शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

व्यापाऱ्यांच्या कर सवलतीबद्दल आग्रह धरू : आदित्य ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 17:08 IST

महापुराने उद्ध्वस्त केलेल्या सांगलीतील बाजारपेठांमधील व्यापाऱ्यांना जीएसटी, विद्युत बिल, घरपट्टी व अन्य करातील सवलतींबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून यासाठी आग्रह धरू, असे आश्वासन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगलीतील व्यापाऱ्यांना दिले.

ठळक मुद्देव्यापाऱ्यांच्या कर सवलतीबद्दल आग्रह धरू : आदित्य ठाकरे बालाजी चौकात विविध व्यापाऱ्यांशी केली चर्चा

सांगली : महापुराने उद्ध्वस्त केलेल्या सांगलीतील बाजारपेठांमधील व्यापाऱ्यांना जीएसटी, विद्युत बिल, घरपट्टी व अन्य करातील सवलतींबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून यासाठी आग्रह धरू, असे आश्वासन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगलीतील व्यापाऱ्यांना दिले.येथील बालाजी चौकात त्यांनी विविध व्यापाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार धैर्यशील माने, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आ. राजेश क्षीरसागर, संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील उपस्थित होते.ठाकरे म्हणाले की, सांगलीतील व्यापारी पेठांत झालेली हानी खूप मोठी आहे. त्यांचे नुकसान भरून न निघणारे आहे. आम्ही व्यापाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. शेतकरी, सामान्य नागरिकांप्रमाणेच व्यापाऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, ही आमची आग्रही मागणी आहे.

याठिकाणचे व्यापारी पुन्हा संकटातून सावरतील इतपत तरी मदत आम्ही देऊ. त्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी लवकरच चर्चा करणार आहोत. येथील व्यापाऱ्यांनी जीएसटी, आयकर, घरपट्टी व अन्य करांबाबत सवलतीची मागणी केली आहे. याबाबत जीएसटी आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे.जिल्हाधिकाऱ्यांमार्फत त्याबाबतचे एक पत्र जीएसटी विभागास पाठविण्यात येईल. मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या  बैठकीत आम्ही पूरग्रस्त व्यापाऱ्यांच्या करसवलतीबाबत आग्रह धरू. सवलतींबरोबरच व्यापाऱ्यांना जादा भरपाई मिळावी, अशी मागणीही करण्यात येईल. व्यापारी पेठा या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यावर शहराचे अर्थचक्र अवलंबून असते. त्यामुळे त्यांना पाठबळ देण्याची गरज आहे.एकता व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी ठाकरे यांना निवेदन दिले. यावेळी शहा म्हणाले की, सांगलीच्या सर्व मुख्य बाजारपेठा पाण्यात होत्या. अब्जावधीचे नुकसान या पेठांमध्ये झाले आहे. सर्व खराब माल कचऱ्यांत फेकावा लागला. शासनाने जाहीर केलेली ५0 हजार रुपयांची मदत स्वच्छतेच्या कामीही येणार नाही. त्यामुळे ही मदत अत्यंत तोकडी आहे.

व्यापाऱ्यांना किमान या संकटातून योग्य पद्धतीने उभारता येईल, अशी मदत शासनाने द्यावी. शेतकरी, नागरिकांसाठी त्यांनी जाहीर केलेली मदत स्वागतार्ह आहे. आम्ही त्याबाबत समाधानी आहोत. मात्र व्यापाऱ्यांबाबत अद्याप समाधानकारक निर्णय झालेले नाहीत.यावेळी पापा सारडा, शीतल पाटील आदी व्यापारी, शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, संजय विभुते, जिल्हा संघटक दिगंबर जाधव, शेखर माने, शंभोराज काटकर, मयूर घोडके, गजानन मोरे, गणेश लोखंडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेSangli Floodसांगली पूर