शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

जत तालुक्यात द्राक्षबागायतदारांचा कल बेदाण्याकडे

By admin | Updated: March 25, 2016 23:32 IST

काढणी हंगामाची धांदल : व्यापाऱ्यांनी दर पाडल्याने उत्पादन परवडेना, शेड झाले ‘हाऊसफुल्ल’

गजानन पाटील -- संख --दुष्काळी परिस्थिती, अवकाळी पाऊस, ढगाळ हवामान, दावण्या रोगाचा प्रादुर्भाव यासारख्या संकटांना तोंड देत सांभाळलेल्या द्राक्षबागांमधील द्राक्षांच्या काढणीची धांदल जत तालुक्यात सुरू झाली आहे. व्यापाऱ्यांनी अवकाळी पाऊस, बदलत्या हवामानाची कारणे सांगून बाजारात द्राक्षाचा दर पाडला आहे. सध्या द्राक्षाला व्यापारी २५ ते ३२ रुपये किलो असा दर देत आहेत.महागडी औषधे, खते व मशागतीचा खर्च पाहता हा दर परवडत नसल्याने बेदाणा करण्याकडे कल वाढला आहे. बाजारात विक्री करण्यासाठी उत्पादित केलेल्या द्राक्षांचाही बेदाणा केला जात आहे. त्यामुळे बेदाण्याची शेड हाऊसफुल्ल झाली आहेत. त्यातच रब्बी हंगामाची सुगी सुरू अससल्याने मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे.तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी फोंड्या माळरानावर द्राक्षबागा उभारल्या आहेत. उमदी, बिळूर, तिकोंडी, सिद्धनाथ, संख, जालिहाळ खुर्द, भिवर्गी, जालिहाळ बु।।, दरीकोणूर, डफळापूर, मुचंडी, कोंत्यावबोबलाद, बालगाव, हळ्ळी, करजगी आदी भागात द्राक्षबागांचे क्षेत्र अधिक आहे. तालुक्यात ६ हजार ६० हेक्टर द्राक्षबागांचे क्षेत्र आहे. १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती असतानासुद्धा शेतकऱ्यांनी कूपनलिका, विहिरीतील, शेततलावातील उपलब्ध पाणीसाठा तसेच टॅँकरद्वारे बागा जगविल्या आहेत. आॅक्टोबरच्या १५ तारखेनंतर व शेवटच्या आठवड्यामध्ये छाटणी घेतली जाते. यावर्षी प्रतिकूल हवामान, पाणीटंचाई, वाढती औषधे, खते यांच्या वाढत्या किमती, अवकाळी पाऊस, ढगाळ हवामान यामुळे द्राक्ष बागायतदाना अनेक संकटातून वाट काढावी लागत आहे. अनेक अडचणींवर मात करीत द्राक्षबागा चांगल्या आल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी बाजारात थेट विक्री करण्यासाठी उत्पादन घेतले आहे. द्राक्षघड विरळ करण्यासाठी थिनिंग केले आहे. थिनिंगसाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. द्राक्षघडातील मण्यांची वाढ चांगली झाली आहे. किमान यंदा तरी द्राक्षांना चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा असताना फेबु्रवारी, मार्चला अवकाळी पावसाला सुरुवात झाली. अवकाळी पावसाचा गैरफायदा घेत व्यापाऱ्यांनी दर पाडला आहे. व्यापाऱ्यांनी किलोमागे ७ ते ९ रुपये दर कमी केला आहे. सध्या बाजारात २५ ते ३२ रुपये दर मिळत आहे. हा मिळणारा दर कमी असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.सध्या रासायनिक खते, औषधाच्या किंमती भरमसाठ वाढल्या आहेत. मशागतीचा खर्च वाढला आहे. वीज बिल, मजुरीच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे बाजारात द्राक्ष विक्रीसाठी नेणे शेतकऱ्यांना परवडत नाही. परिणामी बेदाणा करण्याकडे कल वाढला आहे.पाण्यावरील खर्च वाढलाछाटणी घेतल्यानंतर फळ आणण्यापर्यंत शेतकऱ्यांनी पाण्यावर लाखो रुपये खर्च केले आहेत. परतीचा पाऊस पडेल या आशेवर बागा धरल्या होत्या, पण पाऊसच न झाल्याने टॅँकरने पाणी घातले आहे. कूपनलिका, विहीर खुदाई करून पैसे खर्च केले आहेत. आतापर्यंत सर्वात जास्त पैसा पाण्यावर खर्च झालेला आहे.सर्वत्र कामे सुरू झाल्यामुळे मजुरांची टंचाईसध्या द्राक्षाची काढणी, पेटी पॅकिंग करणे आदी कामे मजुरांकरवी केली जात आहेत. दोन महिने मजुरांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. द्राक्ष काढणीस महिलेला २०० रुपये, पुरुषाला ३०० रुपये मजुरी मिळत आहे. सर्वत्र द्राक्ष काढणीची धांदल, रब्बी हंगामाची काढणी सुरू झाल्याचे मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे.बेदाण्याला चांगला दर आधुनिक तंत्रज्ञानाची, उत्तम कौशल्याची जोड, कोरड्या हवामानामुळे तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांनी दर्जेदार बेदाण्याची निर्मिती केली आहे. बाजारात चांगला दरही मिळत आहे.