शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात परिवर्तन लाट

By admin | Updated: November 2, 2016 00:17 IST

सदाभाऊ खोत : जनतेला पालिका सत्तेत बदल हवा आहे

इस्लामपूर : इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत जनतेला बदल हवा आहे. जनतेच्या मनात सत्ता परिवर्तन करण्याची सुप्त लाट आहे. गेल्या ३१ वर्षांच्या सत्ता काळातून जनतेला पिळून मिळवलेला सत्ताधाऱ्यांचा काळा पैसा बाहेर येणार आहे. मात्र सत्ताधाऱ्यांच्या या काळ्या पैशाला भीक न घालता जनता विकास आघाडीच्या पाठीशी ठामपणे राहील, असा विश्वास कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला. येथील निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खोत म्हणाले, या निवडणुकीसाठी विकास आघाडीत सर्वांना सामावून घेतले आहे. अपक्ष उमेदवारांशी चर्चा करीत आहोत. त्यातून सन्मानजनक तोडगा निघेल. विकास आघाडी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशीच लढत होईल. सत्ताधाऱ्यांचा मनमानी कारभार, जनतेला वेठीस धरुन काम करण्याची पद्धत, खुंटलेला विकास अशा सर्व समस्यांवर मतदारांमध्ये कमालीची नाराजी आहे. सत्ताधाऱ्यांनी पैशाची केलेली वारेमाप उधळणही जनतेने डोळ्यांनी पाहिली आहे. खोत म्हणाले, राष्ट्रवादीच्या सत्ताधाऱ्यांच्या दहशतीमुळे व्यापारी, सर्वसामान्य जनता, विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. शहराचा विस्तार करताना अपेक्षित विकास साधण्याची दृष्टी सत्ताधाऱ्यांकडे नाही. त्यामुळे गुंठेवारी व उपनगरातील जनजीवन बकाल बनले आहे. तेथील घरे बांधून राहिलेले नागरिक कारवाईची टांगती तलवार घेऊन राहात आहेत. शहरात सत्ताधाऱ्यांच्या पाठिंब्यावरच सावकारीचे दुष्टचक्र फोफावले आहे. त्यातून तरुण आत्महत्या करीत आहेत. राहत्या जागेला अकृषक दाखला (एन.ए.) न मिळाल्याने कर्ज मिळत नाही. त्यामुळे सावकाराच्या दारात जाण्याशिवाय जनतेस पर्याय उरलेला नाही. सत्ताधाऱ्यांमुळेच हे सावकार सोन्याने पिवळे झाले आहे. खोत म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी आरक्षणाचे भीती घालून जमिनी बळकावण्याचा गोरख धंदा केला. विकास आघाडीची सत्ता आल्यावर अन्यायी आरक्षणे रद्द करणार, खुल्या जागा नागरिकांच्या सहमतीने विकसित करणार. यावेळी निशिकांत पाटील, विजय पवार, महेश खराडे, भागवत जाधव उपस्थित होते. (वार्ताहर) भिंत पाडून : पाय बाहेर! ४खोत म्हणाले, अंथरुण पाहून पाय पसरावेत, असा व्यावहारिक जीवनातील सामाजिक संकेत आहे. मात्र पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी नुसते अंथरुणच नव्हे, तर भिंती पाडून आपले पाय बाहेर काढले. त्यामुळे शहराची अशी अवस्था झाल्याचा आरोप त्यांनी केला. ४निशिकांत पाटील म्हणाले, आम्ही कोणाला हरवण्यासाठी ही निवडणूक लढवत नाही. शहराच्या विकासाचा कार्यक्रम घेऊन जनतेसमोर जाणार आहोत. कोणी २४-२५ म्हणत असेल, मात्र आम्ही २९-० च करणार.