शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जयंतरावांना निमंत्रण; काँग्रेसमध्ये मतभेद : जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 23:34 IST

सांगली : महापालिकेच्या ७० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राच्या उद््घाटनाचे ग्रहण अद्यापही सुटलेले नाही. सध्या या प्रकल्पाचे उद्घाटन लांबणीवर गेले असले तरी, उद्घाटनाच्या मानसन्मानाचे कवित्व

ठळक मुद्देकार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा प्रतीक पाटील यांचा इशारा

सांगली : महापालिकेच्या ७० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राच्या उद््घाटनाचे ग्रहण अद्यापही सुटलेले नाही. सध्या या प्रकल्पाचे उद्घाटन लांबणीवर गेले असले तरी, उद्घाटनाच्या मानसन्मानाचे कवित्व संपलेले नाही. सत्ताधारी विरूद्ध प्रशासनाचा संघर्ष संपता संपता आता काँग्रेसमध्येच मतभेद निर्माण झाले आहे. उद्घाटनाला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना निमंत्रण देण्यास माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी विरोध केला आहे. प्रसंगी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही दिला आहे.

महापालिकेच्या ७० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे उद््घाटन रविवारी होणार होते. पण शनिवारी ड्रेनेज प्रकल्पात पडून दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याने सत्ताधारी काँग्रेसने उद््घाटन कार्यक्रम पुढे ढकलला आहे. येत्या चार दिवसात हा कार्यक्रम होण्याची चिन्हे आहेत. या प्रकल्पाला सुरूवातीपासूनच ग्रहण लागले आहे. वर्षभरापूर्वी हा प्रकल्प पूर्ण होणार होता. खुद्द महापौर व आयुक्तांनी तसे जाहीर केले होते. पण वर्षभरानंतर प्रकल्प कार्यान्वित झाला. त्यात उद््घाटनाला कोणाला निमंत्रण द्यायचे, यावरून सत्ताधारी व प्रशासनात वाद निर्माण झाला.

सुरूवातीला काँग्रेसने या प्रकल्पाच्या उद््घाटनाच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी चालविली होती. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते उद्घाटन करण्याचा निर्णयही झाला. पण नंतर प्रशासनाने शासनाचा निधी असल्याचे कारण पुढे करीत, निमंत्रण पत्रिकेत भाजप नेत्यांचाही समावेश करण्याची अट घातली. मग काँग्रेसने नवी चाल खेळत या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांना दिले. पहिल्या पत्रिकेत भाजपचे खासदार, आमदारांचा समावेश झाला. नंतर पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या नावाचा समावेश करीत नव्याने पत्रिका छापण्यात आल्या. सत्ताधारी व प्रशासनाच्या कुरघोड्या शेवटच्या क्षणापर्यंत सुरूच होत्या. पण दुर्दैवाने हा कार्यक्रमच रद्द करावा लागला.

त्यात काँग्रेसचे प्रतीक पाटील यांनी जयंत पाटील यांना निमंत्रण दिल्याच्या कारणावरून नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, सांगली व कुपवाडकरांना शुध्द व मुबलक पाणी मिळण्यासाठी मदनभाऊ पाटील यांनी वारणा योजनेचा संकल्प केला होता. आपण खासदार असताना या योजनेचा पाठपुरावा केला. त्या प्रयत्नामुळे वारणा योजना मंजूर झाली. मात्र महापालिकेत २००८ मध्ये सत्तांतर झाले, महाआघाडीची सत्ता आली. मदनभाऊंचे वारणा योजनेचे स्वप्न राष्ट्रवादीच्या याच नेत्याने भंग केले. वारणेचा प्रस्ताव गुंडाळला. त्याच राष्ट्रवादीच्या नेत्याला आता जलशुध्दीकरण केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यासाठी निमंत्रित केले गेले. त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी पसरली असल्याचा दावा प्रतीक पाटील यांनी केला आहे. दुसरीकडे पालिकेतील सत्ताधारी काँग्रेसचे पदाधिकारी मात्र जयंत पाटील यांना बोलाविण्यावर ठाम आहेत.

सध्या या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा लांबणीवर गेला आहे. येत्या आठवडाभरात उद््घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. तेव्हा जयंत पाटील विरूद्ध प्रतीक पाटील असा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.मदनभाऊ गटाची : विरोधामुळे कोंडीजयंत पाटील यांच्या उपस्थितीला प्रतीक पाटील यांनी विरोध केला आहे. यापूर्वीही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीबाबत त्यांचे बंधू विशाल पाटील यांनी जाहीर सभेतून टीकास्त्र सोडले होते. वसंतदादा घराण्याने जयंत पाटील यांना विरोध कायम ठेवल्याने मदनभाऊ गटाची कोंडी झाली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मदनभाऊ व जयंत पाटील हे एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू जिल्हा बँक व मार्केट कमिटीच्या निवडणुकीत एकत्र आले. तेव्हापासून दोघांतील राजकीय संघर्षही संपला होता. मदनभाऊंच्या निधनानंतर जयंतरावांनी महापालिकेच्या राजकारणात त्यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांना पडद्याआडून मदत केली आहे. त्यामुळे मदनभाऊ गटात जयंत पाटीलविरोध संपुष्टात आला आहे. उलट मदनभाऊ गट राष्ट्रवादीशी आघाडी करण्यास इच्छुक आहे. त्यात प्रतीक व विशाल पाटील या दोघांच्या विरोधामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या गटाची कोंडी झाली आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण