शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

प्र्स्तावित बेंगलोर-दिल्ली राजधानी एक्सप्रेस कर्नाटकसाठीच आहे का?

By शीतल पाटील | Updated: August 20, 2023 14:27 IST

नागरिक जागृती मंचचा सवाल, सांगलीसह महाराष्ट्रावर अन्याय

सांगली : प्रस्तावित बेंगलोर- दिल्ली राजधानी एक्सप्रेसला सांगली रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आलेला नाही. मिरज वगळता महाराष्ट्रातील एकाही स्थानकावर ही गाडी थांबणार नाही. त्यामुळे राज्यातील प्रवाशांवर अन्याय होणार आहे. उलट कर्नाटकातील आठ स्थानकावर ही गाडी थांबणार आहे. राजधानी एक्सप्रेस केवळ कर्नाटकातील प्रवाशांसाठी आहे का? असा सवाल नागरिक जागृती मंचने उपस्थित केला आहे.

नागरिक जागृती मंचचे जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर म्हणाले की, रेल्वे विभागाकडून अनेक नव्या गाड्या सुरू करण्यात येत आहेत. पण या गाड्यांना सांगली स्थानकावर थांबा देण्यात येत नाही. याविरोधात अनेकदा पत्रव्यवहार, आंदोलने केले. त्यातून काही गाड्यांना सांगली स्थानकावर थांबा देण्यात आला. आता प्रस्तावित बेंगलोर-दिल्ली राजधानी एक्सप्रेस गाडीबाबतही सांगलीकरावर अन्याय केला जात आहे. या एक्सप्रेसला पुणे स्थानकावर थांबा देण्यात आलेला नाही. ही एक्सप्रेस कर्नाटकातील बेंगलोर, तुमकूर, आर्सिकेरी, बिरूर, दावणगिरी, हुबळी, धारवाड, बेळगाव या आठ स्थानकावर थांबणार आहे. महाराष्ट्रात मात्र मिरजेलाच एक थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यावर अन्याय झाला आहे.

कर्नाटकात हुबळी व धारवाड या एकाच महापालिकेच्या दोन स्टेशनवर थांबा आहे. महाराष्ट्रात मिरज येथे स्टॉप आहे. पण मिरज हा कर्नाटक सीमेवरील स्टेशन असल्यामुळे त्याचा फायदा कर्नाटकातील प्रवाशांनाच होतो. मिरजेसह सांगलीला थांबा दिल्यास पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना फायदा होणार आहे. एकूणच ही गाडी फक्त कर्नाटकच्या प्रवाशांसाठी आहे की काय, अशी शंका येते.

सांगली जिल्ह्यातून जाणारा पुणे-लोंढा-बेंगलोर दुहेरी विद्युत सेमी हाय स्पीड रेल्वे मार्ग झाला आहे. त्यावर पाच हजार कोटी खर्च केले आहेत. या रेल्वे मार्गासाठी सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या आहेत. ही गाडी सांगली स्थानकावर थांबणारच नसेल तर दुहेरी रेल्वे मार्गाचा जिल्ह्याला फायदा काय, असा सवालही त्यांनी केला.