शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
2
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
3
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
4
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
5
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
6
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
7
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
8
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
9
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
10
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
11
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
12
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
13
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
14
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
15
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
16
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
17
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
18
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
19
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
20
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 

इस्लामपुरात तरुणाई रंगपंचमीत बेधुंद...

By admin | Updated: March 12, 2015 00:06 IST

पदाधिकारीही रंगात दंग : दिवसभर डॉल्बीचा ताल, दुचाकींची चाल आणि रंगांची उधळण करीत धमाल

इस्लामपूर : अवकाळी पावसाच्या दणक्याने तापलेले वातावरण आणि आग ओकणारा सूर्य डोक्यावर घेत शहर व परिसरातील तरुणाईने रंगांची उधळण करीत आज बेधुंदपणे रंगपंचमीचा आनंद लुटला. रंगपंचमीच्या या आनंदाला बऱ्याच ठिकाणी डीजे च्या दणदणाटाची साथ लाभली, तर कोंडूस्करच्या गोळ्याही बऱ्याचजणांनी रिचविल्याने त्यांचा बेभान ताल काही औरच होता.शहरात आज सकाळपासूनच महाराष्ट्राच्या पारंपरिक रंगपंचमीला उधाण आले होते. लहान चिमुरड्यांनी तोंडाला रंग फासून पाण्याचा मारा करीत या उत्सवाला सुरुवात केली. त्यानंतर सूर्याचा पारा जसा चढला, तसे रंगवलेल्या चेहऱ्यांसह तरुणाई मोटारसायकलवरुन रंग उधळत रस्त्यावरुन फिरु लागली. रासायनिक रंगांचा फाटा देत नैसर्गिक रंगांचा आणि पाण्याचा वापर, हे या रंगपंचमीचे वैशिष्ट्य ठरले.चौका—चौकात आणि गल्लोगल्लीच्या अरुंद रस्त्यांवरही रंगपंचमीची धमाल सुरु होती. शिवाजी चौक, गांधी चौक, जयहिंद चित्रमंदिर परिसर, आष्टा नाका, अहिल्यादेवी चौक, शिराळा नाका, गणेश मंडई, होळकर डेअरी, महावीर चौक अशा प्रमुख ठिकाणी डॉल्बीच्या दणदणाटात रंगपंचमीला उधाण आले होते. पाण्याच्या काहिली आणि खासगी टँकरमधील पाण्याचे फवारे मारत तरुणाईने रंगपंचमी साजरी केली. दरम्यान, नगरपालिकेत प्रशासनासह पदाधिकारीही रंगात न्हाऊन निघाले. न्यायालयाशेजारीच पालिकेची इमारत असल्याने तेथे गलबला होताच न्यायालयातून सूचना केल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. पोलिसांचा फौजफाटा येईपर्यंत इथली रंगपंचमी उरकण्यात आल्याने, तेथील शांतता पाहून पोलीस परतले. रंगमंचमीचे हे वातावरण सायंकाळी सहा वाजेपर्यंत होते. (वार्ताहर)‘मुक्तांगण’मध्ये रंगपंचमीद्वारे जागृतीनैसर्गिक रंगाने रंगपंचमी खेळून मुक्तांगण प्ले स्कूलमधील चिमुकल्यांनी धमाल केली. वेगवेगळे सामाजिक विषय घेऊन चेहरा आणि शरीर रंगवण्याची स्पर्धा झाली. पालकांनी मुलांचे चेहरे रंगवताना ‘मुलगी वाचवा, खेळातून शिक्षण, जय-जवान, वृक्षतोड थांबवा, वाघ वाचवा, हसत खेळत राहा, स्वच्छ भारत’ असे संदेश रेखाटले. साक्षर भारत, समृध्द भारत दर्शवताना राष्ट्रध्वजाची रंगसंगती केली. येथील प्रशासकीय इमारतीच्या परिसरात मुक्तांगण प्ले स्कूलमध्ये चार वर्षाच्या आतील मुलांना विविध अनुभव दिले जातात. रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर पाणी वाचवा, रासायनिक रंगांचा वापर टाळा, असा संदेशही या स्पर्धेतून दिला गेला. तीसहून अधिक मुलांनी आणि पालकांनी सहभाग घेतला. मुलांनी उत्साही वातावरणात स्वत:चे चेहरे रंगवून घेतले. झेंडू, पळस, बीट, हळदीपासून कलर तयार करुन आणले होते. स्कूलच्या संचालिका वर्षाराणी मोहिते, पूनम साटम, सायली शिंगे, मनीषा मोरे यांनी संयोजन केले.