शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
3
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
4
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
5
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
6
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
7
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
8
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
9
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
10
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
11
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
12
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
13
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
14
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
15
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
16
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
17
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
18
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
19
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
20
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू

जत तालुका दुष्काळी जाहीर करा

By admin | Updated: August 30, 2015 22:39 IST

‘स्वाभिमानी’ची मागणी : ४४ गावांतील शेतकरी आंदोलन उभारणार

संख : जत तालुका दुष्काळी जाहीर करावा, जनावरांसाठी प्रत्येक गावामध्ये चारा डेपो सुरू करावा व शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जत पूर्व विभागप्रमुख चंद्रशेखर देबगोंड यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे केली आहे.जत तालुका कायमचा दुष्काळी तालुका आहे. निम्मा पावसाळा संपला तरीसुद्धा पावसाने दडी दिल्याने भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत ८० ते ८५ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. खरीप हंगामातील २९ टक्के पेरण्या झाल्या होत्या. पेरणीतील पिकेही पावसाअभावी जळून गेली आहेत. सध्या पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. खरीप हंगाम सलग तिसऱ्यावर्षी वाया गेला आहे.पाऊस झाला नसल्याने शेतकरी व कष्टकरी लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. आतापर्यंत सरकारने कोणताही ठोस निर्णय घेतेला नाही. पिण्यासाठी पाणी नाही. शेतातील पिके गेल्याने व रानात खुरट्या गवताची उगवण झाली नसल्याने जनावरे कशी जगवायची, हा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतातील पिकेही गेलेली आहेत. द्राक्षे, डाळिंब, फळबागा अडचणीत सापडल्या आहेत. शेतकऱ्यांनी फळबागांवर बॅँक, सोसायटीची लाखो रुपयांची कर्जे काढलेली आहेत. त्याची परतफेड कशी करायची, हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.दुष्काळी परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून तालुका दुष्काळी जाहीर करावा, जनावरांसाठी प्रत्येक गावामध्ये चारा डेपो सुरू करावा व शेतकऱ्यांची सरसकट कर्जे माफ करावीत. अन्यथा पूर्व भागातील ४४ गावांतील शेतकऱ्यांनी आंदोलन न करता आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे, असे निवेदनात नमूद केले आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदनावर राजू पुजारी, नागनाथ शिळीन, चंद्रशेखर देबगोंड आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. (वार्ताहर)सलग तिसऱ्यावर्षी फटका आतापर्यंत ८० ते ८५ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. खरीप हंगामातील २९ टक्के पेरण्या झाल्या होत्या. पेरणीतील पिकेही पावसाअभावी जळून गेली आहेत. सध्या पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. खरीप हंगाम सलग तिसऱ्यावर्षी वाया गेला आहे.