शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
7
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
8
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
9
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
10
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
11
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
12
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
13
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
14
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
15
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
16
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
17
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
18
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
19
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
20
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल

इस्लामपूर देशातील पहिले ‘वायफाय’ शहर

By admin | Updated: September 7, 2015 22:51 IST

जयंत पाटील : फोर जी इंटरनेट सुविधेमुळे डिजिटल इंडियाच्या स्वप्नास गवसणी

इस्लामपूर : फोर जी वाय-फाय इंटरनेट सुविधेमुळे इस्लामपूर शहराने डिजिटल इंडियाच्या स्वप्नाला गवसणी घातली आहे. शिक्षणाचा आग्रह धरणाऱ्या नव्या पिढीला जगाच्या पाठीवरील माहिती आणि ज्ञानाचे भांडार या सुविधेमुळे उपलब्ध होणार आहे. देशातील पहिले वाय-फाय शहर ठरलेल्या इस्लामपुरातील युवा पिढी जगातील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करेल. भविष्यकाळ हा युवा पिढीचा आहे. त्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर विधायक आणि चांगले नवनिर्माण करण्यासाठी करावा, असे आवाहन माजी मंत्री व आमदार जयंत पाटील यांनी केले.इस्लामपूर नगरपालिकेतर्फे शहरात सुरु करण्यात आलेल्या फोर जी वाय-फाय सेवेचा लोकार्पण सोहळा आ. पाटील यांच्याहस्ते झाला. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड अध्यक्षस्थानी होते. सिनेअभिनेत्री सई ताम्हणकर, उमेश दुर्वे, अमित लुतरा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.सिनेअभिनेत्री सई ताम्हणकर म्हणाल्या, फोर जी वाय-फाय सेवेचा वापर युवा पिढीने स्वत:ला वैचारिक आणि सामाजिकदृष्ट्या प्रगल्भ बनवण्यासाठी करावा. स्वत:चे भविष्य घडवायचे की बिघडवायचे याचा निर्णय करा. इस्लामपूर हे माझे आजोळ आहे ते एज्युकेशनल हब बनल्याचा मला अभिमान आहे. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड म्हणाले, सांगली जिल्ह्याच्या ब्रॅन्डिंग करण्याच्या उपक्रमात या संपूर्ण शहराला वाय-फाय सेवा देणाऱ्या क्रांतिकारी निर्णयाची भर पडली आहे. फोर जी वाय-फाय सेवा देणारे इस्लामपूर देशातील पहिले शहर ठरले आहे. जिल्ह्याचा गेल्या १०० वर्षातील सर्व क्षेत्रातील इतिहास जगात पोहोचवणार आहोत. जिल्ह्यातील इतर शहरेही वाय-फाय करण्याचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादीचे नगरपरिषदेतील पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे निमंत्रक सभापती खंडेराव जाधव यांनी स्वागत केले. माजी उपनगराध्यक्ष अ‍ॅड. चिमण डांगे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. सूरज चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. उपनगराध्यक्ष संजय कोरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास मृणालिनी ताम्हणकर, सौ. वंदना गायकवाड, पोलीस उपअधीक्षक वैशाली शिंदे, प्रांताधिकारी विजय देशमुख, तहसीलदार रुपाली सरनोबत, आनंदराव मलगुंडे, शहाजी पाटील, सदानंद पाटील, मुख्याधिकारी दीपक झिंजाड, पी. आर. पाटील, विनायकराव पाटील, बाळासाहेब पाटील, अरुणादेवी पाटील यांच्यासह मान्यवर, नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)विजय भटकर यांच्याकडून कौतुकफोर जी वाय-फाय सेवेचे उद्घाटन केल्यानंतर हे शहर वाय-फाय करावे, अशी इच्छा व्यक्त करणाऱ्या महापरम संगणकाचे निर्माते शास्त्रज्ञ विजय भटकर यांच्याशी संपर्क साधला गेला. त्यांनी मुंबईतून या उपक्रमाचे कौतुक करुन आमदार जयंत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले. आ. पाटील म्हणाले, फोर जी वाय-फाय सेवा देणारे इस्लामपूर शहर भारतातील पहिले शहर ठरले आहे. तरुण पिढीचा भविष्यकाळ उज्ज्वल होण्यासाठी ही सेवा उपयुक्त ठरेल. त्यांच्यासाठी अत्यंत परिश्रमपूर्वक ही सेवा उभारली आहे. यापुढील काळातही टीका करणाऱ्यांकडे लक्ष न देता जे काही चांगले असेल ते आणणार आहोत. फोर जी वायफाय सेवेमुळे शहर खऱ्या अर्थाने हायफाय होणार आहे. तरुणांनी या सेवेचा लाभ घेऊन आपल्या स्वप्नांना गवसणी घालावी, अशी सदिच्छाही जयंत पाटील यांनी यावेळी तरुणांना दिली.