महिने मजुरांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. द्राक्ष काढणीस महिलेला २०० रुपये, पुरुषाला ३०० रुपये मजुरी मिळत आहे. सर्वत्र द्राक्ष काढणीची धांदल, रब्बी हंगामाची काढणी सुरू झाल्याचे मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे.बेदाण्याला चांगला दर आधुनिक तंत्रज्ञानाची, उत्तम कौशल्याची जोड, कोरड्या हवामानामुळे तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांनी दर्जेदार बेदाण्याची निर्मिती केली आहे. बाजारात चांगला दरही मिळत आहे.