शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

वीज कंपन्यांचे खासगीकरण रोखणे अशक्यच : गमरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 15:56 IST

वीज कंपन्यांचे खासगीकरण उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे, ते आपण रोखूच शकत नाही. या खासगीकरणाची अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भीती बाळगण्याची काहीच गरज नाही. गुणवत्तेच्या जोरावर खासगीकरणावर चांगल्या पध्दतीने मात करता येईल, असे प्रतिपादन महापारेषणचे कार्यकारी संचालक सुमित गमरे यांनी केले.

ठळक मुद्देवीज कंपन्यांचे खासगीकरण रोखणे अशक्यच : गमरे स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या राज्य अधिवेशनाचे उद्घाटन

सांगली : वीज कंपन्यांचे खासगीकरण उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे, ते आपण रोखूच शकत नाही. या खासगीकरणाची अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भीती बाळगण्याची काहीच गरज नाही. गुणवत्तेच्या जोरावर खासगीकरणावर चांगल्या पध्दतीने मात करता येईल, असे प्रतिपादन महापारेषणचे कार्यकारी संचालक सुमित गमरे यांनी केले.सांगलीत तीन दिवस महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे राज्य अधिवेशन सुरू झाले. त्याच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी महापारेषणचे महाव्यवस्थापक सुधीर वानखेडे, एम.एस.ई. वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा, कार्याध्यक्ष सी. एन. देशमुख, सरचिटणीस कृष्णा भोयर, अतिरिक्त सरचिटणीस महेश जोतराव आदीसह हजारो कर्मचारी उपस्थित आहेत.सुमित गमरे म्हणाले, विजेबाबत देशात महाराष्ट्र अग्रेसर आहे. शेतकरी व कामगार देशाचा कणा असून तो टिकला तरच देश पुढे जाणार आहे. संघटना गेली ६० वर्षे अविरत वीज कामगारांच्या हितासाठी लढत आहे, ही बाब अभिमानाची आहे.

सध्या विद्युतचे रूपांतर ऊर्जेत झाले आहे. आपणसुध्दा ऊर्जेप्रमाणे काम करणे गरजेचे आहे. संघटनेच्या प्रयत्नामुळेच पगारवाढ झाली आहे. कामगार व अभियंत्यांच्या चांगल्या कामामुळे तिन्ही कंपन्या नफ्यात आहेत. तिन्ही कंपन्यांच्या एकूण महसुलाच्या ३० टक्के महसूल कर्मचारी पगारावर खर्च होतो.

सध्या देशात सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण करण्याचे धोरण सुरू आहे. हे थांबविणे आपल्या हातात नाही. पण, त्याची कामगार, अभियंत्यांचे हित साधण्यासाठी कशापध्दतीने अंमलबजावणी करायची, हे आपण ठरवू शकतो. खासगीकरणाची भीती न बाळगता गुणवत्तेने त्यास सामोरे जाण्याची गरज आहे. लवकरच महापारेषण कंपनीत नवीन आकृतिबंध लागू करण्यात येणार आहे. आकृतिबंध लागू करताना कामगारांचेच हित जोपासले जाईल.

शर्मा म्हणाले, सतत होणारी वीज दरवाढ रोखण्याकरिता उपाययोजना, वीज कंपन्यांचे खासगीकरण व फ्रेन्चाईसीकरण रोखणे, वीज कंपन्यातील ३२००० कंत्राटी, आऊटसोर्सिंग कामगारांना सेवेत कायम करणे, या प्रश्नांवर आवाज उठविण्यात येणार आहे. यासाठी कामगारांनी संघटित लढा देण्याची गरज आहे. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणSangliसांगली