शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
7
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
8
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
9
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
10
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
11
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
12
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
13
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
14
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
15
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
16
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
17
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
18
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
19
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
20
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल

इस्लामपुरात परिवर्तन लाट

By admin | Updated: November 2, 2016 00:17 IST

सदाभाऊ खोत : जनतेला पालिका सत्तेत बदल हवा आहे

इस्लामपूर : इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत जनतेला बदल हवा आहे. जनतेच्या मनात सत्ता परिवर्तन करण्याची सुप्त लाट आहे. गेल्या ३१ वर्षांच्या सत्ता काळातून जनतेला पिळून मिळवलेला सत्ताधाऱ्यांचा काळा पैसा बाहेर येणार आहे. मात्र सत्ताधाऱ्यांच्या या काळ्या पैशाला भीक न घालता जनता विकास आघाडीच्या पाठीशी ठामपणे राहील, असा विश्वास कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला. येथील निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खोत म्हणाले, या निवडणुकीसाठी विकास आघाडीत सर्वांना सामावून घेतले आहे. अपक्ष उमेदवारांशी चर्चा करीत आहोत. त्यातून सन्मानजनक तोडगा निघेल. विकास आघाडी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशीच लढत होईल. सत्ताधाऱ्यांचा मनमानी कारभार, जनतेला वेठीस धरुन काम करण्याची पद्धत, खुंटलेला विकास अशा सर्व समस्यांवर मतदारांमध्ये कमालीची नाराजी आहे. सत्ताधाऱ्यांनी पैशाची केलेली वारेमाप उधळणही जनतेने डोळ्यांनी पाहिली आहे. खोत म्हणाले, राष्ट्रवादीच्या सत्ताधाऱ्यांच्या दहशतीमुळे व्यापारी, सर्वसामान्य जनता, विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. शहराचा विस्तार करताना अपेक्षित विकास साधण्याची दृष्टी सत्ताधाऱ्यांकडे नाही. त्यामुळे गुंठेवारी व उपनगरातील जनजीवन बकाल बनले आहे. तेथील घरे बांधून राहिलेले नागरिक कारवाईची टांगती तलवार घेऊन राहात आहेत. शहरात सत्ताधाऱ्यांच्या पाठिंब्यावरच सावकारीचे दुष्टचक्र फोफावले आहे. त्यातून तरुण आत्महत्या करीत आहेत. राहत्या जागेला अकृषक दाखला (एन.ए.) न मिळाल्याने कर्ज मिळत नाही. त्यामुळे सावकाराच्या दारात जाण्याशिवाय जनतेस पर्याय उरलेला नाही. सत्ताधाऱ्यांमुळेच हे सावकार सोन्याने पिवळे झाले आहे. खोत म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी आरक्षणाचे भीती घालून जमिनी बळकावण्याचा गोरख धंदा केला. विकास आघाडीची सत्ता आल्यावर अन्यायी आरक्षणे रद्द करणार, खुल्या जागा नागरिकांच्या सहमतीने विकसित करणार. यावेळी निशिकांत पाटील, विजय पवार, महेश खराडे, भागवत जाधव उपस्थित होते. (वार्ताहर) भिंत पाडून : पाय बाहेर! ४खोत म्हणाले, अंथरुण पाहून पाय पसरावेत, असा व्यावहारिक जीवनातील सामाजिक संकेत आहे. मात्र पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी नुसते अंथरुणच नव्हे, तर भिंती पाडून आपले पाय बाहेर काढले. त्यामुळे शहराची अशी अवस्था झाल्याचा आरोप त्यांनी केला. ४निशिकांत पाटील म्हणाले, आम्ही कोणाला हरवण्यासाठी ही निवडणूक लढवत नाही. शहराच्या विकासाचा कार्यक्रम घेऊन जनतेसमोर जाणार आहोत. कोणी २४-२५ म्हणत असेल, मात्र आम्ही २९-० च करणार.