शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूर देशातील पहिले ‘वायफाय’ शहर

By admin | Updated: September 7, 2015 22:51 IST

जयंत पाटील : फोर जी इंटरनेट सुविधेमुळे डिजिटल इंडियाच्या स्वप्नास गवसणी

इस्लामपूर : फोर जी वाय-फाय इंटरनेट सुविधेमुळे इस्लामपूर शहराने डिजिटल इंडियाच्या स्वप्नाला गवसणी घातली आहे. शिक्षणाचा आग्रह धरणाऱ्या नव्या पिढीला जगाच्या पाठीवरील माहिती आणि ज्ञानाचे भांडार या सुविधेमुळे उपलब्ध होणार आहे. देशातील पहिले वाय-फाय शहर ठरलेल्या इस्लामपुरातील युवा पिढी जगातील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करेल. भविष्यकाळ हा युवा पिढीचा आहे. त्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर विधायक आणि चांगले नवनिर्माण करण्यासाठी करावा, असे आवाहन माजी मंत्री व आमदार जयंत पाटील यांनी केले.इस्लामपूर नगरपालिकेतर्फे शहरात सुरु करण्यात आलेल्या फोर जी वाय-फाय सेवेचा लोकार्पण सोहळा आ. पाटील यांच्याहस्ते झाला. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड अध्यक्षस्थानी होते. सिनेअभिनेत्री सई ताम्हणकर, उमेश दुर्वे, अमित लुतरा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.सिनेअभिनेत्री सई ताम्हणकर म्हणाल्या, फोर जी वाय-फाय सेवेचा वापर युवा पिढीने स्वत:ला वैचारिक आणि सामाजिकदृष्ट्या प्रगल्भ बनवण्यासाठी करावा. स्वत:चे भविष्य घडवायचे की बिघडवायचे याचा निर्णय करा. इस्लामपूर हे माझे आजोळ आहे ते एज्युकेशनल हब बनल्याचा मला अभिमान आहे. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड म्हणाले, सांगली जिल्ह्याच्या ब्रॅन्डिंग करण्याच्या उपक्रमात या संपूर्ण शहराला वाय-फाय सेवा देणाऱ्या क्रांतिकारी निर्णयाची भर पडली आहे. फोर जी वाय-फाय सेवा देणारे इस्लामपूर देशातील पहिले शहर ठरले आहे. जिल्ह्याचा गेल्या १०० वर्षातील सर्व क्षेत्रातील इतिहास जगात पोहोचवणार आहोत. जिल्ह्यातील इतर शहरेही वाय-फाय करण्याचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादीचे नगरपरिषदेतील पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे निमंत्रक सभापती खंडेराव जाधव यांनी स्वागत केले. माजी उपनगराध्यक्ष अ‍ॅड. चिमण डांगे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. सूरज चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. उपनगराध्यक्ष संजय कोरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास मृणालिनी ताम्हणकर, सौ. वंदना गायकवाड, पोलीस उपअधीक्षक वैशाली शिंदे, प्रांताधिकारी विजय देशमुख, तहसीलदार रुपाली सरनोबत, आनंदराव मलगुंडे, शहाजी पाटील, सदानंद पाटील, मुख्याधिकारी दीपक झिंजाड, पी. आर. पाटील, विनायकराव पाटील, बाळासाहेब पाटील, अरुणादेवी पाटील यांच्यासह मान्यवर, नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)विजय भटकर यांच्याकडून कौतुकफोर जी वाय-फाय सेवेचे उद्घाटन केल्यानंतर हे शहर वाय-फाय करावे, अशी इच्छा व्यक्त करणाऱ्या महापरम संगणकाचे निर्माते शास्त्रज्ञ विजय भटकर यांच्याशी संपर्क साधला गेला. त्यांनी मुंबईतून या उपक्रमाचे कौतुक करुन आमदार जयंत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले. आ. पाटील म्हणाले, फोर जी वाय-फाय सेवा देणारे इस्लामपूर शहर भारतातील पहिले शहर ठरले आहे. तरुण पिढीचा भविष्यकाळ उज्ज्वल होण्यासाठी ही सेवा उपयुक्त ठरेल. त्यांच्यासाठी अत्यंत परिश्रमपूर्वक ही सेवा उभारली आहे. यापुढील काळातही टीका करणाऱ्यांकडे लक्ष न देता जे काही चांगले असेल ते आणणार आहोत. फोर जी वायफाय सेवेमुळे शहर खऱ्या अर्थाने हायफाय होणार आहे. तरुणांनी या सेवेचा लाभ घेऊन आपल्या स्वप्नांना गवसणी घालावी, अशी सदिच्छाही जयंत पाटील यांनी यावेळी तरुणांना दिली.