शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
3
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
4
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
5
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
6
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
7
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
8
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
9
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
10
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
11
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
12
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
13
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
14
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
15
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
16
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
17
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
18
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
19
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
20
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?

जत तालुका दुष्काळी जाहीर करा

By admin | Updated: August 30, 2015 22:39 IST

‘स्वाभिमानी’ची मागणी : ४४ गावांतील शेतकरी आंदोलन उभारणार

संख : जत तालुका दुष्काळी जाहीर करावा, जनावरांसाठी प्रत्येक गावामध्ये चारा डेपो सुरू करावा व शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जत पूर्व विभागप्रमुख चंद्रशेखर देबगोंड यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे केली आहे.जत तालुका कायमचा दुष्काळी तालुका आहे. निम्मा पावसाळा संपला तरीसुद्धा पावसाने दडी दिल्याने भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत ८० ते ८५ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. खरीप हंगामातील २९ टक्के पेरण्या झाल्या होत्या. पेरणीतील पिकेही पावसाअभावी जळून गेली आहेत. सध्या पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. खरीप हंगाम सलग तिसऱ्यावर्षी वाया गेला आहे.पाऊस झाला नसल्याने शेतकरी व कष्टकरी लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. आतापर्यंत सरकारने कोणताही ठोस निर्णय घेतेला नाही. पिण्यासाठी पाणी नाही. शेतातील पिके गेल्याने व रानात खुरट्या गवताची उगवण झाली नसल्याने जनावरे कशी जगवायची, हा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतातील पिकेही गेलेली आहेत. द्राक्षे, डाळिंब, फळबागा अडचणीत सापडल्या आहेत. शेतकऱ्यांनी फळबागांवर बॅँक, सोसायटीची लाखो रुपयांची कर्जे काढलेली आहेत. त्याची परतफेड कशी करायची, हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.दुष्काळी परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून तालुका दुष्काळी जाहीर करावा, जनावरांसाठी प्रत्येक गावामध्ये चारा डेपो सुरू करावा व शेतकऱ्यांची सरसकट कर्जे माफ करावीत. अन्यथा पूर्व भागातील ४४ गावांतील शेतकऱ्यांनी आंदोलन न करता आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे, असे निवेदनात नमूद केले आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदनावर राजू पुजारी, नागनाथ शिळीन, चंद्रशेखर देबगोंड आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. (वार्ताहर)सलग तिसऱ्यावर्षी फटका आतापर्यंत ८० ते ८५ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. खरीप हंगामातील २९ टक्के पेरण्या झाल्या होत्या. पेरणीतील पिकेही पावसाअभावी जळून गेली आहेत. सध्या पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. खरीप हंगाम सलग तिसऱ्यावर्षी वाया गेला आहे.